



आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत. इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.


अभिषेक चौधरी हे अभियंता ते धोरणतज्ज्ञ असा प्रवास केलेले व्यावसायिक असून, राजकारण, शासन आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या संगमावर त्यांचा दशकभराचा अनुभव आहे. हार्वर्ड केनेडी स्कूलच्या Mid-Career MPA कार्यक्रमातून त्यांनी उच्च शिक्षण घेतले असून, शैक्षणिक अभ्यासातून मिळालेली गहन समज आणि प्रत्यक्ष राजकीय क्षेत्रातील अनुभव यांचा संगम त्यांच्या कार्यात स्पष्टपणे जाणवतो. लोकशाहीची बदलती गती, नव्या तंत्रज्ञानाचे आव्हान, अंतर्गत सुरक्षेची गुंतागुंत आणि भारताची उदयोन्मुख जागतिक भूमिका या विषयांवर ते सातत्याने विचारमंथन व लेखन करतात, ज्यातून त्यांच्या विश्लेषणात्मक दृष्टिकोनाची झलक दिसते.
















सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.

@@ADSROUTINE@@






















