इंधन बचत आजच्या परिस्थितीत महत्वाचे नागरी कर्तव्य
आखाती युद्धाच्या गंभीर परिणामांचा विचार करता, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले आणि त्यांच्या आवाहनाला आज सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाददेखील मिळताना दिसतो. तेव्हा, भारताचे एक जबाबदार, कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपणही पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा. त्याचबरोबर या आवाहनामागची पार्श्वभूमी आणि त्याचे गांभीर्यही लक्षात घेण्यासाठीचा हा लेखप्रपंच...





