केंद्र सरकार मुस्लिमबहुल मेवातमध्ये आरएएफचे कायमस्वरुपी स्टेशन उभारणार - अमित शाह

    02-Aug-2023
Total Views | 119
amit shah mewat 
 
नवी दिल्ली : केंद्र सरकार हरियाणाच्या मेवातमध्ये रॅपिड अॅक्शन फोर्स (आरएएफ) चे विशेष आणि कायमस्वरूपी स्टेशन स्थापन करणार आहे. मुस्लिमबहुल असलेला हा जिल्हा अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरच आरएएफच्या कायमस्वरूपी स्टेशनची पायाभरणी करणार आहेत.
 
३१ जुलै २०२३ रोजी मेवातच्या नूह येथे हिंदूंच्या जलाभिषेक यात्रेवर कट्टरपंथी जमावाने हल्ला केला. गोळीबार, दगडफेक आणि जाळपोळ झाली. हिंदू भाविकांना कित्येक तास ओलिस ठेवण्यात आले. फर्स्टपोस्टने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, गुरुग्रामच्या खासदारांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे.
 
यावेळी त्यांनी मेवात येथे आरएएफच्या कायमस्वरूपी कॅम्पची त्यांची जुनी मागणी त्यांच्यासमोर मांडली. शाह यांनी लवकरच पायाभरणी करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येत आहे. राव इंद्रजीत सिंह यांनी २०१४ मध्ये मेवातच्या तौरू येथे झालेल्या जातीय हिंसाचारानंतर ही मागणी केली होती.
 
त्यावेळी हा प्रस्ताव तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्याला त्यांनी तत्वतः मान्यताही दिली होती. शिबिरासाठी उंद्री गावाची निवड करण्यात आली. मात्र तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. आता अमित शाह यांनी लवकरात लवकर आरएएफ कॅम्पची स्थापना करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंब्रा घटनेबाबत कोणतीही माहिती असेल तर संपर्क साधा -  मध्य रेल्वेचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आवाहन - घटनेच्या तपासासाठी मध्य रेल्वेची समिती

मुंब्रा घटनेबाबत कोणतीही माहिती असेल तर संपर्क साधा -  मध्य रेल्वेचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आवाहन - घटनेच्या तपासासाठी मध्य रेल्वेची समिती

दिवा-मुंब्रा घटनेबद्दल माहितीसाठी मध्य रेल्वेचे जनतेला आवाहन केले आहे. सोमवार, दि.९.०६.२०२५ रोजी सकाळी ९.०१ वाजताच्या सुमारास झालेल्या एका दुर्दैवी घटनेत, दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करणारे सुमारे ८ जण त्यांचा तोल गेला आणि चालत्या ट्रेनमधून पडले. रेल्वे प्रशासनाने या घटनेचे कारण तपासण्यासाठी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. याचसोबत प्रवासी जनता आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना या घटनेबद्दल आणि त्याच्याशी संबंधित बाबींबद्दल कोणतीही ..

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती भूसंपादनासाठी २२ हजार कोटींच्या कर्जाला शासन हमी

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती भूसंपादनासाठी २२ हजार कोटींच्या कर्जाला शासन हमी

आगामी वाहतूककोंडी मुंबई महानगर प्रदेशात विविध प्रकल्पांना गती असतानाच आता बहुप्रतीक्षित विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला आता राज्य सरकारकडून गती देण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला २२ हजार २५० कोटी रुपये कर्जास मंजुरी दिली आहे.भूसंपादनासाठी आवश्यक कर्जासाठी राज्य सरकारने शासन हमी घेतली आहे, त्यामुळेविरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती प्राप्त झाली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121