“राहुल गांधी हे सातत्याने लोकशाही प्रक्रिया आणि जनादेशाचा सातत्याने अपमान करतात. जनतेने त्यांना नाकारले, त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत. यातून काँग्रेस पक्ष आणखी गर्तेत जाणार आहे,” अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, एकदा पराभव स्वीकारून आपण कुठे चुकतो आहोत, जनतेशी कनेक्ट कुठे कमी पडतो, त्यासाठी काय केले पाहिजे, याचा विचार केला, तर ते अधिक संयुक्तिक ठरेल,” असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिला. त्याचप्रमाणे, “बिहारसह आगामी विधानस
Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, दि. 1 जून रोजी नाशिक दौर्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत होणार्या बैठकीमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान होणार्या शाही स्नानाच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. यावेळी कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन करण्याच्या उद्देशाने सिंहस्थ प्राधिकरणातील अधिकारी व सदस्यांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर पेशवेकाळापासून वेगवेगळ्या ठिकाणी स्नान करणारे वैष्णव व शैव आखाड्यांचे प्रमुख कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने प्रथमच नाशिकमध्ये एकत्र येणार आहेत.
(Chief Minister Devendra Fadnavis on Virtual Galaxy Infotech Company should contribute to realizing Digital India) डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी व्हर्च्युअल गॅलॅक्सी इन्फोटेक लिमिटेड कंपनीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. वर्षा निवास्थान येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक लिमिटेडच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील लिस्टिंग झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कंपनीचे उपाध्यक्ष आशुतोष घोलप उपस्थित होते.
(CM Devendra Fadnavis Gauravshali Maharashtra program) “मी तीनवेळा मुख्यमंत्री झालो. आधी सलग पाच वर्षे आणि त्यानंतर 72 तास. त्यामुळे सर्वांत अधिक आणि सर्वांत कमी काळ मुख्यमंत्री होण्याचा विक्रम माझ्या नावावर आहे. तर सर्वाधिक वेळा आणि सर्वांत कमी वेळ म्हणजे 72 तास उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर आहे. पण, महाराष्ट्रात सध्या असलेल्या समीकरणांची मुहूर्तमेढ त्या 72 तासांच्या काळातच रोवली गेली होती,” अशी टोलेबाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. 3 मे रोजी केली.
( Chief Minister's Relief Fund Cell help )बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा परिसरातील एका गावात रसवंतीच्या मशिनमध्ये केस अडकून १६ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच घडली. मात्र, गावकऱ्यांच्या तत्परतेने, सरपंचाच्या पुढाकाराने आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या त्वरित मदतीमुळे या मुलीचे प्राण वाचले. अवघ्या दोन तासांत १ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदनशीलतेचे दर्शन घडवले. या मदतीमुळे हवालदिल झालेल्या मुलीच्या कुटुंबाला आधार मिळाला.
( Chief Minister Devendra Fadnavis ramnavmi programe ) “प्रभू श्रीराम हे आपले राष्ट्रपुरुष आहेत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. जीवनाची मूल्ये काय असावी, याचा सर्वोच्च बिंदू म्हणजे प्रभू श्रीरामांचे जीवन आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. ५ एप्रिल रोजी केले. मानखुर्द येथे ‘संजोग सोसायटी’च्यावतीने आयोजित संजोग देवस्थान प्राणप्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
( CM devendra fadnavis on the discussion of final budget week proposal ) कुठलीही घटना झाली आणि कुणीही केली तरी काही लोक त्याला थेट माझा सगा सोयराच करून टाकतात. पण भारताचे संविधान माझा सगा आणि महाराष्ट्राची १३ कोटी जनता माझे सोयरे आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मंगळवार, २५ मार्च रोजी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
Devendra Fadnavis 3.0 cabinet महायुतीला विक्रमी बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी शपथ घेतली. त्याचसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही शपथ घेत सत्ता स्थापन केली. त्यानंतर १५ डिसेंबर २०२४ रोजी महायुतीच्या एकूण ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेत कारभार स्वीकारला आहे. यामध्ये जातीय सलोखा जपत कोणताही भेदभाव न करता मंत्रिपदे दिली आहेत.
Devendra Fadnavis 3.0 cabinet मध्ये एकूण २५ नवनिर्वाचितांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. यामुळे आता महायुतीच्या देवेंद्र फडणवीस ३.० मंत्रिमंडळात भाकरी फिरवली असे म्हणता येईल. कारण आता महायुतीतील एकूण २५ नवनिर्वाचित आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांची देेदीप्यमान कारकीर्द
बदलापूरच्या एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एसआयटी' गठीत केली आहे.
पिंपरी-चिंचवडसह भोसरी विधानभा मतदार संघातील पिंपरी-चिंचवडकरांची जीवनशैली उंचावण्यादृष्टीने महत्त्वपूर्ण विकासकामे आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. त्यामुळे महायुती सरकारकडून पिंपरी-चिंचवडकरांना ‘मान्सून गिफ्ट’ मिळाले आहे.
विकतचे दुखणे लवकर बरे होत नाही असे म्हणतात. 100 कोटींच्या वसुलीचे प्रकरण थंड होते न होते, तोच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असेच विकतचे दुखणे अंगाला लावू घेतले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील सर्वाधिक काळ हा चहाचे फुरके मारण्यात जातो. मुंबईतील आल्हाददायक वातावरणही त्यास कारणीभूत. पण, यंदाचे अधिवेशन मात्र त्याला अपवाद ठरले. महत्त्वाकांक्षी योजनांचा ‘पाऊस’ पाडतानाच सत्ताधार्यांनी पुरवणी मागण्यांचाही विक्रम केला. विरोधकांच्या ध्यानीमनी नसलेल्या एकास एक योजनांची घोषणा करीत महायुतीने विधानसभेच्या विजयाची वाट सुकर केली. त्यानिमित्ताने या अधिवेशनातील महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा...
राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधीत राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होवू देणार नाही, अशी ग्वाही देऊन आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका, अभिप्राय शासनाला कळवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकचा विकास झपाट्याने होत चालला आहे. 2017 च्या नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मी नाशिकला दत्तक घेत असून वार्यावर सोडणार नाही, असा शब्द त्यांनी नाशिककरांना दिला होता.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ या योजनेला काँग्रेसने केवळ विरोधाला विरोध याच हेतूने विरोध करण्याचे पाप करत आहे. तांत्रिक मुद्द्यांची पूर्तता केली असतानाही, राज्यातील सुमारे 3.50 कोटी महिलांना याचा लाभ मिळेल, हे लक्षात आल्यानेच, महायुती सरकारला त्याचा फायदा मिळू नये, या राजकीय हेतूने, विरोधकांनी या योजनेच्या अंमलबजावणीला विरोध करण्याचे ठरवले आहे.
सुशिक्षित, प्रज्ञावंत, लेखक, संपादक आणि मुंबईतल्या मातीतीला खेळ खेळणारा एक खेळाडू, असा सर्वगुणसंपन्न असा चेहरा आपण मुंबई पदवीधर निवडणुकीत दिला आहे, असे विधान वांद्रे येथील संकल्प मेळाव्यात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी किरण यांचे नाव का सुचवले, याचे गमक काही दिवसानंतर कळले. कारण ते वरळी विधानसभा मतदारसंघातून येतात, असा उपरोधिक टोलादेखील शेलार यांनी विरोधकांना लगावला.
डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील रासायनिक कंपनीत स्फोट झाला होता. या अमुदान कंपनीच्या मालक मालती मेहता यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ठाणे क्राईम ब्रांच व पंचवटी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईतून अटक करण्यात आली असून मालती मेहता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या मेहेरधाम परिसरातून नाशिक पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंनी इंडी आघाडीच्या दादर छत्रपती शिवाजी पार्कमध्ये झालेल्या सभेनंतर 'जमलेल्या हिंदू बांधवांनो आणि मातांनो' म्हणणे वारंवार टाळत आले आहेत, अशी माहिती Devendra Fadnavis TV9 Interview मध्ये दिली
उद्धव ठाकरेंनी महापालिकेची सत्ता असताना गेल्या २५ वर्षांत मुंबईसाठी केलेले एक तरी चांगले काम दाखवावे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. १० एप्रिल रोजी केला. उत्तर मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या कांदिवली येथील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
थॅलेसेमिया या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या कर्जमधील (रायगड) १३ वर्षीय वेदांत ठाकरेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 'सुपर हिरो' ठरले आहेत. एका कार्यकर्त्यामार्फत फडणवीस यांना वेदांतविषयी माहिती कळल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यालयातील यंत्रणा कामाला लावली आणि त्याच्यावर उपचार सुरू झाले.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून सौर ऊर्जेचा वापर करून ८ हजार मेगावॅट वीज निर्मिती क्षमता गाठण्यासाठी टेंडर निश्चित करण्यात आली असून हे देशातील विक्रमी काम आहे. संबंधित कंपन्यांना इरादापत्रे दिल्यानंतर त्यांच्याकडून १८ महिन्यात प्रकल्प उभारणी अपेक्षित असून त्यानंतर शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा बारा तास वीज नियमितपणे मिळेल, असे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
स्वत:कडे सत्ता नसल्यावर जाती धर्मांमध्ये दंगली पेटवण्याचं काम सुरु आहे, अशी टीका शिवसेना नेत्या ज्योती वाघमारेंनी शरद पवारांचे नाव न घेता केली आहे. तसेच ५० वर्षांनंतर दुसऱ्याच्या खांद्यावर बसून रायगडावर तुतारी वाजवायला जाणाऱ्यांना जे जमलं नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी करुन दाखवलं आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत. मनोज जरांगेंकडून सतत राज्य सरकारवर करण्यात आलेल्या टीकेला त्यांनी आता प्रत्युत्तर दिले.
कोल्हापूर आणि सांगली भागात पूर व्यवस्थापन प्रणाली राबवून पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्याला देण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आखणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या प्रकल्पाला वित्तसहाय्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही भागांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार असून, फडणवीस यांनी याबद्दल जागतिक बँक, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.
अजित पवार गटाच्या मेळाव्यातील बॅनरवर माजी मंत्री नवाब मलिक यांचे छायाचित्र लागल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी भूमिका पक्की आहे. जी माझी भूमिका आहे तीच भाजपाची भूमिका आहे. त्यापासून आम्ही तसूरभरही दूर झालेलो नाही, असे उत्तर त्यांनी दिले.
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा संमेलन हस्तांतरण सोहळा पुणे येथे रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले,”महाराष्ट्रात ‘कट्यार पाठीत घुसली’ हे २०१९ साली नाट्य घडले. त्यानंतर आम्ही देखील २०२२ साली ‘आता होती गेली कुठे’ हे नाट्य केले”, असे म्हणत नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
झपाट्याने वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे राज्यातील पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण येत असून, सुरक्षा व्यवस्थेतही अनेक त्रुटी आढळून येत आहेत. त्यामुळे भविष्यातील धोके ओळखून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंख्येनुसार पोलीस दलाची फेररचना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरात ४, तर ग्रामीण भागात १० किमीवर पोलीस ठाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे.
श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये होत असलेला कोट्यवधींचा भ्रष्टाचाराची चौकशी सचिव दर्जाचा अधिकारी करणार असून श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त अधिनियम २०१८ ची अंमलबजावणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राईमचा शार्पशूटर ‘सलीम कुत्ता’ हा पेरोलवर तुरुंगाबाहेर असताना उद्धव ठाकरे गटाच्या नाशिक महानगरप्रमुखाने त्याच्यासोबत डान्स पार्टी झाडल्याचा खळबळजनक दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी शुक्रवार, दि. १५ डिसेंबर रोजी विधानसभेत केला
ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने मुंबई उपनगरात पालकमंत्री तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकारातून 'नमो ११ सुत्री कार्यक्रमा'चे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मंगल प्रभात लोढा म्हणाले, नमो ११ सुत्री कार्यक्रम म्हणजे विकास पर्वाची नांदी असल्याचे मंत्री लोढा म्हणाले.
दसरा मेळावानिमित्त उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरेंनी शिवाजी पार्क येथे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संबोधित केले. यावेळी शिवतीर्थावर अर्धवट भरलेल्या मैदानात अर्धवटरावांनी पुन्हा एकदा पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींवर टीका केली आणि घराणेशाही वाचवण्यासाठी एकत्र आलेल्या इंडी आघाडीची वकीली केली, असा घणाघात महाराष्ट्र भाजपने उबाठा गटावर केला.
कंत्राटी नोकर भरतीवरून जनसामान्यांची, बेरोजगार तरुणांची उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी दिशाभूल केली आहे. यांचे हे पाप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघडं केले असून उद्धव ठाकरे, शरद पवारांनी महाराष्ट्रातील जनतेची नाक घासून माफी मागावी, असा घणाघाती हल्लाबोल भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज मुंबई भाजपा दक्षिण जिल्ह्याच्या वतीने जिल्हा कार्यालय, गिरगांव येथे आयोजित केलेल्या जन आक्रोश आंदोलनावेळी केला.
वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसविण्याची तयारी सुरू झाली असून काही महिन्यात हे मीटर टप्याटप्प्याने कार्यरत होतील, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. दरम्यान, राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रणाचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे महत्त्वाचे पाऊल महावितरणने उचलले आ
सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असून, त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
‘आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा १५ ते १६ टक्के आणखीन वाढवा,’ असे शरद पवार म्हणतात. समजा, मराठा आरक्षण देण्यासाठी केंद्र आणि राज्याने तरतूद केली आणि जर आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक वाढवले, तर संविधानामध्ये बदल करणारे मोदी, भाजप आणि फडणवीस कोण? ते काय संविधानापेक्षा मोठे झाले का? असे म्हणत समाजाला उकसवण्यामध्ये आणि ‘संविधान बचाव‘ म्हणत आंदोलन पेटवायला पुढे कोण असेल, हे सांगायला हवे का? पवार इतक्या तडफेने आरक्षणाबद्दल का बोलत होते, याचे उत्तर स्पष्ट आहे.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने यंदापासून सुरु करण्यात आलेले ’महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ मान्यवरांच्या हस्ते रविवार, दि. २० ऑगस्ट रोजी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आले. यावेळी ’उद्योग रोजगार मित्र’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम नवउद्योजकांसाठी वरदान ठरणार आहे.
समाजमाध्यमातून महामानवांबाबत आक्षेपार्ह लिखाण करून समाजात तेढ निर्माण करणार्या समाजकंटकांवर कडक कारवाई होण्यासाठी राज्य शासन लवकरच उच्चस्तरीय समिती नेमणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तुफान पाऊस सुरु असून काही भागात दरड कोसळल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर डोंगर कोसळला त्यात २० जणांना आपला जीव गमवावा लागला. मध्य महाराष्ट्र, चंद्रपूर , गडचिरोली भागांना हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला होता. दरम्यान, यवतमाळ तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असून आनंदनगर ताडा भागात पुराच्या पाण्यात जवळपास ४५ लोक अडकले असून राज्य शासनाकडून बचावकार्य सुरु आहे.
इर्शाळवाडी दुर्घटनेत बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वतीने करण्यात आली आहे. इर्शाळवाडीतील ग्रामस्थांवर कोसळलेल्या या संकटामुळे गावातील असंख्य कुटुंब उध्वस्त झाली असून अनेकांचा आधार यामुळे हिरावून गेला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॅा.नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी पीडितांची भेट घेत शासन आपल्या पाठीशी उभा असल्याची हमी दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारल्याची माहिती दिली.
फडणवीस यांनी नागपुरात युवा नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पक्ष कार्यकर्ता ते मुख्यमंत्री अशा तीन दशकांच्या या प्रवासात त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाला अनेक आयाम जोडले. तीन दशकांच्या राजकारणातील या प्रवासाने त्यांना बरेच काही करायला आणि शिकायला मिळाले आहे.
देवेंद्रजी अभ्यासाशिवाय बोलणार नाही, हे त्यांचे विरोधकही पुरते जाणून आहेत. आपल्या कुशाग्र बुद्धीची सखोल अभ्यासाची प्रभावी नियोजनाची विलक्षण अशा रणनीतीची जोड देत देवेंद्रजी ज्या पद्धतीने राजकारणात वाटचाल करीत आहेत, ते पाहता त्यांचे भविष्य आणखी उज्वल असणार आहे, यात जराही शंका नाही.
वेंद्रजी हे गेल्या ४५ वर्षांत आपला कार्यकाळ पूर्ण करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले. त्यामुळेच देशभरात यशस्वी प्रशासक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. देवेंद्रजी म्हणजे एक राजकीय रणनीतीकार, ज्याने आपल्या रणनीतीच्या जोरावर आपल्या विरोधकांना मैदानाबाहेर फेकले. देवेंद्रजी म्हणजे एक उत्कृष्ट वक्ता, जो आपल्या बुद्धिमत्तेने आणि अभ्यासूवृत्तीच्या जोरावर विरोधकांना कायमच पुरून उरतो आणि याहीपलीकडे एक असा कार्यकर्ता, जो ‘राष्ट्र प्रथम’, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वत: याच तत्वानुसार अव्याहतपणे वाटचाल करतो आहे
नेता म्हणून सत्तेवर राहण्याच्या व विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याच्या दोन परीक्षा ते यशस्वीपणे उत्तीर्ण झाले आहेत. प्रत्यक्ष सत्ता हाती नाही, पण सत्तासूत्र मात्र सांभाळायचे आहे, हा नियतीने त्यांना सोडवायला दिलेला तिसरा सर्वांत अवघड पेपर आहे. या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले की, महाराष्ट्राचे किमान पुढचे दशक त्यांचे असेल.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि लोकनेते देवेंद्रजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांना उत्तम आणि सुदीर्घ आयुष्य लाभावे, हीच आई मुंबादेवीच्या चरणी सदिच्छा व्यक्त करतो.
पोलिसांच्या दोन कर्मचार्यांनी गस्तीवर असताना वाहनचोरीच्या संशयावरून सतर्कता दाखवीत तीन दहशतवाद्यांना पकडले. यातील एक जण पसार होण्यात यशस्वी झाला. मात्र, दोन जणांना मात्र ताब्यात घेण्यात आले. या दहशतवाद्यांवर राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले आहे. राजस्थानमधील एका गुन्ह्यात ते फरार आहेत. मागील गेल्या दीड वर्षांपासून ते पुण्यात लपल्याचे समोर आले आहे. हे दोघेही ‘आयसीस’ या दहशतवादी संघटनेपासून प्रेरित झालेल्या ’सुफा’ या संघटनेचे सदस्य आहेत.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जातीय तेढ, विद्वेषात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या भाषणांवर निर्बंध असून औरंगाबाद येथील प्रकरणात उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोषींची शहानिशा करुनच पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, औरंगाबाद येथे रामनवमीच्या दिवशी दोन समुदयांमध्ये झालेल्या वादासंदर्भात आ. अबू आझमी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना गृहमंत्री फडणवीस बोलत होते.
विरोधकांच्या बंगळुरूमधील बैठकीपूर्वी अजित पवार यांच्या गटातील मंत्री व नेत्यांनी सलग दोन दिवस शरद पवारांच्या मुंबईत भेटीगाठी घेतल्या. यावेळी पवारांची मनधरणी करण्याचा, राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ राखण्यासाठी प्रयत्न करावे, म्हणून अजितदादा गटातील नेत्यांनी खूप प्रयत्न केले. पवारही या सगळ्या नेत्यांना आवर्जून भेटले. त्यांचे म्हणणेही ऐकून घेतले. त्यावर पवारांनी काहीही प्रतिक्रिया दिल्या नसल्याच्या बातम्याही समोर आल्या.
“ ‘पंतप्रधान मित्र टेक्सटाईल पार्क’मुळे महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीला अधिक बळ मिळेल,” असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण व वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे. अमरावती येथे ‘पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अॅण्ड अॅपेरल’ (पार्क) चा दि. 16 जुलै रोजी शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.