( gudipadwa celebration in maharashtra ) हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. राज्यात विविध ठिकाणी शोभायात्रा आणि गुढी उभारण्याची परंपरा आहे. तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिरावर प्रथम गुढी उभारण्यात येते. तर, मुंबई- पुण्यासह शहरांमध्ये संस्कृती- परंपरांचे प्रतिक असलेल्या शोभायात्रा काढल्या जातात.
Read More
( gudipadwa in thane ) “ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, चौकाचौकात रांगोळ्या... भगवे झेंडे-उपरणे आणि समाज प्रबोधनाचे धडे देणारे आकर्षक चित्ररथ,” अशा उत्साही वातावरणात गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या ‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास’ आयोजित हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत यंदा ठाणेकरांनी संस्कृतीचा महाकुंभ अनुभवला.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारामध्ये सर्वत्र खरेदीसाठी लगबग बघायला मिळत आहे. अशातच यावेळी छोट्या गुढींनी सगळ्यांचे लक्ष ओढून घेतला आहे. आकाराने छोटे असलेल्या या गुढींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली बघायला मिळाली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दरवर्षी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना संबोधित करतात. यावर्षीदेखील रविवार, ३० मार्च रोजी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यासाठी मैदान सज्ज आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या 'गुढीपाडवा' या आपल्या हिंदू नववर्ष दिवसाचे औचित्य साधत, 'शेलार मामा फाउंडेशन' आयोजित 'चिरायू' हा कलाकारांच्या सन्मानाचा आणि नात्याच्या उत्सवांचा सोहळा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा झाला. यंदाचं हे १८ वर्ष असून ९०च्या दशकातील ज्येष्ठ कलाकारांनी 'चिरायू' ची मुहूर्तमेढ रोवली होती. कालांतराने खंडित झालेल्या या परंपरेला पुन्हा एकदा झळाळी आणली ती म्हणजे लोकप्रिय कलाकार सुशांत अरुण शेलार यांनी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. २००६ पासून 'शेलार मामा फाउंडेशन'द्वारा आयोजित 'चिरा
उद्योग, ऊर्जा तसेच कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची गुढीपाडवा आणि रमजान ईदची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. शुक्रवार, २८ मार्च रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
Happy Gudipadwa महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा अनन्यसाधारण आणि राष्ट्रधर्माचा वसा आहे. हा वसा घेऊन राज्याच्या, देशाच्या विकासाचा एकजुटीने निर्धार करूया. हा राष्ट्रधर्म वाढवू या, विकासाची महागुढी उभारू या! असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना मराठी नववर्ष प्रारंभ गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.
आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात हिंदू नववर्षाचा प्रथम दिवस. एरवी इंग्रजी नववर्षाच्या स्वागतापूर्वी अनेकांकडून विविध संकल्प सोडले जातात. तसेच हिंदू नववर्षारंभीही वैयक्तिक आणि सामूहिक उन्नतीसाठी नवसंकल्पाची गुढी उभारायला हवी. हे नवसंकल्प केवळ वैयक्तिक, कौटुंबिक अथवा सामाजिक हिताचेच नाही, तर यात व्यापक राष्ट्रहिताचा संदेशही अनुस्यूत आहे.
Gudi Padwaभारताचा सांस्कृतिक वारसा हा तिमिराकडून तेजाकडे नेणारा अद्भुत प्रवास. या धार्मिक, सांस्कृतिक वारशाच्या प्रतिकांमधील एकी आणि त्यातून प्रतित होणारा आशावादी, प्रेरणादायी विचारांचा अंत:प्रवाह हा थक्क करणारा आहे. या अंत:प्रवाहाला समृद्ध करणारा उत्सव म्हणजे हिंदू नववर्ष होय. चला नववर्षाचे स्वागत करूया...
Hindu New Year Yatra ठाणे पूर्व येथील नावाजलेली व अल्पावधीत आत्यंतिक लोकप्रिय ठरलेली हिंदू नववर्ष स्वागत यात्रा रविवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी ठीक ६.३० वाजता नालंदा शाळा व कोपरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून निघेल व पुढे ठाणेकर वाडी चौक, शिवमंदिर, प्रेम नगर, दौलत नगर, टीजेएसबी बँक, मंगला शाळा, राऊत शाळा, स्वर्गीय नारायणराव कोळी चौक ते नातू परांजपे कॉलनीतील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे विसर्जित होईल.
Dr. Hedgewar शालिवाहन आणि त्याची संजीवनी विद्यामरणपंथाला लागलेल्या माणसाला मरणाच्या दारातून परत आणण्याचे काम करणारी संजीवनी शक्ती. या शक्तीचे हेच काम इतिहासातील परकीय आक्रमणाने मृतप्राय झालेल्या हिंदू समाजाबाबत अनेकांनी केले. ज्याप्रमाणे शालिवाहन या एका सर्वसामान्य माणसाने संजीवन मंत्राच्या साहाय्याने मातीतून योद्धे निर्माण केले, अगदी तसेच डॉ. हेडगेवार या एक सर्वसामान्य कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसाने मातीतून कार्यकर्ते निर्माण केले. डॉ. हेडगेवारांनी या निष्प्राण मातीवर संघटनेचा संजीवनी मंत्र टाकला.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने दि. ९ एप्रिल २०२४ रोजी आपली पत्नी सागरिका घाटगेसोबत गुढीपाडव्याचा सण साजरा केला. झहीर खानने आपल्या पत्नीसोबत गुढीपाडवा साजरा करण्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. पण, या फोटोखाली कट्टरंपथीयांकडून झहीर खानला शिवीगाळ केली जात आहे.
राष्ट्रीय ऋषी स्वामी विवेकानंद म्हणाले होते - स्वाभीमानाने जगण्याची भावना जागृत करायची असेल, देशभक्तीचे बीज हृदयात पेरायचे असेल, तर हिंदूंच्या राष्ट्रीय कॅलेंडरनुसार तिथींचा आश्रय घ्यावा लागेल. जो कोणी परदेशी लोकांच्या तारखांवर अवलंबून असतो तो गुलाम बनतो आणि स्वाभिमान गमावतो.
गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क परिसरात दि.२२ मार्च रोजी मनसेचा पाडवा मेळावा पार पडणार आहे. त्यानिमित्त शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्या बॅनरबाजीत महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे अशा आशयाचा मजकूर छापण्यात आला आहे. तसेच शिवसेना भवनासमोर बॅनर लावून मनसेने ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे ह्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.
आपल्या प्राचीन आदर्श संस्कारांची गुढी प्रत्येकाने आपल्या घरी, दारी व समाजात मोठ्या प्रमाणात उभारावी. कारण, याच 16 संस्कारांच्या माध्यमाने व्यक्ती, कुटुंब, समाज, देश व विश्वाची नवनिर्मिती होणार आहे. संस्कारच नसतील, तर आपले जीवन हे सर्व काही मिळूनदेखील शून्य ठरणारे आहे. यासाठीच 16 संस्काररुपी प्रखर नंदादीपाच्या प्रकाशाने आपण आपले व इतरांचे अंतर्बाह्य जीवन उजळूया.
ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याच्या दराने जोरदार उसळी घेतली आहे. सोन्याच्या भावात प्रतितोळा १ हजार ४०० रुपयांची वाढ होऊन तो ६० हजार १०० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे.ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याच्या दराने जोरदार उसळी घेतली आहे. जागतिक पातळीवर झालेल्या भाववाढीचा परिणाम भारतीय बाजारांमध्ये बघायला मिळत आहे.
डॉ. हेडगेवार यांनी मुळात संघाच्या स्थापनेपासून प्रारंभिक काळात संघटनेची ज्या पद्धतीची बांधणी केली, तो वारसा पुढील पिढ्यांनी निगुतीने सांभाळला. गुढीपाडवा हा डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या या अलौकिक आणि द्रष्ट्या कर्तृत्वाचे स्मरण करणे औचित्याचे...
संपूर्ण महाराष्ट्राला आता ओढ लागली आहे गुढीपाडव्याच्या आनंदोत्सवाची, शोभायात्रांची. भारतीय नव वर्षाचे स्वागत पारंपरिक पद्धतीने, सांस्कृतिक वारसा जपत ढोल ताशांच्या गजरात अतिशय उत्साहात सर्वत्र केले जाते. या अनुषंगाने विविध सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम तसेच समाजउपयोगी उपक्रम विविध संस्था हाती घेत आहेत.
‘स्लाव्ह मित्र मंडळ’ची २०१० साली स्थापना झाली. अजय मुरूडकर,अदिश देसाई, आनंद पंडित, मंदार मिराशी, संचनि नेमाने, योगी चव्हाण हे या संस्थेचे सदस्य. सात सदस्यांनी ‘स्लाव्ह मित्र मंडळा’च्या माध्यमातून हिंदू संस्कृती परदेशात जागृत राखली आहे. त्याविषयी...
डोंबिवलीतील भोईर जिमखान्यात ‘ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक’चे धडे गिरवणार्या राही नितीन पाखले हिने जिल्हा, राज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तर यश संपादित केले आहेच. शिवाय नुकत्याच पार पडलेल्या ‘वर्ल्डकप’मध्येही राहीने भारताचे प्रतिनिधीत्व करीत डोंबिवलीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सर्वात लहान खेळाडू असलेल्या राहीने ‘वर्ल्डकप’मध्ये १५ वे स्थान पटकाविले. अशा या स्वकर्तृत्वाने यशाची गुढी उभारणार्या राही पाखले हिच्या जिद्दीची कहाणी...
र्निबधमुक्त गुढीपाडव्याचे स्वागत करताना पूर्वीचा जोष, उत्साह, जल्लोष, चैतन्य, आनंद आणि एकूणच सकारत्मक वातावरण कल्याण डोंबिवलीत दिसून आले. मास्कमुक्त गुढीपाडवा असल्याने सगळ्य़ांच्या चेह:यावर आनंद ओसांडून वाहत होता. ९४ वर्षीय आजोबांनी दाणपट्टा चालवून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. महिलांनी बर्ची नृत्य सादर करून डोंबिवलीकरांवर गारूड घातले.
आपल्या जीवनात संघर्ष अटळ आहे. मात्र, संघर्ष आणि वेदनेचा बाऊ न करता धाडस व हिमतीने जगले पाहिजे. ‘करून जावे असेही काही दुनियेतूनी या जाताना, गहिवर यावा जगास सार्या निरोप शेवट देताना’ या ओळींना कायम ध्यानीमनी ठेवून पुढे जावे. समाजातील प्रत्येक वेदनेवर शक्य तितकी फुंकर घालण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा. जिंकायचे असेल, तर कधीही लढणे सोडू नये. - मीरा कदम
महाराष्ट्र शासनाने कोरोनाचे सर्व निर्बध हटवले ; राजेश टोपेंनी घेतली पत्रकार परिषद
कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना एखाद्या व्यवसायाची पायाभरणी करणे, हे तसे अवघड काम. मात्र, सफाळ्याच्या जयवंत राठोड यांनी हाताशी कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करत, विविधांगी व्यवसाय उभारले. त्यांच्या व्यवसाय भरारीमुळे अनेक ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून पालघर जिल्ह्यातील एक कर्तृत्ववान उद्योजक म्हणून ते सुपरिचित आहेत. त्यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...
आपली आवडच आपले जीवनध्येय ठरवून १८ वर्षांची एक मुलगी चक्क कंपनी स्थापन करते. त्या कंपनीची ‘सीईओ’ म्हणून अत्यंत जबाबदारीपूर्वक व्यवसायातही नेटाने उतरते. खगोलशास्त्राचे अजूनही शिक्षण घेणारी आणि कित्येक खगोल जिज्ञासूंना घरबसल्या अंतराळाचे धडा देणार्या ‘अॅस्ट्रॉन इरा’ या संकेतस्थळाची सर्वेसर्वा श्वेता कुलकर्णी. त्यामुळे आवड, शिक्षण, समाजसेवा आणि उद्योग यांना इतक्या कमी वयात एका धाग्यात गुंफणार्या या ‘अॅस्ट्रोप्रिन्युअर’ची ही यशोगाथा...
डॉक्टर म्हटलं की, रुग्णसेवा, दैनंदिन व्यस्त जीवन, कामाचा ताण या गोष्टी ओघाने आल्याच. मात्र, यातूनच वेळ काढत ज्या समाजाचे आपण देणं लागतो, त्यासाठी आपले योगदान देणार्या डॉ. आनंद हर्डीकर यांचा हा संघर्षात्मक प्रवास...
‘गृहकर्तव्यदक्षता’ हा तर स्त्री व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य गुण. अशी सुसंस्कारित, शिक्षित आणि समंजस महिला जेव्हा एखाद्या सार्वजनिक संस्थेचा कारभार हाती घेते, तेव्हा घडणारे बदल हे निश्चितच नेत्रदीपक असेच असतात. याचीच अनुभूती येते, ती नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत. कारण, येथील कारभार आहे अशाच एका कर्तव्यदक्ष महिला सभापतीच्या हाती.सुवर्णा जगताप त्यांचे नाव. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा हा लेख...
विविध समस्यांनी ग्रासलेल्या आणि आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित असणार्या वनवासी बांधवांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचणारे ‘वसई पर्ल्स लायन्स क्लब’चे माजी खजिनदार उमेश मेस्त्री यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...
“आयुष्य म्हणजेच एका आव्हान आहे. त्यात जय किंवा पराजय महत्त्वाचा नाही, तर तुम्ही ते आव्हान कसे पेलले आणि त्यावेळी तुम्हाला काय वाटले, हे अधिक महत्त्वाचे,” असे म्हणणारी आर्किटेक्ट पोर्णिमा बुद्धिवंत सध्या फॅशनच्या क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व करते आहे. तिच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख...
बदलते हवामान, कोरडा आणि ओला दुष्काळ, तसेच घसरता बाजारभाव यांसारख्या आव्हानांनी पाचवीला पूजलेला व्यवसाय म्हणजे शेती. राज्यातील बहुतांश शेती व्यवसाय तोट्यात असल्याने सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकर्यांना नवी दिशा दाखविण्याचा प्रयत्न काही प्रयोगशील शेतकरी करत आहेत. त्यासाठी सेंद्रिय उत्पादनांचा वापर स्वतःच्या शेतात करून इतर शेतकर्यांना प्रगतीचा मार्ग दाखवणारे प्रगतशील आणि उद्यमी शेतकरी म्हणजे सुभाष वसंत कराळे. कृषिक्षेत्राच्या विकासामध्ये मौल्यवान योगदान असलेल्या सुभाष कराळेंच्या कार्यप्रवासाचा घेतलेला हा
महाविद्यालयात नाटकांची आवड जोपासताना प्रत्येकाला वाटतं की, आपण कलाकार व्हावं, लेखक व्हावं, काही जणांना तर अगदी नेपथ्यकार अथवा रंगभूषाकार व्हावं असंही वाटतं. पण, कोणीच ठरवून नाट्यनिर्माता मात्र होत नाही. अशा या नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे राहुल भंडारे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख...
गुढीपाडव्यापासून प्लवनाम संवत्सर शालिवाहन शके १९४३ चा प्रारंभ होत आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदा हा हिंदू मराठी कालगणनेप्रमाणे नवीन वर्षातील पहिला दिवस, गुढीपाडवा घरोघरी गुढी उभारून तिचे पूजन करून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त असतो. या नूतन वर्षात काय घडणार आहे, याची माहिती पंचांगकर्ते,खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.
गेली कित्येक वर्षं मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये संजीवनी जाधव-खानविलकर यांनी अनेक संस्मरणीय कलाविष्कार प्रेक्षकांसमोर सादर केले. त्यांनी कधी प्रेक्षकांना खळखळून हसवले, तर कधी हसतहसत त्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले. त्यांच्या याच प्रदीर्घ अनुभवावरून संजीवनी जाधव यांनी नवीन पिढी घडवण्याचेदेखील काम केले. त्यांच्या ३० हून अधिक वर्षांच्या कलासंपन्न अनुभवाने अनेक तरुणांना कलाक्षेत्रात योग्य मार्ग दाखवला. अशा या नवोदितांच्या मार्गदर्शक ‘माईं’चा जीवनप्रवास उलगडणारा हा लेख...
‘देवभूमी’ अशी ओळख असलेल्या कोकणाचा साज तीनही ऋतूंमध्ये न्याराच दिसतो. आपल्या कॅमेर्यात कोकणचे हे निसर्गसौंदर्य कैद करणारा अवलिया छायाचित्रकार म्हणजे प्रल्हाद भाटकर... कोकणच्या विविध तालुका आणि खेडोपाड्यातील जवळपास दीड लाख छायाचित्रांचा संग्रह त्यांच्यापाशी आहे. तेव्हा, कोकणच्या सौंदर्यसृष्टीचे बारकावे टिपून जगासमोर मांडणार्या या सुप्रसिद्ध छायाचित्रकार प्रल्हाद भाटकर यांच्याविषयी...
एक संगीतप्रेमी, काव्यप्रेमी, समाजसेवक व एक यशस्वी डॉक्टर, ज्याने आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशकिरणांनी हजारोंच्या जीवनातील अंधकार दूर करत समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. अशा या काव्यप्रेमी साहित्यिक डॉ. शाहू रसाळ यांच्या कार्यकर्तृत्वावर एक नजर...
व्यवसायात उतरण्याआधी संबंधित क्षेत्रात कमीत कमी सहा महिन्यांचा तरी प्रत्यक्ष नोकरीचा अनुभव घेतलाच पाहिजे, असा मोलाचा सल्ला ‘वरदायिनी ऑटो’चे प्रमुख विक्रम कदम देतात. असे का...? तर ते समजून घेण्याआधी जाणून घेऊया विक्रम कदम यांचा नोकरी ते यशस्वी व्यावसायिकापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास...
बहुराष्ट्रीय कंपनीत ११ वर्षांपासूनची, उत्तम वेतनाची नोकरी सोडून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी कंपनीची स्थापना करणे, मोठे हिमतीचे काम. पण, तेच धाडस ‘एमिल फार्मास्युटिकल्स’चे संस्थापक राजेंद्र गोळे यांनी दाखवले आणि आज त्यांच्या कंपनीने निर्मिती केलेल्या उत्पादनांना देशात तर मागणी आहेच, पण परदेशातही त्यांची निर्यात होते. त्यांच्या आजवरच्या प्रवासाचा आढावा घेणारा हा लेख...
समाजात अनेकदा आपल्याला निराधार, निराश्रित ज्येष्ठ नागरिक, वृद्ध आजी-आजोबा दिसतात. आपल्या मुलामुलींनी सांभाळावे, नातवंडांबरोबर लहान व्हावे आणि आयुष्याच्या संध्याकाळी आनंदाने जगावे, असे त्यांनाही वाटत असते. परंतु, दुर्दैवाने म्हणा किंवा अन्य काही कारणांनी त्यांच्या नशिबी वेदना आणि यातनाच येतात. अशाच ५० पेक्षा अधिक आजी-आजोबांना ‘किनारा वृद्ध आणि मतिमंद ट्रस्ट’च्या माध्यमातून सांभाळताहेत पुण्यातील अॅड. प्रीती वैद्य, तेही अगदी मुलीच्या मायेने!
आजपासून २७ वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावसारख्या ग्रामीण भागात एकटीच्या बळावर रक्तपेढी सुरू करणे तसे धाडसाचेच काम. पण, आपल्या समोर रक्ताअभावी होणारी रुग्णांची फरफट पाहून त्यांनी ती हिंमत केली आणि आजही रक्ताचा दर्जा, गुणवत्ता जपून त्या कार्यरत आहेत. त्या कोण? तर जाणून घेऊया, संजीवनी रक्तपेढीच्या संस्थापक-प्रमुख नीता पाटील यांच्याबद्दल...
“माझ्याकडे काहीच नाही, मला कुणाचे पाठबळ नाही, मलाच अडचणी येतात, किती लढू? जाऊ दे, त्यापेक्षा काहीच न केलेले बरे!” असे म्हणत रडणारे नकारात्मक लोक आपण नेहमीच अवतीभवती पाहतो. पण, शून्यातूनच विश्व निर्माण करणार्या अनिल सौंदडे यांची यशोगाथा ‘मराठी पाऊल पडते पुढे,’ असे म्हणायला भाग पाडते. ‘शीतल इंडस्ट्रीज’ आणि ‘एफिशियन्ट इंजिनिअरिंग’ या दोन कंपन्यांचेसर्वेसर्वा असलेले अनिल यांनी अनेक अडचणींचा सामना केला. त्यांचीच ही यशोगाथा...
वसंत ऋतूचे आगमन होताच वृक्षांना नवी पालवी फुटते. आंबा,कडुनिंब मोहरून जातो. पळसालाही बहर येतो. कोकिळा सुद्धा स्वर आळवायला सुरुवात करते. अशा या सुगंधित वातावरणात चाहूल लागते ती नववर्षाची. चैत्र शुद्ध प्रतिपदेची.
चैत्र मासारंभ म्हणजे नववर्षारंभ! आम्रतरूवर मोहोरलेला गंध आणि पर्णसंभारातून तानावर तान घेणारी कोकिळा! कोकिळा गाऊ लागली की जाणवतं ते सर्वत्र पसरलेलं सुगंधाचं वातावरण... कोवळ्या पालवीचं पालवणं! लालसर, तांबूस, कोवळ्या पर्णांनी आशा पल्लवीत करणारा निसर्ग. नववर्ष हे नवे संकल्प घेऊन येणारे असतं. श्रीरामाची विजयपताका अंबरात झळकावणारी गुढी! सर्वत्र उत्साह, उल्हास ओसंडून वाहतो. प्रभू श्रीरामाच्या जयघोषात, नामघोषात आसमंत दुमदुमतो. विजयाची यशोगाथा स्वपराक्रमाने साकारणारे प्रभू श्रीराम! चैत्र मास व प्रभू श्रीराम मरगळलेल्
आयुर्वेद हा संस्कृत शब्द. ‘आयु’ म्हणजे ‘जीवन’ आणि ‘वेद’ म्हणजे ‘विद्या’ असा केला जातो. वैद्यकीय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना परिस्थितीशी दोन हात करत कर्तृत्वाच्या जोरावर नवी मुंबईतील आयुर्वेद पंचकर्म उपचार पद्धतीमध्ये प्रसिद्ध असलेले डॉ. प्रशांत वाघमारे यांची ही यशोगाथा...
डोंबिवलीतील भारती मोरे समाजातील एकल महिलांसाठी काम करतात. मुंबईतील गिरणगावात त्यांचे बालपण गेले. चाळ संस्कृतीत लहानाच्या मोठे झालेल्या भारती मोरेंनी चाळीतील अडीअडचणीला धावून जायची पद्धत आपल्या वैयक्तिक आयुष्यातही अवलंबली.
‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या व्रताला सर्वस्व मानून समाजसेवेमध्ये सक्रिय असलेले वसईच्या आशीर्वाद नर्सिंग होमचे डॉ. जयश्री आणि रवींद्र देशपांडे हे डॉक्टर दाम्पत्य.
ध्यास आयुर्वेदाचा
रुईया महाविद्यालयातील विद्यार्थिनी. लहानपणापासून चित्रकलेची आवड. व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील बालपण. फॅशन डिझायनिंगचे शिक्षण आणि काहीतरी जगावेगळं करून दाखविण्याची मनात असलेली जिद्द या जोरावर महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक वर्तुळातील एक चेहरा असलेल्या आरती कांबळे यांनी आई, पत्नी, सून, मुलगी या भूमिकाही यशस्वीपणे निभावल्या आहेत. शून्यापासून सुरू केलेल्या या उद्योगिनीचा सहाशे कोटींपर्यंतचा हा प्रवास...
कौटुंबिक व्यावसायाची स्थिती नाजूक असतानाही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करत 'श्री साई इंडस्ट्रीज' या भागीदारीतील कंपनीचा विस्तार सातासमुद्रापार पोहोचवत तितकाच हातभार समाजकार्यातही लावणारे धनंजय लोहार यांचा अवघ्या साडेतीन रुपयांपासून व्यवसाय सुरू करणारी संघर्षमय कथा खरचं प्रेरणादायक आहे.
आजच्या जगात काहीच मोफत मिळत नाही. दहावी, बारावीच्या क्लाससाठीही लाखोंची फी उकळली जाते. त्यातच जर अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणाचे क्लासेस असतील, तर फी ऐकूनच धक्का बसतो. पण, असा एक अवलिया आहे, जो वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांना मोफत ज्ञानाचे भांडार खुले व्हावे, यासाठी धडपडत आहे. विद्यार्थीसेवेचे व्रत घेतलेले डॉ. विवेक नळगीरकर...
मुलांचे संगोपन उत्तमरित्या व्हावे, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. मात्र, आजघडीला घर सांभाळण्याबरोबरच त्या घराला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची जबाबदारीही महिलांनी स्वीकारली आहे. मुलं थोडी वयाने मोठी झाली की, नोकरदार महिलांना त्यांना पाळणाघरात ठेवून कामावर जावेच लागते. पाळणाघरापेक्षा दुसरे घरच म्हणता येईल, असे बदलापूरमधील टिळक काकूंचे सुरक्षित आणि संस्कारांची