नोआखाली ते संदेशखाली - भाग २ : फाळणीच्या जखमांपासून काँग्रेसपतनापर्यंतचा प्रवास
भारताच्या फाळणीनंतर दि. १४ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री पूर्व पाकिस्तान (नंतर झालेला बांगलादेश) व पश्चिम पाकिस्तान या नव्या राष्ट्राची निर्मिती झाली आणि त्यासोबतच भारताच्या सामाजिक, राजकीय आणि भौगोलिक समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली. अस्तित्वाच्या आणि असुरक्षितेच्या भीषण छायेखाली भारताच्या सीमा पुढील अनेक वर्षे धुमसत राहिल्या.





