दिल्ली दंगलीचा मुख्य आरोपी उमर खालिदला जामीन नाहीच

    15-Feb-2024
Total Views | 51
 umar
 
नवी दिल्ली : दिल्ली दंगलीतील मुख्य आरोपी उमर खालिदने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे. त्याच्या जामिनावर दि. १४ फेब्रुवारी २०२४ बुधवारी सुनावणी होणार होती. खालिदचे वकील कपिल सिब्बल यांनी याला दुजोरा दिला आहे. याचिका मागे घेण्यामागे परिस्थितीतील बदलाचे कारण सांगण्यात आले आहे. आता उमर खालिद कनिष्ठ न्यायालयात जामीन मिळण्याच्या शक्यता तपासणार आहे. मात्र, जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयात उमर खालिदचे जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळण्यात आले आहेत.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, उमर खालिदच्या जामीन याचिकेवर दि. १४ फेब्रुवारी २०२४ बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी आणि न्यायमूर्ती पंकज मित्तल यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार होती. सुनावणीपूर्वी उमर खालिदचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आणि याचिका मागे घेण्याचे आवाहन केले. अर्ज मागे घेण्यामागे त्यांनी परिस्थितीतील बदलाचे कारण सांगितले.
 
कपिल सिब्बल यांचा हा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आहे. आता कपिल सिब्बल म्हणतात की ते कनिष्ठ न्यायालयांमध्ये उपलब्ध असलेल्या कायदेशीर पर्यायांवर काम करणार आहेत. याआधी उमर खालिदचा जामीन अर्ज दिल्लीच्या करकरडूमा सत्र न्यायालयाने मार्च २०२२ मध्ये फेटाळला होता. या निर्णयाला उमर खालिदने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
 
ऑक्टोबर २०२२ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने उमर खालिदला जामीन देण्यासही नकार दिला होता. तेव्हापासून उमर खालिद जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, असे मानले जात होते. मे २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उमर खालिद प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून उत्तर मागितले होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये दोन्ही बाजूंच्या वकीलांच्या अनुपस्थितीमुळे सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होऊ शकली नाही.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121