झुंडीचे धर्मांध राजकारण!

    13-Jun-2025
Total Views | 46
 
equally important to understand the fanatical politics of the mob
 
अन्य धर्मीयांच्या तुलनेत जगभरात मुस्लिमांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याचा ‘प्यू रिसर्च सेंटर’चा अहवाल नुकताच जाहीर झाला. पण, या अहवालातील निष्कर्षांकडे केवळ लोकसंख्यावाढीच्या दृष्टिकोनातून न बघता, यामागील झुंडीचे धर्मांध राजकारण समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे.
 
जगात मुस्लिमांची लोकसंख्या वेगाने वाढत असल्याचे निरीक्षण ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संशोधन संस्थेने नुकतेच आपल्या अहवालात नोंदविले आहे. जगात अन्य धर्मीयांच्या तुलनेत मुस्लिमांची लोकसंख्या अधिक वेगाने वाढत असून, मुस्लीम हा ख्रिश्चनांनंतरचा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा धार्मिक समूह बनल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालानुसार, 2010 ते 2020 सालच्या दरम्यान मुस्लिमांची लोकसंख्या 347 दशलक्षांनी वाढून, दोन अब्ज इतकी झाली आहे. त्या तुलनेत ख्रिश्चन धर्मीय हा जगातील सर्वांत मोठा धार्मिक समूह बनला आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांची लोकसंख्या 12.2 कोटींनी वाढून 229 कोटी झाली आहे. असे असूनही ख्रिश्चनांचा जागतिक लोकसंख्येतील वाटा 30 टक्क्यांवरून 28 टक्क्यांवर घसरला आहे. याचे कारण अन्य धर्मीयांच्या तुलनेत ख्रिश्चनांची लोकसंख्या अधिक वेगाने वाढत नाही, असा होतो.
 
मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येचे कारण अधिक लोक इस्लाम धर्माचा स्वीकार करीत आहेत, हे नाही, तर मुस्लीम धर्मीयांची प्रजनन क्षमताच वाढली आहे, असा आहे. याचे खरे कारण हे आहे की, सार्‍या जगात केवळ इस्लाम धर्मीयच राहावेत, ही या धर्माची खरी अंत:प्रेरणा. जे लोक इस्लामला मानत नाहीत, ते अल्लाच्या विरोधात आहेत, ही या धर्मीयांची मूलभूत भावना आहे. हिंदू, ख्रिश्चन, ज्यू, बौद्ध, शीख वगैरे कोणत्याही धर्माचे लोक असले, तरी ते मुस्लिमांच्या दृष्टीने काफीर ठरतात आणि काफिरांना जगण्याचा अधिकार नाही, ही त्यांची धार्मिक श्रद्धा. ख्रिश्चन आणि ज्यू हेही त्यांच्या दृष्टीने काफिरच. वास्तविक ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम हे अब्राहमिक धर्म मानले जातात. म्हणजे या तिन्ही धर्माचा मूळ प्रेषित हा अब्राहम (इब्राहिम) आहे. असे असूनही या तिन्ही धर्मियांमध्ये जगभर वैमनस्य आहेच.
 
जगात फक्त इस्लामी धर्मीयच राहिले पाहिजेत, या असुरी महत्त्वाकांक्षेपोटी जगात मुस्लिमांची लोकसंख्या वाढविण्याचा प्रयत्न, नव्हे मोहीम सुरू आहे. या अहवालानुसार एक मुस्लीम महिला तिच्या आयुष्यात सरासरी 2.9 मुलांना जन्म देते, तर बिगर-मुस्लीम महिलेला सरासरी 2.2 मुले असतात. साहजिकच या धर्मात तरुणांची लोकसंख्या अधिक आहे. 2020 साली मुस्लिमांचे जागतिक सरासरी वय बिगर-मुस्लिमांपेक्षा नऊ वर्षांनी कमी होते. या तरुण लोकसंख्येकडून मुस्लीम समाजात नव्याने मुलांची भर पडत राहते. त्यामुळेच जगभर मुस्लिमांच्या लोकसंख्येचे प्रमाण वाढताना दिसते.
 
मुस्लीम समाजातील काही कट्टरपंथीय धर्मगुरूंनी जगभर इस्लामचा फैलाव करण्यासाठी आता नवी शक्कल शोधून काढली आहे. पश्चिम आशिया असो की आफ्रिकेतील मुस्लीम देश; तेथे सतत राजकीय संघर्ष सुरू आहेत. अंतर्गत यादवी असो की, दुसर्‍या देशाशी असलेले वाद असोत. बहुतांश मुस्लीम राष्ट्रांमध्ये सतत युद्धजन्य परिस्थिती असते. या युद्धात उद्ध्वस्त झालेल्या हजारो लोकांचे स्थलांतर होत असते. हे लोक स्वत:ला राजकीय विस्थापित मानतात आणि युरोप किंवा अमेरिकेत शरणार्थी म्हणून आश्रय मागतात. वास्तविक जगात 57 इस्लामी देश आहेत. त्या देशांमध्ये हे शरणार्थी कधीच आश्रयाला जात नाहीत. ते नेहमी बिगर-मुस्लीम देशांमध्ये आश्रय मागतात. एकदा त्या देशांमध्ये त्यांना प्रवेश मिळाला की, मग तेथे पुन्हा आपली लोकसंख्या वाढविण्याच्या कामाला ते लागतात. एकदा ठरावीक प्रदेशात त्यांची बहुसंख्या झाली की, तेथे ते इस्लामी कायद्याची (म्हणजे ‘शरिया’ची) मागणी करतात. त्या भागांवर मुस्लिमांचे इतके वर्चस्व निर्माण होते की, सरकारी अधिकारी त्या प्रदेशात प्रवेशही करू शकत नाहीत. इंग्लंडमधील अनेक शहरांचे महापौर मुस्लीम आहेत, हे वास्तव आहे. त्या देशात आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकारांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली जाते. सतत नवनवी अपत्ये जन्माला घालण्याच्या धोरणामुळे हळूहळू मुस्लीमबहुल भागांची व्याप्ती वाढत जाते आणि लवकरच त्या देशाच्या लोकसंख्येचे स्वरूप पालटते. त्याचे उदाहरण लेबेनॉन हा देश.
 
मध्य-पूर्वेतील एकमेव ख्रिश्चनबहुल असलेल्या लेबेनॉनची राजधानी बैरूतचे वर्णन ‘मध्य-पूर्वेतील पॅरिस’ असे केले जात असे. पण, गेल्या 60-70 वर्षांत हा देश मुस्लीमबहुल बनला. कारण, तेथे लगतच्या पॅलेस्टाईन आणि सीरियामधून आलेल्या शरणार्थींनी त्या देशाच्या लोकसंख्येचे स्वरूपच बदलून टाकले. झोरोष्ट्रियन धर्माच्या पर्शियाचे रूपांतरही 90 वर्षांत इराणमध्ये करण्यात आले आणि तेथील पारसी हे आज भारतात अत्यल्पसंख्य म्हणून जगत आहेत. याच कार्यपद्धतीने आज जगभर इस्लामचा फैलाव होत आहे. युरोपातील फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, ब्रिटन वगैरे अनेक देशांमध्ये वाढत चाललेल्या दंगली आणि दहशतवादी घटनांमागे वाढलेली मुस्लीम लोकसंख्या हे कारण आहे. यापैकी काही देशांमध्ये राष्ट्रवादी विचारांचे पक्ष सत्तेवर येऊ लागले आहेत, हे या देशांतील जनतेत झालेली जागृती आहे.
 
भारताला हा अनुभव नवा नसला, तरी त्यामागील ‘गजवा-ए-हिंद’ची रणनीती भारतीयांच्या अलीकडे लक्षात येऊ लागली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लीम लीगने ‘द्विराष्ट्रवादा’चा सिद्धांत मांडून मुस्लीमबहुल प्रदेशाला स्वतंत्र राष्ट्र बनविले आणि पाकिस्तान हा देश दोन तुकड्यांत अस्तित्वात आला. तरीही उर्वरित भारतातून या नवनिर्वाचित इस्लामी देशात जाण्यास मुस्लिमांनी नकार दिला. यामागे त्यांचे भारत आणि धर्मनिरपेक्षतेवरील प्रेम आहे, असा गोंडस काढा भारतीयांच्या गळी उतरविण्यात आला. पण, गेल्या 20-25 वर्षांत भारतातील धर्मांध मुस्लिमांची खरी ऊर्मी काय आहे, ते भारतीयांच्या लक्षात येऊ लागले. काश्मीर खोर्‍यातून हिंदू पंडितांना जबरदस्तीने बाहेर हाकलून देण्यात आले. काश्मीरची नाळ पाकिस्तानशी जोडण्यासाठी तेथे दहशतवादाचा नंगानाच करण्यात आला. भारतीय सैन्याच्या तेजस्वी शौर्यामुळेच उर्वरित काश्मीर आज भारतात राहिले आहे. आता त्या प्रदेशाचा विशेष दर्जा रद्द झाल्यापासून काश्मीरमधील फुटीरवाद वरकरणी तरी संपुष्टात आला आहे. पहलगामच्या घटनेने मात्र या फुटीरतेचे अवशेष आजही जिवंत आहेत, याची नव्याने जाणीव करून दिली आहे. भारताच्या अन्य भागांतही मुस्लिमांची लोकसंख्या कशी वाढत राहील, याची व्यवस्थित काळजी घेतली गेली आहे. आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील बर्‍याच जिल्ह्यांच्या लोकसंख्येचे स्वरूप बदलले गेले आहे. एकूणच भविष्यातील धोका टाळण्यासाठी सरकारला लवकरच काही कठोर उपाय योजावे लागतील.
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
आणीबाणीतील अत्याचारांबाबत काँग्रेस माफी कधी मागणार? – माजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा सवाल

आणीबाणीतील अत्याचारांबाबत काँग्रेस माफी कधी मागणार? – माजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा सवाल

"लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस म्हणजे आणीबाणी. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केवळ आपली खुर्ची वाचवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेशिवाय देशावर आणीबाणी लादली. त्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांपासून पत्रकारांपर्यंत, कार्यकर्त्यांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत अनेकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य गमावले. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या अत्याचारांबाबत काँग्रेसने आजवर एकदाही देशाची माफी मागितलेली नाही. आता तरी काँग्रेसला ती सुबुद्धी सुचेल का?" असा सवाल माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121