चंद्रपूरच्या वाघांचे करायचे काय?
चंद्रपुरातील सिंदेवाही येथील जंगलात तेंदू पत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने केलेल्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला. यामुळे चंद्रपुरातील वाढत्या मानव-व्याघ्र संघर्षावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. राज्यातील सर्वांत जास्त वाघांची संख्या ही चंद्रपूर जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील मानव-व्याघ्र संघर्षाला जेवढी वाघांची वाढलेली संख्या कारणीभूत आहे, तेवढेच तेंदू आणि मोह फुले संकलनासाठी संरक्षित जंगलात जाणारे गावकरीदेखील वाढत्या संघर्षाला कारक आहेत. त्यामुळे हा प्रश्न उपाययोजनांचा राहिलेला नसून गावकर्य





