मुंबईत जलवाहतुकीचे नवे पर्व
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या पायाभूत सुविधांनी अभूतपूर्व वेग घेतला आहे. लोकल आणि मेट्रोने शहराच्या प्रवासाला नवी दिशा दिल्यानंतर, लवकरच जलवाहतुकीचे मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून जलमेट्रोच्या माध्यमातून उपनगरीय वाहतुकीचे नवे पर्व मुंबई महागर प्रदेशात सुरू होइल. या पार्श्वभूमीवर मुंबईत आकार घेणार्या या जलवाहतूक क्रांतीचा आढावा घेऊया.





