संपादकीय

Trending Videos

श्रावण पाळावा म्हणजे नेमकं काय करावं? | दा. कृ. सोमण

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे. बालकवींच्या या ओळी आपल्या सगळ्यांनाच अगदी तोंडपाठ आहेत. श्रावण मास म्हटलं की निसर्गाचं चैतन्मय रुप आपल्याला अनुभवायाला मिळतं. दुसऱ्या बाजूला शक्तीची, भक्तीची आराधना करणारे उत्सव यावेळी समजात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करतात. श्रावण मासातील व्रत वैकल्यांचे नेमके महत्व काय? श्रावण मासाशी संदर्भात मिथकांची सत्यता नेमकी काय आहे? आधुनिक काळात कुठले व्रत आपल्यासाठी उपयुक्त आहेत? या आणि असंख्य विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. ज

महाराष्ट्र जुलै. २६, २०२५

विद्यार्थ्यांसाठी आनंदवार्ता! कृषीपदवी अभ्यासक्रम प्रवेश अटीत शिथिलता; कृषीमंत्र्यांची माहिती

कृषीपदवी अभ्यासक्रम प्रवेश अटीत शिथिलता करण्याचा निर्णय घेत कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विशिष्ट गुणांची अट शिथिल करत खुल्या प्रवर्गासाठी ४५ टक्के आणि आरक्षित प्रवर्गासाठी ४० टक्के गुण आवश्यक असल्याचा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेतल्याची माहिती कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.

1 Days 6 Hr ago
देश-विदेश जुलै. २५, २०२५

पंतप्रधान मोदींनी इंदिरा गांधींना टाकलं मागे! सर्वाधिक काळ पद भूषवणारे दुसरे पंतप्रधान

(PM Narendra Modi breaks Indira Gandhi's record) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवीन विक्रम केला आहे. देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडीत काढून आपल्यानावे केला आहे. सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधानपद भूषवणारे नरेंद्र मोदी हे दुसरे नेते ठरले आहेत. त्यांनी आज म्हणजेच शुक्रवार, दि. २५ जुलै रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून ४०७८ दिवस पूर्ण केले आहेत. सलग सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधानपद भूषवण्याच्या बाबतीत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आघाडीवर आहेत. त्यांच्यानंतर इंदिरा गा

2 Days 10 Hr ago
जरुर वाचा
महामुंबई जुलै. २७, २०२५

पोटच्या मुलींना विष देणाऱ्या क्रूर मातेचा पर्दाफाश; पाच दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातीलअस्नोली गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, पोटच्या तीन सख्ख्या मुलींना विष घालून हत्या करणाऱ्या आईला पोलिसांनी रविवारी पहाटे अटक केली. काव्या (वय १०), दिव्या (वय ८) आणि गार्गी भेरे (वय ५) अशी मृत झालेल्या मुलींची नावे असून, संध्या संदीप भेरे (रा. चेरपोली) असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात तिन्ही मुलींच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी आईला रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

3 Hr 25 Min ago
महाराष्ट्र जुलै. २६, २०२५

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर दुसरा

1 Days 4 Hr ago
महाराष्ट्र जुलै. २४, २०२५

गणेशोत्सवावरील विघ्न टळले - ६ फुटांखालील मूर्तींसाठी कृत्रिम तलाव बंधनकारक; मोठ्या मूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्यास सशर्त परवानगी

प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ६ फुटांपेक्षा कमी उंचीच्या सर्व पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करणे बंधनकारक केले आहे, तर ६ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तींसाठी समुद्र, नदी किंवा तलावात विसर्जनाला सशर्त परवानगी दिली आहे. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने गुरुवारी दिलेल्या या निर्देशांचा प्रभाव यंदाच्या नवरात्र, दुर्गापूजा ते पुढील वर्षीच्या माघी गणेशोत्सवापर्यंत कायम राहील, अस

3 Days 3 Hr ago

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121