बाबासाहेबांच्या धम्मप्रवासातील माईसाहेब
बुद्धपौर्णिमेला केवळ भगवान गौतम बुद्धांची आठवण होत नाही, तर भारतीय समाजातील समता, विवेक आणि मानवी स्वाभिमानाच्या संघर्षाचाही इतिहास समोर उभा राहतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्या धम्माला आधुनिक सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली. मात्र, या संपूर्ण धम्मक्रांतीच्या निर्णायक काळात त्यांच्या सोबत शांतपणे उभे असलेले एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. सवितामाई आंबेडकर. बाबासाहेबांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची प्रकृती, धम्मदीक्षेची तयारी, लेखनकार्य आणि सततचा मानसिक ताण या सगळ्या परिस्थितीत माईसा





