१७२ गावांचा ऐतिहासिक संकल्प; एकतारा गुरुकुलची ‘गृह गुरुकुल’ चळवळ
पालघर जिल्ह्यातील वाडा येथे एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. दि. १९ मार्च रोजी गुढीपाडवा व चैत्र नवरात्रीनिमित्त ‘एकतारा गुरुकुल’तर्फे आयोजित ‘त्रिकर्म उत्सवा’दरम्यान १७२ गावांतील १ हजार, ८ कुटुंबांनी ‘गृह गुरुकुल’ उभारण्याचा सामूहिक संकल्प घेतला. हा उपक्रम देशासाठी नवे सामाजिक मॉडेल म्हणून पुढे येत आहे. या उपक्रमाचा सारांश मांडणारा हा लेख...





