देवेंद्र फडणवीस ३.० मंत्रिमंडळात जातीय सलोखा, प्रत्येक समाजातील आमदारास कॅबिनेट मंत्रिपद

    15-Dec-2024
Total Views | 71
 
Devendra Fadnavis 3.0 cabinet
 
नागपूर : महायुतीला विक्रमी बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी शपथ घेतली. त्याचसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही शपथ घेत सत्ता स्थापन केली. त्यानंतर १५ डिसेंबर २०२४ रोजी महायुतीच्या एकूण ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेत कारभार स्वीकारला आहे. यामध्ये जातीय सलोखा जपत कोणताही भेदभाव न करता मंत्रिपदे दिली आहेत.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुर येथे झाला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी महायुतीच्या ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपचे एकूण १९ आमदार आहेत. तर शिवसेनेचे एकूण ११ आमदार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ आमदारांनी शपथ घेतली आहे.
 
दरम्यान या मंत्रिमंडळात भौगोलिक, आर्थिक दुर्भल परिस्थिती असलेल्या आमदारांना आणि जातीय सलोखा जपण्यात आल्याची प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!; भारताचे पाकवर टीकास्त्र

"ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!"; भारताचे पाकवर टीकास्त्र

(India on Trump-Munir meet) पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांची ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांऐवजी लष्करप्रमुख ट्रम्प यांना भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवर आता भारताने प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे...

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121