करिते जीवनाची भैरवी...
स्वरसम्राज्ञी आशाताईंचा स्वर अखेर निमाला... त्यांनी प्रत्येक शब्दाला केवळ संगीतबद्ध केले नाही, तर त्यात प्राण ओतला, त्याला स्पंदन दिले, अर्थ दिला, आयुष्य दिले. आशाताईंच्या आवाजात एक विलक्षण चैतन्य होते. क्षणात खट्याळ हसू, क्षणात अंतर्मुख शांतता, तर क्षणात उत्कट भावनांचा ओघ. म्हणूनच त्यांच्या सुरांनी काळाचे बंधन ओलांडले; पिढ्यान्पिढ्या त्यांनी मनांवर आपले गारूड कायम ठेवले. त्यांच्या गाण्यांतून माणूस स्वतःला भेटला, हरवला आणि पुन्हा सापडलादेखील. आज त्या सूरांचीच भैरवी झाली आहे. रंगमंचावर संगीतकला सादर करताना





