पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ४८व्या ‘जी-७’ परिषदेच्या निमित्ताने जर्मनीच्या आणि त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीच्या छोटेखानी दौर्याला आठवडा उलटून गेला असला आणि हा दौरा अवघ्या तीन दिवसांचा असला तरी बदलत्या जागतिक परिस्थितीत नवी समीकरणे तयार करण्याच्या दृष्टीने तो अतिशय महत्त्वाचा होता.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि परिसराला जोरदार पावसाने झोडपले असून यंदा मान्सूनच्या प्रारंभीच ईशान्य भारतालाही महापुराचा मोठा तडाखा बसला. तेव्हा या महापुराची कारणे, सद्यस्थिती आणि त्यामुळे झालेली जीवितहानी, वित्तहानी यांचा आढावा घेणारा हा लेख...
कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाची नदी असलेली पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोल्हापूरकरांच्या काळजाचा ठोका चुकला आहे
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मणिमेकलाईविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्रातील अमरावतीच्या उमेश कोल्हे यांच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने हाती घेताच या भीषण हल्ल्याचे नवे तपशील समोर आले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून आणखी एका संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. मुंबई शहर उपनगरात गेले 24 तासात सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा या वेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली तालुक्यात असलेल्या हिरण्यकेशी नदीपात्रात सोमवारी दि. ४ जुलै रोजी दुपारी एक महिला सेल्फी काढण्याच्या नादात नदीत वाहून जात होती. प्रसंगावधान दाखवत आंबोली पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई यांनी या महिलेला सुखरूप बाहेर काढले.
दरवर्षी आषाढी एकादशीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठोबाची महापूजा होत असते. यावर्षी तो मान राज्याचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दि. ५ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील स्वातंत्र्यवीरसावरकर दालनास सदिच्छा भेट दिली. या दरम्यान त्यांनी तेथील संग्रहित बाबींची माहिती घेतली. तसेच त्यांच्या जीवनचरित्राशी संबंधित विविध छायाचित्रांची पाहणी केली.
रायगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना पुढील दोन दिवस मंगळवार दि. ०५ आणि बुधवार दि. ६ रोजी अतिमुसळधार पावसाच्या इशारा देण्यात आला आहे. याबाबत हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नागरिकांना आणि यंत्रांना संपूर्ण सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हिंदूंना मारले तरी हिंदूंनी ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ मात्र म्हणायचे नाही, अशी ‘टाईम’ मॅगझिनची भूमिका. यातूनच ‘टाईम’मॅगझिनचा हिंदूद्वेष किती खालच्या पातळीला गेलेला आहे, त्याचा दाखला मिळतो. पण, धर्मांध मुस्लीम असो वा ‘टाईम’ मॅगझिन असो वा लीना मणिमेकलाई असो, यांचा हिंदूद्वेष किती दिवस चालेल? जोपर्यंत हिंदू शांत, सहिष्णू आहे तोपर्यंत, नंतर?
पाकिस्तानमधील सत्ताधारी ‘पीएमएल-एन’ पक्षाच्या अध्यक्षा मरीयम नवाझ यांनी ‘आयएमएफ’चा पाकिस्तानवर आता विश्वासच नसल्याचे नुकतेच विधान केले. त्याचे कारण म्हणजे इमरान खान यांचा ‘आयएमएफ’बरोबरचा ‘फितना’ म्हणजेच फसलेला करार. पण, खान असो वा शरीफ सरकारचे निर्णय, भरडली जातेय ती पाकिस्तानी आवाम...
पर्यावरणालाही राजकीय बाजू असते. पर्यावरण हा राजकीय बाजूचा विषय होताच; आरेच्या निमित्ताने तो आता पुन्हा पुढे आला आहे.
Never miss a thing & stay updated with all the latest news around the world!
वंदनीय लक्ष्मीबाई उपाख्य मावशी केळकर या राष्ट्र सेविका समितीच्या आद्य प्रमुख संचालिका. वं. मावशींचा जीवनपट थोडक्यात मांडायचा म्हणजे एका अखिल भारतीय महिला संघटनेचा इतिहास मोजक्या शब्दांत मांडणे होय. आज त्यांच्या जयंतीनिमित्त केलेले हे स्मरण...
मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीचे संवर्धन व्हावे, या माध्यमातून नवीन साहित्यिक निर्माण व्हावेत या उद्देशाने महाराष्ट्र साहित्य परिषदेची डोंबिवली शाखा जोमाने कार्यरत आहे. या शाखेच्या कार्याचा आढावा घेणारा हा सविस्तर लेख...
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान कप्तान इमरान खान सध्या सैरबैर झाले आहेत. कारण, हातातून सत्ता गेल्यापासून ते नुसते पाकिस्तानच्या कानाकोपर्यात मोठाल्या रॅली घेऊन शक्तिप्रदर्शन करण्यातच धन्यता मानताना दिसतात. पाकिस्तानी आवाम अजूनही माझ्या पाठीशी आहे, हेच दाखवून देण्याचा हा सगळा नसता खटाटोप. एप्रिल महिन्यात विश्वासदर्शक ठरावावेळी इमरान खान यांनी अखेरपर्यंत आपली खुर्ची वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण, इतके सगळे करूनही इमरान खान यांच्या हातातून सत्ता निसटलीच. तेव्हापासून ते कालपरवापर्यंत आपले सरकार उलथवण्याचा हा अ
जुन महिना बिनपावसाचा अनुभवलेल्या पुणेकरांना जुलैच्या पहिल्या तारखेपासूनच अगदी पुणेकर ज्यासाठी प्रसिद्ध आहेत, तशाच लहरीपणाने येणार्या पावसाने कोंडीत पकडले असून आता पुणेकर देखील रोज आपली या पावसाने फजिती होत असल्याचे बघून ’डॉयलॉग फेम’ आमदार शहाजी पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या त्या माणदेशी भाषेतील ‘डायलॉग’च्या धर्तीवर वर ’काय पाऊस...काय पुणे... काय उणे? अशी ‘डॉयलॉग’ बाजी करून ‘एन्जॉय’ करीत आहेत. यातून पुणेकरांनी प्रशासनाच्या नालेसफाईतील दिरंगाई आणि रस्त्यातील पाण्याने भरलेले खड्डे यावर नेमके बोट ठेवले आहे.
विद्यार्थीदशेतच समाजभान जपत केवळ समस्या न मांडता त्यावर उपाययोजनेनुसार कार्य करणार्या ग्रीष्मा नागमोती हिच्या कार्याविषयी...
अंदमान आणि निकोबार बेटावरील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे बांधकाम सुरू आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरणाने याबाबतची आश्चर्यकारक छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ब्रिटीश राजवटीत वीर विनायक दामोदर सावरकरांना बेटांवर असलेल्या सेल्युलर जेलमध्ये दोन जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
शिवडी येथील ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’च्या जागेवरील ‘बीडीडी’ चाळींच्या पुनर्विकासासाठीच्या प्रकल्पाबाबत शिवसेनेने आरोप केल्यानंतर आता राजकारणाला सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग आरक्षण सोडत झाल्यानंतर आता निवडणुकीचा आणखी एक टप्पा पुढे सरकला आहे.
वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील लोकमान्य पाडा नं. १, आकृती गृहसंकुलाच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या तरण तलावाचे २०१९ मध्ये निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पण करून नामकरण करण्यात आले होते.
राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सेना आमदार व मंत्र्यांनी बंडाळी केल्याने ठाकरे सरकार हादरले आहे.
आमदार संजय केळकर यांच्या ‘संस्कार सेवाभावी’ संस्थेच्या मार्फत ढोकाळी येथील शरदचंद्र पवार मिनी स्टेडियममध्ये मंगळवारी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
‘जेईई’, ‘एनईईटी’ आणि ‘सीईटी’ उत्तीर्ण होण्यासाठी कोकणातील विद्यार्थ्यांना हजारो रुपयांऐवजी मोफत ‘मॉक टेस्ट सिरीज’ उपलब्ध होणार आहे.
“ ‘उद्’ म्हणजे ‘आनंद’ व ‘योजक’ म्हणजे मिळवणे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती जो घडवून आणतो तो खरा उद्योजक होय ! असे परात्पर गुरु परशुराम पांडे महाराज यांनी सांगितले आहे.
स्पाइसजेट बी-७३७ विमान ऑपरेटिंग फ्लाइट एसजी-११ (दिल्ली - दुबई) हे विमान मंगळवार दि. ५ रोजी इंडिकेटर लाईट खराब झाल्यामुळे कराचीला वळवण्यात आले. विमान कराची येथे सुरक्षितपणे उतरले आणि प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आल्याचे स्पाइसजेटने सांगितले. प्रवाशांना दुबईला घेऊन जाण्यासाठी एक बदली विमान पाठवण्यात येणार आहे...
“देशातील हिंदू समाज गाईला माता मानतो. त्यामुळे मुस्लीम समुदायाने येत्या बकरी ईदच्या दिवशी गाईची कुर्बानी टाळावी,” असे आवाहन ‘ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटचे (एआययुडीएफ) वादग्रस्त खासदार आणि आसाम जमियत उलेमाचे प्रदेशाध्यक्ष मौलाना बद्रुद्दीन अजमल यांनी नुकतेच केले. ..
न्यायालयाच्या सुट्टीनंतर काशिविश्वनाथ-ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी सोमवारी पार पडली. ..
जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात ‘लष्कर-ए-तोयबा’च्या दोन दहशतवाद्यांना रविवारी गावकर्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ..
भारताचे तुकडे करणाऱ्या जिन्नाचे नाव भारतातील स्थानांना देणे हा देशाचा अपमान आहे...
आप आमदार अमानतुल्ला खान आणि पोलिसांमध्ये हाणामारी...
परिसीमन आयोगाने काश्मीरी स्थलांतरित आणि पाकव्याप्त जम्मू – काश्मीरमधील विस्थापितांसाठी दोन महत्वाच्या शिफारशी केल्या आहेत..
बीसी समाजाच्या अपरिमित हानीस केवळ राज्य सरकारच जबाबदार आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे...
शेअर बाजारात मंगळवारी जोरदार घसरण दिसून आली. सेन्सेक्स ३८३ अंशांनी कोसळला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे २.५ कोटी पाण्यात गेले आहेत. सेन्सेक्स ५७,३०० अंशांवर बंद झाला..
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूक दारांसाठी सोमवारचा दिवस काळा दिवस ठरला. बाजार तब्बल १७४७ अंशांनी कोसळला. गुंतवणूकदारांचे तब्बल १० लाख कोटींजे नुकसान झाले..
लआयसीचा आयपीओ म्हणजेच समभाग शेअर बाजारात दाखल करण्यास इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच इर्डा ने मंजुरी दिली आहे..
रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेकडून सलग दहाव्यांदा व्याजदरात काहीही बदल करण्यात आलेला नाहीये..
मेलकोटे : कर्नाटकच्या श्री चेलुवनारायण स्वामी मंदिर पुजाऱ्यांनी ‘सलाम आरती’ बंद करण्याची मागणी केली आहे. पुजारी आणि मंदिर कर्मचाऱ्यांनी कर्नाटक राज्य सरकारला ही प्रथा बंद करण्याची विनंती केली आहे. टीपू सुलतानने ज्यावेळी मंदिराला भेट दिल्यापासून या प्रथेची सुरुवात झाली होती. ती आजही सुरू आहे. मात्र, इतिहासकारांच्या म्हण्यानुसार, टीपूच्या भेटीचा पुरावा उपलब्ध नाही...
संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भुमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलीकडेच झाले. याबद्दल वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळाने मंगळवार, दि. २९ मार्च रोजी नवी दिल्ली येथे त्यांची भेट घेत आभार मानले. ..
रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक गुजरातमधील कर्णावती येथे रविवार, दि. १३ मार्च रोजी संपन्न झाली...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक शुक्रवार, दि. 11 मार्चपासून गुजरातमधील कर्णावती येथे सुरू झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीचा शुभारंभ केला. रविवार, दि. 13 मार्च रोजी ही बैठक संपन्न होणार आहे...
इजिप्तच्या सरकारने गव्हाची तातडीची गरज पूर्ण करण्यासाठी जागतिक बँकेकडून ५०० दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत मागितली आहे. जागतिक बँकेने सुरू केलेल्या ‘इमर्जन्सी फूड सिक्युरिटी अँड रेझिलियन्स सपोर्ट प्रोग्राम’मार्फत वित्तपुरवठा होईल अशी आशा आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत गव्हाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत कारण दोन्ही देश अन्नधान्याचे प्रमुख निर्यातदार आहेत, असे अल-मॉनिटरने वृत्त दिले आहे...
नेपाळच्या दौर्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लुंबिनी बौद्ध विद्यापीठात ‘डॉ. आंबेडकर बुद्धिस्ट स्टडीज् चेअर’ची स्थापन करण्यासाठी भारत सरकार सहकार्य करेल, अशी घोषणा केली आहे. ..
बुद्ध जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दि .१६ मे रोजी नेपाळच्या एक दिवसीय दौऱ्यावर जात आहेत. या दौर्यादरम्यान 'पश्चिम सेती प्रकल्प' विकसित करण्यासाठी भारत सरकारशी चर्चा वजा विनंती करण्याचा निर्णय नेपाळ सरकारने घेतला आहे. ..
'पेनसिल्व्हेनिया' मध्ये हिंदू मंदिराचे भूमिपूजन..
भारतही अमेरिकेतील मानवाधिकारांविषयी चिंतीत - सुब्रह्मण्यम जयशंकर, परराष्ट्र मंत्री..
भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक व्यवस्थेविषयी खोटी माहिती पसरविल्याप्रकरणी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 18 भारतीय आणि चार पाकिस्तानी ‘युट्यूब चॅनेल्स’वर बंदीची कारवाई केली. ‘माहिती-तंत्रज्ञान कायदा, 2021’ अंतर्गत प्रथमच भारतीय ‘युट्यूब चॅनेल’वर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. ..
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे गुरुवारी भारतात दाखल झाले...
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या सातत्याने संपर्कात आहे...
भारतीय क्षेपणास्त्र यंत्रणा अतिशय सक्षम आणि सुरक्षित आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत मंगळवारी केले...
सामूहिक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकाद्वारे हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ याचा संदेश देण्याचाही प्रयत्न असेल. आजच्या जगात जेथे हवामानविषयक जाणीव असणे अत्यावश्यक आहे, दैनंदिन जीवनात सौर ई-ऊर्जा (हरित ऊर्जा) मिळाल्याने पृथ्वीला धोका निर्माण करणारे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होईल. याशिवाय, हा कार्यक्रम आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत मकर संक्रांतीचे असलेले महत्त्व अधोरेखित करेल. सूर्यनमस्कार हा आठ आसनांचा एक संच आहे जो शरीर आणि मनाच्या समन्वयाने १२ चरणांमध्ये केला जातो. हे शक्यतो पहाटे ..
“काँग्रेसच्या वर्षानुवर्षांच्या सरकारांनी आजवर ईशान्य भारताकडे एक समस्या म्हणून बघितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारताच्या लगत असलेल्या देशांशी संबंध वाढवण्यावर व त्यातून ईशान्य भारताच्या आर्थिक, व्यापारी विकासावर भर दिला. ईशान्य भारतात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करत ‘हायवे’, ‘आयवे’, ‘रेल्वे’ आणि ‘एअरवे’ असा ’हिरा’ नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारताला दिला आहे,” असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी सा. ‘विवेक’च्या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेत केले...
मानवाधिकारांसाठी काम करणाऱ्या तथाकथित संघटना, संयुक्त राष्ट्राशी संबंधित संघटनांनी या प्रकारावर बाळगलेल्या मौनावरदेखील ठरावामध्ये टिका करण्यात आली आहे. ..
युरोपातील देशांप्रमाणे भारतात शून्य अपघात आणि शून्य जीवितहानी साध्य करणारी झिरो व्हिजन ही संकल्पना भारतात देखील स्वीकारली जात आहे, असेही गडकरी यांनी यावेळी नमूद केले...
‘पीएसएलव्ही-सी ५१’-‘अॅमेझोनिया-१’ उपग्रहाच्या प्रक्षेपणासह भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने २०२१ मधील आपली पहिली अवकाश मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा स्पेस पोर्टच्या प्रक्षेपण पॅडमधून प्रथमच भारतीय रॉकेटने ब्राझीलच्या ६३७ किलो वजनाच्या ‘पीएसएलव्ही-सी ५१’-‘अॅमेझोनिया- १’ उपग्रहाचे प्रक्षेपण केले. सोबतच इतर १८ उपग्रहांनाही अवकाशातील त्यांच्या नियोजित कक्षेत सोडण्यात आले. ..
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला कंगना रनौतचा 'धाकड' सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच आपटला. धाकडने कमाई देखील कशीबशी केली.
मराठी इंडस्ट्रीतील एक गुणी अभिनेता म्हणून सुबोध भावे याची ख्याती आहे. सुबोध भावे यानी गेली अनेक वर्ष नाटक, चित्रपट या क्षेत्रात चांगली प्रसिद्धी मिळाली आहे.
बिग बॉसचा प्रत्येक सिझन नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात असतो. त्यामुळेच बिग बॉसचे ओटीटी व्हर्जनसुद्धा आणण्यात आले
महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांना वेड लावणारा मराठी चित्रपट म्हणजे रवी जाधव यांचा 'टाइमपास'.
गेली अनेक वर्षे फक्त हिंदीच नाही तर बहुभाषिक प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उलटा चश्मा'. गेले अनेक दिवस या मालिके बाबत सतत नवनवीन चर्चा सुरू आहेत
सध्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांमध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा 'विक्रम वेध' हा एक चित्रपट आहे. चाहते या चित्रपटाची वाट पाहत असतानाच आता एका नव्या वादाने तोंड वर केले आहे.
खड्डे आणि मुंबई हे समीकरण अनेक वर्ष आपण ऐकत आलो आहोत. त्यामुळे पावसाळा आला की मुंबईच्या खड्ड्यांचा आणि पाणी तुंबण्याचा विषय आवर्जून येतो.
विविध चित्रपट आणि वेबसिरीज मधून प्रकाशझोतात आलेले अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी आपल्या अभिनयामुळे चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे.
सिनेस्टार्सपासून ते अगदी सर्वसामन्यांपर्यंत 'मिस इंडिया' हा किताब कोण मिळवणार ही चर्चा रंगली असताना रविवारी ३ जुलै रोजी या चर्चेला पूर्णविराम मिळाला आणि भारताला या वर्षीची नवी ब्युटी क्वीन मिळाली
२५ जून हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात खूप महत्त्वाचा आहे.