ठळक बातम्या
राजकारण जून. ०१, २०२३

सिंधी समाजाची बदनामी केल्यावर काय म्हणाले आव्हाड?

मी भाषण केलं भाषणात मी बोललो की, 'सौ जंगली कुत्ते मिलके, एक शेर का शिकार नही कर सकते' आणि तो व्हिडिओ एडिट करून मॉर्फ करून हा व्हिडिओ चालवण्यात आला असून सगळीकडे पसरवण्यात आला आहे. माझ्या बद्दल सिंधी समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला. मला माहित नाही हे कोणी केलं. पण ज्यांनी माझ्याबरोबर गुन्हा दाखल केला, त्यांनी हा व्हिडिओ आणला कुठून पोलीस कधीच चौकशी करणार नाही का? सत्याची परीक्षा घेणार की नाही? की आम्ही तपास तो व्हिडिओ तिथे टायपिंग करणारे हजारो लोक पत्रकार उपस्थित होते. त्यांनी पहिल्या दिवशी तो व्हिडिओ चा

18 Hr 36 Min ago
राजकारण मे. ३१, २०२३

अहिल्यादेवी, मल्हारराव यांचा इतिहास मान्य नसणाऱ्या लबाड लांडग्याला आपण हाकलून लावले!

अहिल्यादेवी, मल्हारराव यांचा इतिहास मान्य नसणाऱ्या लबाड लांडग्याला आपण हाकलून लावले. असा घणाघात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अहिल्यादेवी होळकर जयंतीवरून अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरून आमदार रोहित पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाकयुद्ध रंगले आहे. त्यातच आजही गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांसह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

1 Days 19 Hr ago
देश-विदेश जून. ०२, २०२३

CIBIL स्कोर कमी आहे म्हणून शैक्षणिक कर्ज नाकारता येणार नाही : केरळ उच्च न्यायालय

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जासंदर्भात हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. फक्त सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याने शैक्षणिक कर्जासाठी केलेला अर्ज बँक नाकारू शकत नाही, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे राष्ट्रनिर्माते आहेत. त्यांना भविष्यात या देशाचे नेतृत्व करायचे आहे. फक्त सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याने शैक्षणिक कर्जासाठी केलेला अर्ज बँक नाकारू शकत नाही, असे महत्वाचे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने दिले आहेत.

44 Min ago
देश-विदेश जून. ०१, २०२३

लव्ह जिहाद एक भयाण वास्तव : द मंचर स्टोरी

ही गोष्ट आहे २०१९ या वर्षातली. मंचरला रहाणारी एक १६ वर्षाची हिंदू मुलगी बेपत्ता होते. दहावीचा पेपर आटोपून घरी येणार होती. मात्र, ती काही परतच नाही. घरच्यांची शोधाशोध सुरू होते. वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मंचर पोलीस ठाण्यात देतात. आता थोडं मागे येऊयात.... जावेद शेख नावाचा एक तरुण हे सगळं घडवून आणत असतो. बेपत्ता मुलीच्या मैत्रीणीच्या संपर्कात जावेद आला. त्याने पीडितेच्या भोवती प्रेमाचं जाळं फेकलं. यासाठी दुसरं तिसरं कुणी नाही बेपत्ता मुलीच्या मैत्रिणीनेच पुढाकार घेतला होता. दरम्यान दोघांचे प्रेमसं

20 Hr 47 Min ago
देश-विदेश जून. ०१, २०२३

केरळ: अलप्पुझा-कन्नूर एक्स्प्रेस ट्रेनला आग, जाळपोळ झाल्याचा संशय!

अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसला कन्नूर रेल्वे स्थानकावर दि. ३१ मे रोजी रात्री भीषण आग लागली.अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. त्याचवेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यापूर्वीही दि. २ एप्रिल रोजी एका व्यक्तीने या ट्रेनला आग लावली होती, त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान यावेळी कन्नूर-अलाप्पुझा एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेस (१६३०६) कन्नूर रेल्वे स्थानकावर थांबलेल्या अज्ञात व्यक्तीचा सध्या पोलिसांनी शोध सुरू केल

22 Hr 47 Min ago
Videos
जरुर वाचा
महाराष्ट्र जून. ०१, २०२३

सावधान... ठाण्यात घोडागाडीची सैर जीवावर बेतु शकते!

ठाणे : ठाण्यात घोडागाडीची सैर करताय तर सावधान ... ठाण्याच्या तलावपाळीवर अशी सैर करताना एका कुटुंबाचा जीव सुदैवाने वाचला आहे. बुधवारी रात्री व्हिक्टोरियाची रपेट सुरू असताना अतिभारामुळे घोडागाडीच मोडुन पडल्याने प्रवाश्यांसोबतच घोड्याच्याही जीवावर बेतण्याचा प्रसंग ओढवला होता. सुदैवाने, पालिकेच्या सुरक्षारक्षकाने धाव घेत अडकलेल्या प्रवाश्यांची सुटका केल्याने सर्वानाच हायसे वाटले. मात्र, नियम धाब्यावर बसवुन चार पेक्षा अधिक प्रवाशी घेऊन सैर करणाऱ्या घोडागाड्यावर प्रशासनाने अंकुश ठेवण्याची मागणी होत आहे.

17 Hr 25 Min ago
महाराष्ट्र जून. ०१, २०२३

रायगडावर ३५०वा शिवराज्याभिषेकाचा भव्य सोहळा

मुंबई : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या राज्याभिषेकाचे यंदाचे ३५० वे वर्ष असून आज स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर मोठा जल्लोष करण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेकाचा ३५० वा सोहळा रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा होणार असून त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राज्य मंत्रीमंडळातील अनेक मंत्री आणि अनेक लोकप्रतिनिधी या सोहळ्याला हजेरी ला

17 Hr 45 Min ago
महाराष्ट्र जून. ०१, २०२३

राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची आणि देशाची माफी मागावी!

मुंबई : कॉग्रेस नेते राहुल गांधी हे परदेशात जावुन आपल्या देशाचा अपमान करतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे लोकशाही मार्गाने निवडुन आलेले प्रधानमंत्री आहेत. प्रधानमंत्र्यांचा अपमान हा देशाचा अपमान आहे. देशाच्या अंतर्गत विषयांवर परदेशात जावुन टिका करणे आणि आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याचा अपमान करणे हा आपल्या देशाचा अपमान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या परदेशात जावुन आपल्या देशाचा वारंवार अपमान करणा-या त्यांच्या वृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो. राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची माफी मागितली पाहि

18 Hr 9 Min ago
देश-विदेश मे. ३१, २०२३

२६/११ च्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणाऱ्याचा मृत्यू

मुंबई : २६/११ चा दहशतवादी हल्ला अजूनही मुंबईकर विसरु शकलेले नाहीत. या हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यु झाल्याचे वृत्त आहे. ही ट्रेनिंग देणारी व्यक्ती लष्कर ए तोयबाचा कमांडर अब्दुल सलाम भुट्टावी होती. याच भुट्टावीचा मृत्यु झाल्याचे वृत्त आहे. कमांडर भुट्टावी हा पाकिस्तानात कैदेत होता. तेथे शिक्षा भोगत असताना त्याचा हृद्यविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यु झाला. भुट्टावीला संयुक्त राष्ट्र संघटनेने २०१२ साली दहशतवादी म्हणून घोषित केले होते. तसेच, त्याला २०२० मध्ये दहशतवाद्

1 Days 19 Hr ago
देश-विदेश मे. ३१, २०२३

गोरखपूरला फिल्मसिटी बनवण्याचे स्वप्न : रवी किशन

मुंबई : उत्तर प्रदेशातील गोरखपूरला फिल्मसिटी बनविण्याचे आपले स्वप्न असल्याचे खासदार अभिनेता रवी किशन यांनी म्हटले आहे. गोरखपूर येथे फिल्मसिटी उभारण्याची आपली इच्छा असल्याचेही ते म्हणाले. गोरखपूरच्या १५० एकर जागेवर सध्या काम सुरू असल्याचे समजते आहे. तेथे फिल्मसिटी निर्माण केली जात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, गोरखपूर येथील १५० एकरवर सुरु असलेले काम हे चित्रनगरी उभारण्यासाठी एका योजनेवर काम सुरु असून ही एक प्रादेशिक फिल्मसिटी असेल, असेही रवी किशन म्हणाले. मनिष तिवारी दिग्दर्शित 'चिडियाखाना' या २ जूनला प्र

1 Days 20 Hr ago
महाराष्ट्र मे. ३१, २०२३

सिंधुदुर्गवासीयांसाठी मोठी बातमी! वंदे भारत एक्सप्रेस कणकवलीत थांबणार

मुंबई : आमदार नितेश राणे यांच्या मागणीला यश मिळाले आहे. कोकणात धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला कणकवलीत थांबा मिळणार आहे. नितेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे वंदे भारत आता कणकवली स्थानकातही थांबणार आहे. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसने जाणाऱ्या सिंधुदुर्गवासीयांना याचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे, सिंधुदुर्गवासीयांना ही एक अनोखी भेट असणार आहे. कणकवलीत थांबणार असल्याकारणाने सिंधुदुर्गवासीयांना वंदे भारतला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. आमदार नितेश राणे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. आता त्यांची मागणी मान्य

1 Days 21 Hr ago