नागपूर दंगलीचा कथित सुत्रधार फहीम खान सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याचे घर बेकायदा आढळून आल्याने नागपूर महापालिकेने २४ तासांचा अल्टीमेटम देत त्याच्या घरावर थेट बुलडोझर फिरवल्याचे समोर आले.
Read More
उरुस-दंगलीनंतर हिंदूंचे नुकसान करण्याचा काळ आता संपला आहे. सर्वसामान्य हिंदूंपासून ते प्रशासन, राजकीय पक्ष दंगेखोरांना योग्य धडा शिकवण्याच्या मानसिकतेत आले आहेत. त्यामुळे समाज म्हणून आपले आदर्श कोण, औरंगजेब की अब्दुल कलाम, हे आता मुस्लीम समाजाने ठरवावे.
Nagpur Riots राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरातील दंगलीवरून आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. त्यातून देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे. नुकत्याच नागपूरातील झालेल्या दंगलीत झालेल्या नुकसानाची भरपाई दंगलखोरांकडून होणार आहे.
नागपूर दंगल १७ मार्च २०२५ रोजी घडली होती. याच दंगलीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. आजही त्याचे विपरित पडसाद कायम असल्याचे दिसून येत आहेत. कट्टरपंथी जमावाने तुळस असणाऱ्या घरांवर हल्ला केला. देव देवतांच्या मूर्तींवर, घरांवर, वाहनांवर हल्ला चढवण्यात आला होता. या दंगलीनंतर नागपूरात शांतता असली तरीही परिस्थिती अद्यापही परिपूर्ण निवळली नसल्याचे दिसून येत आहे.
सोमवारी दिल्लीत ‘वक्फ’ कायद्यातील सुधारणांविरोधात झालेल्या धरणे आंदोलनात भडकाऊ आणि हिंसक भाषा वापरली गेली आणि त्याच्या दुसर्याच दिवशी नागपूरमध्ये दंगल घडविण्यात आली, हा योगायोग नक्कीच नाही. औरंगजेबाची कबर नागपूरपासून तब्बल ४५० किमी दूर. तरी या शहरात दंगल घडविण्यामागे आपले हिंसक उपद्रवमूल्य दाखवून देण्याचा प्रयत्न होता. या दंगलीचे देशाच्या अन्य भागांतील दंगलींशी खूपच साधर्म्यदेखील आहेच. या महिनाअखेरीस नागपूरमधील संघाच्या मुख्यालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर घडविलेल्या दंगलील
नागपूर दंगलीचे पडसाद आता देशात उमटू लागले आहेत. छत्रपती संभाजीनगरात असलेल्या मुघलशासक औरंगजेबाच्या कबरीवरून हिंसाचार झाल्याचे दिसून येत आहे. अशातच आता पोलिसांनी फहीम खानसोबत इतर ५१ जणांना अटक करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. कुराणचे पान जाळल्याच्या एका अफवेमुळे निष्पाप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे दंगलखोर कट्टरपंथींना आपल्याच लोकांना अटक करण्यात आली असे वाटत आहे. मात्र, पोलिसांनी कोणतीही तडजोड न करता आता हिंदूंना त
नागपूर दंगलीत हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले होते. त्याच ठिकाणी मुस्लिमांचीही दुकाने असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी मुस्लिम जमावाने घडवून आणलेल्या दंगलीमुळे प्रभावित झालेल्या हिंदूंनी असा एकतर्फी बंधुभाव कसा टिकवून ठेवता येईल असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, नागपुरातील दंगलखोरांवर पोलीस सातत्याने अॅक्शन घेत असून संबंधित संवेदनशील परिस्थिती अटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ही घटना नागपुरात १७ मार्च रोजी घडली होती.
नागपूरमध्ये १७ मार्च २०२५ रोजी झालेल्या दंगलीप्रकरणातील हिंसाचारातील आरोप फहिम खानला गणेशपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फहिमवा न्यायालयात हजर करण्यात आले आहे. ज्या ठिकाणाहून त्याला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फहीमवर दंगल भडकवण्याच्या आणि लोकांना चिथावणी देण्याचा आरोप करण्यात आला आहे.
नागपूर दंगलीमुळे राज्य ढवळून निघाले आहे. १७ मार्च रोजी झालेल्या या नागपूरातील दंगलीतील प्रमुख आरोपी फहीम खानच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. औरंगजेबाची कबर तोडण्यावरून हिंदूंनी आपली आक्रमकता दर्शवली आहे. तर दुसऱ्या बाजूला कट्टरपंथी कायदा हातात घेण्याचे काम करत आहेत. अशातच आता इंडिया टुडेचे पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी नागपुरात झालेल्या हिंसाचाराचे समर्थन केले आहे. ज्या ठिकाणी मुस्लिम जमावाने तोडफोड आणि दगडफेक करत नकारात्मक परिस्थिती निर्माण केली आहे.
Hanif arrested दिल्लीमध्ये २०१९ साली नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान दक्षिण – पूर्व दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये झालेल्या हिंसाचारातील एका आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मोहम्मद हनीफ हा शाहीन बागचा रहिवासी आहे.
( Sharjeel Imam is the leader of the anti-CAA riots in Delhi ) सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) दिल्लीत मोठ्या प्रमाणात दंगल, जाळपोळ आणि हिंसाचार घडवून आणणाऱ्या कटाचा सूत्रधार शर्जिल इमाम असल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल सिंग यांनी सांगितले आहे.
Congress दिल्लीतील विशेष न्यायालयाने 1984च्या शीखविरोधी दंगलींदरम्यान झालेल्या हत्येच्या प्रकरणात काँग्रेसचा माजी खासदार सज्जन कुमार यास नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसने पद्धतशीरपणे शिखांच्या केलेल्या शिरकाणाच्या षड्यंत्रावर शिक्कामोर्तब झाले. डॉ. मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांनी या प्रकरणी औपचारिक माफीचे सोपस्कार काही वर्षांपूर्वीच पार पाडले असले, तरीही शीख समुदायाला भोगाव्या लागलेल्या जखमा अजूनही भळभळत्याच आहेत. तेव्हा, या संपूर्ण प्रक
Sajjan Kumar शीखविरोधी झालेल्या १९८४ च्या शीख दंगलीप्रकरणी दिल्लीमध्ये एव्हेन्यू कोर्टाने काँग्रेस नेते सज्जन कुमार (Sajjan Kumar) यांना दोषी ठरवले आहे. दंगलीदरम्यान १ नोव्हेंबर १९८४ रोजी जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग नावाच्या शीख सरस्वती विहारमध्ये ठार झाला होता. या प्रकरणी सज्जन कुमारला दोषी ठरवण्यात आले. सज्जन कुमारच्या शिक्षेवरही आता १८ फेब्रुवारी रोजी न्यायालयामध्ये चर्चा करण्यात आली आहे.
अयोध्येतील बाबरी ढाचा पाडल्यानंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जातीय दंगली उसळल्या होत्या. या दंगलींमध्ये सुमारे ९०० लोक मारले गेले. या दंगलीतील आरोपी सय्यद नादिर शाह अब्बास खान याला ३१ वर्षानंतर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.
सीएए-एनआरसी कायद्याला विरोध करण्याच्या आडून झालेल्या दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदच्या जामिनावर बुधवार, दि. १० एप्रिल २०२४ दिल्लीच्या कर्करडूमा न्यायालयात सुनावणी झाली. यादरम्यान सरकारी वकिलाने सांगितले की, उमर खालिदच्या बाजूने न्यायव्यवस्थेवर प्रभाव टाकण्यासाठी मीडिया हाऊस, कथीत सामाजिक कार्यकर्ते आणि गैर-सरकारी संस्था (एनजीओ) द्वारे मीडिया आणि सोशल मीडियामध्ये खोटे नॅरेटिव्ह तयार केली जात आहे.
बरेली येथील २०१०च्या हिंदूविरोधी दंगलीमागील सूत्रधार म्हणून कट्टरपंथी इस्लामी धर्मगुरू मौलाना तौकीर रझा खान याला घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील अतिरिक्त सत्र न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. दरम्यान, या दंगलप्रकरणी कट्टरपंथी मौलाना याला दि. ११ मार्च रोजी समन्स बजावण्यात आले आहेत.
दिल्ली दंगलीतील मुख्य आरोपी उमर खालिदने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे. त्याच्या जामिनावर दि. १४ फेब्रुवारी २०२४ बुधवारी सुनावणी होणार होती. खालिदचे वकील कपिल सिब्बल यांनी याला दुजोरा दिला आहे. याचिका मागे घेण्यामागे परिस्थितीतील बदलाचे कारण सांगण्यात आले आहे. आता उमर खालिद कनिष्ठ न्यायालयात जामीन मिळण्याच्या शक्यता तपासणार आहे. मात्र, जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयात उमर खालिदचे जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळण्यात आले आहेत.
उत्तराखंडमधील हल्दवानी येथील दंगलीचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक याला अटक करण्यात आली आहे. परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा आता दंगलखोरांना पकडण्यात गुंतल्या आहेत. बनभूलपुरा येथे 5 दंगलखोरांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये समाजवादी पक्षाच्या एका नेत्याचा भाऊ, दोन नगरसेवक आणि एका खाण व्यावसायिकाचा समावेश आहे. या हिंसाचाराच्या मुख्य सूत्रधारांपैकी अब्दुल मलिकचे नाव समोर आले असून त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.
न्यायालयाने दि. ३१ जानेवारी २०२४ बुधवारी २०२० साली दिल्लीत झालेल्या दंगलीत दोन दोषींना शिक्षा ठोठावली आहे. नूर मोहम्मद उर्फ नूरा आणि नबी मोहम्मद असे या आरोपींची नावे आहे. या खटल्यात सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले की, "जे गुन्हे घडले ते द्वेष आणि लालसेने प्रेरित होते." या खटल्यात नबी मोहम्मदने आधीच सुनावलेली शिक्षा पुरेशी मानून न्यायालयाने नूराला चार वर्षांच्या शिक्षा सुनावली.
बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या ११ दोषींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय गुजरात सरकारने दिला होता होता. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला केला आहे. एकीकडे या निकालाबद्दच चर्चा होत असताना दुसरीकडे अभिनेत्री कंगना राणावत बिल्किस बानो हिच्यावर चित्रपट करण्याच्या तयारीत आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भीमा कोरेगाव दंगल आणि दिल्लीतील हिंदूविरोधी दंगलीतील संबंधित भूमिकांसाठी अटक करण्यात आलेल्या शोमा सेन आणि उमर खालिद यांचे समर्थन करणारी प्रतिक्रीया नोंदवली आहे. आपल्या 'एक्स' अकाउंटवर त्यांनी यासंदर्भात पोस्ट केली आहे.
मध्य प्रदेश राज्यात प्रचारादरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, "राहुल यांच्या पक्षाला सनातनला संपवायचे आहे." काँग्रेस विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. याच आघाडीतील द्रमुक पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माला नष्ट करण्याची धमकी दिली होती.
केंद्र सरकार हरियाणाच्या मेवातमध्ये रॅपिड अॅक्शन फोर्स (आरएएफ) चे विशेष आणि कायमस्वरूपी स्टेशन स्थापन करणार आहे. मुस्लिमबहुल असलेला हा जिल्हा अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरच आरएएफच्या कायमस्वरूपी स्टेशनची पायाभरणी करणार आहेत.
हरियाणाच्या नूंह जिल्ह्यात सोमवारी (३१ जुलै २०२३) जलाभिषेक यात्रेवर कट्टरपंथी जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात अनेक निर्दोष लोकांचा बळी गेला आहे. प्रदीप कुमारही या हिंसाचाराला बळी पडले आहेत. नल्हाड मंदिराजवळ झालेल्या हल्ल्यात प्रदीप कुमारला सुखरूप बाहेर पडले होते. पण कट्टरपंथीयांनी मंगळवारी (१ ऑगस्ट २०२३) त्यांची घरी जात असताना हत्या केली ऑप इंडियाने प्रदीप कुमार यांच्यासह घटनेच्या वेळी उपस्थित कपिल कुमार त्यागी यांच्याशी चर्चा केली. या हल्ल्यात कपिल त्यागींही दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कप
कट्टरपंथीय दंगलखोरांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. हिंदुस्तान टाइम्सने प्रकाशित केलेल्या एका अहवालात हल्लेखोरांनी हरियाणाच्या मुस्लिम बहुल नूंह जिल्ह्यामध्ये जलाभिषेक यात्रेवर हल्ला करण्याची योजना कशी आखली याचा खुलासा करण्यात आला आहे.
३१ जुलै २०२३ रोजी हरियाणातील मेवात येथील नूह येथे हिंदूंच्या ब्रज मंडळ जलाभिषेक यात्रेवर कट्टरपंथीयांनी हल्ला केला. दगडफेक, जाळपोळ आणि गोळीबाराच्या घटना घडल्या. हिंसाचारग्रस्त भागात अजूनही हजारो यात्रेकरू अडकले आहेत, असे मीडिया अहवालात म्हटले आहे. दरम्यान, हिंसाचाराची आग गुरुग्राममधील सोहनापर्यंत पोहचली आहे. येथेही वाहनांना आग लावल्याचे वृत्त आहे.
३१ जुलै २०२३ (सोमवार) रोजी हरियाणातील नूह येथे जलाभिषेक यात्रेदरम्यान हिंसाचार झाला. या हिंसाचारात २ होमगार्ड जवानांसह एकूण ३ जणांचा मृत्यू झाला. परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ताज्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२३ रोजी हरियाणाच्या नगीना परिसरातून आणखी ३ मृतदेह सापडले आहेत.
नवी दिल्ली (पार्थ कपोले) : गोध्रा कांडानंतर झालेल्या गुजरात दंगलीमध्ये विविध क्षेत्रातील प्रमुख हिंदू व्यक्तींना गोवण्यात आले. त्यांच्याविरोधात छद्म-धर्मनिरपेक्ष माध्यमे आणि संघटनांनी धिंगाणा घातला, ज्यामुळे आरोपींना विनाकारण दीर्घकाळ कोर्टबाजीस सामारे जावे लागले, असा निकाल देऊन गुजरातमधील एका न्यायालयाने ३५ हिंदूंची मुक्तता केली आहे.
२००२ च्या गुजरात दंगलीत निर्दोष लोकांना अडकावण्याचा कट रचणाऱ्या तीस्ता सेटलवाडच्या जामीन अर्जाला गुजरात सरकारने उच्च न्यायालयात विरोध केला आहे.
मणिपूरमधील ११ मोठी मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. मणिपूरमधील हिंसाचारात मंदिरांप्रमाणेच अनेकांची घरेदारे नष्ट करण्यात आली. जाळून टाकण्यात आली. हिंसाचाराची झळ पोहोचलेल्यांना विश्व हिंदू परिषदेकडून अन्नधान्य, आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जात आहे. मणिपूरमधील शांतता बिघडविण्याचे प्रयत्न ज्या असामाजिक तत्वांकडून केले जात आहेत, त्यांचा कठोरपणे बिमोड करावा, अशी मागणीही विहिंपने केली आहे.
ब्रिटनमध्येही हिंदूंना लक्ष्य करण्याचे, त्यांच्यावर हल्ले करण्याचे आणि त्यांना मुस्लीम बनविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी ‘पॅटर्न’ तोच आहे, जो नव्वदच्या दशकात जम्मू-काश्मीरमध्ये वापरण्यात आला. तो म्हणजे ‘रलिव गलिव चलिव.’
पंतप्रधानांनी अतिशय शांततेत मात्र ठामपणे भाजप विरोधी पक्षांच्या आता कोणत्याही प्रकारच्या आरोपांना जशास तसे प्रकाराने उत्तर देणार असल्याचेही आपल्या भाषणातून स्पष्ट केले आहे. उद्घाटन कार्यक्रमास भाजपचे सर्व खासदार, राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे त्यांनादेखील भाषणातून योग्य तो संदेश पोहोचेल, याची काळजी पंतप्रधानांनी यावेळी घेतली. त्याचप्रमाणे आधुनिकता आणि नावीन्य अशी भाजपची ओळख असल्याचेही त्यांनी सांगितले.
”माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत झालेल्या १९८४च्या दंगलीवर माहितीपट का नाही,” असा थेट सवाल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी उपस्थित करत ‘बीबीसी’च्या वर्मावरच बोट ठेवले आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ‘बीबीसी’चा एकांगीपणा उघड केला.
इंग्लंडमधील लिसेस्टर शहरात नुकतीच उसळलेली दंगल म्हणजे, सोशल मीडियाची एक वाईट बाजू जगासमोर मांडणारे आणखीन एक ज्वलंत उदाहरण! केवळ ‘फेक न्यूज’च्या जोरावर ही दंगल भडकवण्यात काही लोक यशस्वी ठरले. सर्वांत चिंतेची बाब म्हणजे, इंग्लंडसारख्या प्रगत देशामधील मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रेदेखील या अपप्रचाराला बळी पडली. म्हणूनच प्रश्न उपस्थित होतो की, हिंदूंच्याच विरुद्ध हे बंड का? लिसेस्टरच का? खरोखर तिथे काय घडलं? आता पुढे काय? ही दि. 19 जानेवारी, 1990च्या काश्मीर नरसंहाराची पुनरावृत्ती होतेय का? अशाच काही प्रश्नांची शह
उत्तर प्रदेशात सलग दुसर्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या उपाययोजनांमुळे उत्तर प्रदेश आता संपूर्ण दंगलमुक्त राज्य झालेे आहे. त्यानंतर आता योगींनी शिक्षण व्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे
नवी दिल्ली : तीस्ता सेटलवा हिने राजकीय, आर्थिक आणि अन्य लाभ प्राप्त करण्यासाठी आपल्या साथीदारांसह गुन्हेगारी कृत्य केले आहे. त्याचप्रमाणे एका राजकीय नेत्याच्या इशाऱ्यावर गुजरात दंगलप्रकरणी खोटे पुरावे सादर करण्याचे कृत्यदेखील तपासाअंती सिद्ध झाले आहे, असे सांगून गुजरात सरकारने कथित सामाजिक कार्यकर्ती तीस्ता सेटलवाड हिच्या जामीन अर्जा,स विरोध केला आहेय. याप्रकरणी आज, मंगळवारी सुनावणी होणार आहे.
नवी दिल्ली : गुजरात दंगलीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गोवण्याचा प्रयत्न करण्यासाठी गुन्हेगारी कट रचण्याचा आरोप असलेली कथित सामाजिक कार्यकर्ती तीस्ता सेटलवाड हिच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात ३० सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
गुजरात पोलिसांच्या गुन्हे शाखेने पालनपूर तुरुंगात असलेले माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना दि. १२ जुलै रोजी अटक केली. गुजरात दंगलीप्रकरणी पोलिसांनी माजी वरिष्ठ अधिकारी आरबी श्रीकुमार आणि कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना अटक केल्यानंतर काही दिवसांनी ही अटक झाली. पुरावे तयार केल्याच्या आरोपाखाली दोघांनाही अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
जिहादी कट्टरतावादास ‘गंगा-जमुनी तहजीब’ असे नाव देऊन हिंसाचाराला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्याचे काम ‘तिस्ता’पंथ दीर्घकाळपासून करत आहे. या पंथास सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाद्वारे दणका बसला आहे. कारण, न्यायालयाने या पंथाची कार्यशैलीच उघडकीस आणली आहे. मात्र, ‘तिस्ता’पंथ आता नव्या कार्यशैलीद्वारे आणि नव्या चेहर्यानिशी सक्रिय होण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. त्यामुळे आगामी काळात अशा ‘तिस्ता’पंथाचा धोका ओळखणे हे भारतीय समाजासाठी गरजेचे आहे.
इकडे गुजरात दंगल प्रकरणी नरेंद्र मोदींना क्लिन चीट मिळाली आणि दुसरीकडे याच प्रकरणात चुकीच्या माहितीचा प्रचार प्रसार करणाऱ्या तिस्ता सेटलवाड यांना अटक झाली. ही अटक नेमकी आत्ताच का झाली? ही कारवाई सुडबुद्धीने झालीयं का?, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले. तिस्ता सेटलवाड यांचा गुन्हा नेमका काय? जाणून घेऊयात पुढील पाच मुद्द्यांतून
गुजरातमध्ये 2002 साली उसळलेल्या दंगल प्रकरणात नरेंद्र मोदींना खलनायक ठरवण्यासाठी काँग्रेसी, डाव्या व ढोंगी पुरोगामी, भोंदू धर्मनिरपेक्षतावाद्यांनी कुभांड रचले. मात्र, नरेंद्र मोदींना गुन्हेगार ठरवण्यासाठी तयार केलेल्या पर्सेप्शनचा, ते पर्सेप्शन तयार करणार्यांचा, त्या पर्सेप्शनसाठी लढणार्यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातूनच सुपडा साफ, सपशेल पराभव झाल्याचे स्पष्ट होते.
प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात नूपुर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने धर्मांध दंगेखोरांकडून पश्चिम बंगालमध्ये मोठ्याप्रमाणावर हिंसाचार केला गेला. त्याविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना, राज्य पोलीस राज्यात उसळलेली दंगल रोखण्यासाठी असमर्थ ठरत असल्यास पश्चिम बंगाल सरकारने केंद्रीय दलांना बोलावले पाहिजे, असे मत नोंदवत कलकत्ता उच्चन्यायालयाने ममता बॅनर्जींच्या तृणमूल सरकारला फटकारले.
जम्मू-काश्मीर खोर्यामध्ये काश्मिरी पंडितांना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्याच्या प्रकारांचा देशातील सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध करायला हवा.
आम्हाला काय करायचे आहे, देवाचे बाप असा नाही तर सैतानाचे रूप असा. तुमचं तोंड कसंही वाजवा. पण ते ‘सेक्युलर’ तोंड नेहमी देवाच्याबाबतच का वाजते? यावर विचार करणे गरजेचे आहे.
उत्तर-पश्चिम दिल्लीतील जहांगीरपुरी येथे गेल्या महिन्यात हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत जातीय हिंसाचार करणार्या आणखी तीन आरोपींना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
“२०१८ साली पुण्यातील ‘एल्गार परिषदे’नंतर कोरेगाव-भीमाममध्ये उसळलेल्या हिंसाचाराबद्दल आपल्याकडे काहीही माहिती उपलब्ध नाही,” असे अतिरिक्त प्रतिज्ञापत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जे. एन. पटेल आयोगासमोर सादर केले आहे.
हिंदूबहुल भागांमध्ये जाणीवपूर्वक बेकायदेशीर वस्त्या वसविणे आणि तेथे बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांना आश्रय दिला जातो.
रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी देशभरात हिंसाचार आणि दंगली झाल्याच्या बातम्या समोर येत असून दिल्लीमधील जहांगीरपुरीत हनुमान जयंतीच्या दिवशी मोठा हिंसाचार झाला. या हिंसाचारात ८ पोलिसांसह ९ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २५ आरोपींना अटक केली असून अशा दंगली रोखण्यासाठी माजी आयपीएस आणि पुद्दुचेरीच्या माजी एलजी किरण बेदी काही सूचना केल्या आहेत. दंगली रोखण्यासाठी किरण बेदी यांनी पुढील ७ उपाय सुचवले आहेत.
"मुख्यमंत्री गेहलोत यांच्या राज्यात राजस्थानमध्ये तालिबानी शासन लागू झाले आहे. हिंदूंना त्यांचे सण- उत्सव साजरे करण्यापासून रोखले जात आहे, भीतीचे वातावरण तयार केले जाते आहे" असा आरोप राजस्थानमधील भाजप नेते सतीश पुनिया यांनी केला आहे
१९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील आरोपी जगदीश टायटलर यांना प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये स्थायी सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी टायटलर यांचा राज्य काँग्रेस कमिटीत समावेश केला आहे. टायटलरसह माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जेपी अग्रवाल, माजी राष्ट्रीय सरचिटणीस जनार्दन द्विवेदी आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, अजय माकन आणि कृष्णा तीरथ यांनाही स्थान देण्यात आले आहे.