१९८४च्या दिल्ली दंगलीवर माहितीपट का नाही?

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ठेवले ‘बीबीसी’च्या वर्मावर बोट

    23-Feb-2023
Total Views | 80
s jayashankar

नवी दिल्ली
: ”माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत झालेल्या १९८४च्या दंगलीवर माहितीपट का नाही,” असा थेट सवाल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी उपस्थित करत ‘बीबीसी’च्या वर्मावरच बोट ठेवले आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ‘बीबीसी’चा एकांगीपणा उघड केला.
 
जयशंकर म्हणाले,“ ‘बीबीसी’चा माहितीपट प्रदर्शित होण्याची वेळ हा योगायोग नसून वेगळ्या प्रकारे केले गेलेले राजकारण आहे. राजकीय आखाड्यात उघडपणे उतरण्याची हिंमत नसलेले लोक माध्यमांद्वारे राजकारण करत आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली. ‘बीबीसी’च्या गुजरात दंगलींवर आधारित माहितीपटामुळे वाद निर्माण झाला होता. सरकारने या माहितीपटावर बंदी घातली आहे. त्याबाबतची भूमिकाही जयशंकर यांनी स्पष्ट केली.


“हा माहितीपट २०२४च्या निवडणुकीच्या आधीच कसा आला,” असा प्रश्न त्यांनी विचारला. कधी कधी भारतातील राजकारण केवळ सीमांच्या आतमध्ये घडत नाही, ते बाहेरील देशातून आत येते, असा दावा त्यांनी केला. एखादी गोष्ट परदेशातून सांगण्यात आली म्हणजे ती खरीच आहे, असे अनेकांना वाटते. भारताची, सरकारची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा कशी घडवली जाते, हे त्यातून दिसते, असे ते म्हणाले. “अशा चित्रपटाचे आनंदाने स्वागत करणारे कोण आहेत, दिल्लीमध्ये १९८४ मध्ये काय घडले ते आपण सर्वांनी पाहिले आहे, त्याविषयी माहितीपट का येत नाहीत,” असा प्रश्न त्यांनी विचारले.

राहुल गांधींचाही घेतला समाचार

चीनच्या सीमेवर सैन्य कोणी पाठवले, मोदींनी की राहुल गांधींनी, असा सवाल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी माध्यम प्रतिनिधींना विचारला. लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने केलेल्या घुसखोरीवरून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. त्याला जयशंकर यांनी प्रत्युत्तर दिले. जयशंकर यांनी काँग्रेस आणि बीबीसीच्या एकांगीपणाचा पर्दाफाश केल्यामुळे त्यांना चोख प्रत्युत्तर मिळाले असून यावर अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

 
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121