हवामान बदल आणि मान्सूनची नवी कहाणी...

    31-May-2025
Total Views | 16
  
हवामान बदल आणि मान्सूनची नवी कहाणी...

एरवी जूनमध्ये महाराष्ट्रात हजेरी लावणारा मान्सून ऐन कडाक्याचा उन्हाळा असणार्या मे महिन्यातच अवकाळी तुफान बरसला. परिणामी, मुंबईसारखी शहरे पहिल्याच पावसात पाण्याखाली गेली आणि राज्यातील कृषिक्षेत्रालाही त्याचा फटका बसला. आता पुन्हा पावसाने विश्रांती घेतली असून, सूर्य आग ओकू लागला आहे. त्यानिमित्ताने हवामानातील हे आमूलाग्र बदल, मान्सूनने महिनाभर अगोदरच दिलेली वर्दी आणि एकूणच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजना यांची सविस्कर कारणमीमांसा करणारा हा लेख...


भारताची आर्थिक राजधानी मुंबई ही तिच्या मान्सूनशी अविभाज्यपणे जोडलेली आहे. दरवर्षी येणारा हा जलप्रपात सहसा जूनच्या सुरुवातीला येतो; शहरासाठी जीवनदायिनी ठरतो, जलस्रोतांना पुन्हा भरतो आणि उन्हाळ्याच्या दाहक उष्णतेपासून दिलासा देतो. पण, गेल्या काही वर्षांपासून मुंबईच्या मान्सूनची लय अधिकाधिक अनियमित होत चालली आहे. त्याच्या पद्धतींमध्ये एक स्पष्ट बदल दिसून येतो, ज्यात अनियमित आगमनाची वेळ, कमी वेळेत अधिक तीव्र पाऊस पडणे आणि पावसाळ्यादरम्यान दीर्घ काळ कोरडे हवामान यांचा समावेश होतो. मुंबईच्या पावसाळ्यात अशा घटना इतया सामान्यपणे घडत नसत. जागतिक पातळीवर पर्यावरणातील बदल आणि त्याने तीव्र होत चाललेल्या ‘एल-निनो’ (AL-NINO) आणि ‘ला-निना’ (LA-NINA) सारख्या जागतिक घटनांमुळे ही बदलती हवामानस्थिती, शहरी नियोजन, पायाभूत सुविधा आणि लाखो रहिवाशांच्या दैनंदिन जीवनासाठी महत्त्वपूर्ण आव्हाने उभी करत आहे आणि याच बदलाचे प्रत्यक्षिकीकरण झाले ते दि. २५, २६ आणि २७ मे रोजी.


यावर्षी दि. १ मे ते २७ मे रोजीदरम्यान भारतीय हवामान विभागाच्या पावसाच्या आकडेवारीनुसार, मुंबई शहर वेधशाळेने (कुलाबा) ४५६.५ मिमी, तर सांताक्रूझ वेधशाळेने ३४२ मिमी पाऊस नोंदवला. अशा प्रकारे शहराने १९१८ मध्ये नोंदवलेल्या मे महिन्यातील २८० मिमी पावसाचा मागील उच्चांक आरामात ओलांडला आहे. पावसाच्या आकडेवारीनुसार, दि. २५ मे सकाळी ८.३० ते दि. २६ मे सकाळी ८.३० या २४ तासांत मुंबई शहरात सरासरी पडणार्या ०.२ मिमी पावसाच्या तुलनेत १३५.४ मिमी पाऊस झाला. म्हणजेच, तब्बल ६७ हजार, ६०० टक्के अधिक. दुसर्या दिवशी म्हणजेच, दि. २६ मे रोजी सकाळी ८.३० ते दि. २७ मे सकाळी ८.३० या वेळेत मुंबई शहरात सरासरी ०.६ मिमीच्या तुलनेत १६१.९ मिमी पाऊस झाला. म्हणजेच २६ हजार, ८८३ टक्के अधिक. पण, असं यावर्षी का घडलं?

यावर्षी मान्सून इतया आधी कसा?


यावर्षी मुंबईत नैऋत्य मान्सूनचे असामान्यपणे लवकर आगमन झाले, हे आपण सगळेच जाणतो. आपल्यापैकी कित्येकजण बिना छत्री गेल्या आठवड्यात अडकले असूच. भारतीय हवामान विभागाने दि. २६ मे रोजी मान्सून सुरू झाल्याची अधिकृत घोषणा केली. ही घोषणा त्याच्या दि. ११ जूनच्या सामान्य आणि अपेक्षित आगमनाच्या तारखेच्या तुलनेत तब्बल १६ दिवस आधी आहे. गेल्या ७५ वर्षांतील मुंबईतील मान्सूनचे हे सर्वांत लवकर आगमन आहे, ज्यामुळे कुलाबा वेधशाळेत मे महिन्यात झालेल्या पावसाचा १०७ वर्षांचा विक्रम मोडला गेला. मान्सूनच्या पहिल्याच दिवशी येथे २९५ मिमी पावसाची नोंद झाली. या अभूतपूर्व आणि तीव्र पावसामुळे त्वरित सर्वत्र पाणी साचले, ज्यामुळे अपरिमित वाहतुककोंडी आणि दैनंदिन जीवनात मोठा व्यत्यय आला. थोडयात, आपण कुणीच, मानव आणि मुंबईची यंत्रणा तयार नव्हती. पण, असं का झालं असावं, याचा आज आपण थोडा विचार करूया.

२०२५च्या मान्सूनच्या या असामान्य लवकर आगमनाचे श्रेय अनेक विशिष्ट हवामानशास्त्रीय घटकांना दिले जाऊ शकते. हवामान शास्त्रज्ञांनी ‘पश्चिमेकडे सरकणार्या विषुववृत्तीय रॉस्बी लाटां’चे (Westward propagating equatorial rossby waves) विकसित होत असलेल्या मान्सूनच्या वातावरणातील अभिसरणासोबत (Monsoon circulation) परस्पर-क्रिया होत असल्याचे अधोरेखित केले आहे. या दोन हवामान घटकांमधील अन्योन्य क्रियेमुळे पावसाची तीव्रता लक्षणीय वाढली असावी आणि मान्सूनचे आगमन जलद झाले असावे, असा शास्त्रीय अंदाज आहे, असे हवामानशास्त्रज्ञ आणि भारतीय हवामान विभाग, पुणे येथील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे माजी प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ’डाऊन टू अर्थ’ला सांगितले. याव्यतिरिक्त यावर्षी अरबी समुद्रातील पश्चिमेकडे वाहणारा प्रवाह आणि नैऋत्य दिशेने वाहणारा प्रवाह (Westerly to south westren currents) शक्तिशाली असल्याने आवश्यक आर्द्रता प्रभावीपणे पश्चिम किनारपट्टीवर पोहोचली आहे. त्याचसोबत, अरबी समुद्राच्या मध्यभागी, रत्नागिरीच्या अक्षांशावर (१६.९९ उ.) उच्च-स्तरीय अभिसरण (Upper air circulation) बनले होते आणि याच परिसरात किनारपट्टीजवळ एक स्पष्टपणे दिसणारे कमी दाबाचे क्षेत्रदेखील निर्माण झाले होते. हाच कमी दाबाचा पट्टा दि. २० मे रोजीच्या आसपास रत्नागिरीकडून आतल्या भागात सरकत, नंतर दक्षिणमध्ये महाराष्ट्रावर स्थिरावला. या पट्ट्यानेदेखील मान्सूनला उत्तरेकडे खेचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे समजते.

पण, या प्रादेशिक घटना ना? मग त्यांचा इतका प्रभाव? चला, या काही महत्त्वाच्या प्रादेशिक हवामान घटनांनंतर आपण मोठ्या प्रमाणात घडणार्या जागतिक पातळीच्या घटनांचे आणि सध्याच्या मुंबई मान्सूनवरील त्यांच्या परिणामांचे विश्लेषण करूया. ‘एल निनो-सदर्न ऑसिलेशन’ (एछडज) सायकल, ज्यात ‘एल-निनो’ आणि ‘ला-निनो’ हे दोन विरुद्ध टप्पे असतात. जागतिक हवामान पद्धतींवर, विशेषतः भारतीय मान्सूनवर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकतात. ‘एल-निनो’, मध्य आणि पूर्व-मध्य विषुववृत्तीय प्रशांत सागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात वाढ झाल्याने निर्माण होतो. ‘एल-निनो’मुळे सामान्यतः भारतात मान्सून कमकुवत होतो आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो, ज्यामुळे अनेकदा दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. याउलट, ‘ला-निना’मध्ये ज्याला ‘कोल्ड इव्हेंट’ असेही म्हटले जाते, पूर्व पॅसिफिकमधील समुद्राचे तापमान सामान्यपेक्षा थंड होते. या बदलामुळे सहसा भारतात मजबूत मान्सून आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस होतो. ‘एल-निनो’ आणि ‘ला-निना’ हे ’एछडज’ चक्रातील टप्पे आलटून पालटून येतात.

२०२४च्या मान्सून हंगामात आणि २०२५च्या मान्सूनच्या सुरुवातीस जागतिक पातळीवर तटस्थ ’ईएनएसओ’ (ENSO) परिस्थिती होती, याचा अर्थ कोणताही मोठा प्रभाव ‘एल-निनो’ किंवा ‘ला-निना’मुळे घडत नव्हता. पण, याच कारणाने प्रादेशिक वातावरणीय घटनांना आणि अरबी समुद्रातील सागरी गतिशीलतेला अधिक स्पष्ट प्रभाव टाकण्याची संधी यावर्षी मिळाली. याचसोबत, मार्च आणि एप्रिल महिन्यांतील तीव्र उष्णतेमुळे जलद तापलेल्या हिंदी महासागर आणि पश्चिम प्रशांत महासागरातील उबदार पाण्यामुळे हवेतील आर्द्रता पटकन वाढली. या दोन्ही-तिन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम, तीव्र पूर्व-मान्सून पाऊस आणि मान्सूनचे १६ दिवस आधी आगमन असू शकतो, असा शास्त्रीय अंदाज बांधला जाऊ शकतो.


मुंबईच्या पावसाच्या आकडेवारीतील बदल



मुंबईची पावसाची वर्षानुवर्षांची आकडेवारी जागतिक हवामानबदलाच्या ट्रेंडसोबत जुळणारा एक चिंताजनक कल दर्शवते. शहरात एक विशिष्ट ‘पावसाळ्याचा ऋतू’ मानला जात असला, तरी या पावसाचे स्वरुप लक्षणीयरित्या बदलले आहे. पारंपरिकपणे, मुंबईच्या मान्सूनमध्ये स्थिर, दीर्घकाळ चालणार्या पावसाच्या सरी होत्या. कधीकधी कैक दिवस संततधार पडणारा पाऊस शहरात अनेक दिवस सूर्य दिसू नाही द्यायचा. पण, गेल्या काही दशकांपासून कमी कालावधीत अतिवृष्टीच्या घटनांची (Extreme rainfall events ) वारंवारता आणि तीव्रता लक्षणीय वाढली आहे. कधी नव्हे, तर भर पावसाळ्यात कोरडे आठवडे मुंबई अनुभवत आहे.


भारतीय हवामान विभाग आणि इतर हवामान अभ्यासांनुसार, मुंबईत कमी वेळेत अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. उदाहरणार्थ, दक्षिण मुंबईचे प्रतिनिधित्व करणार्या कुलाबा वेधशाळेची सरासरी वार्षिक पर्जन्यमान २,२१३.४ मिमी, तर मध्य आणि उपनगरीय मुंबईचे प्रतिनिधित्व करणार्या सांताक्रूझ वेधशाळेची सरासरी २,५०२.३ मिमी नोंदली जाते. पण, तरी मुंबईत अनेत ठिकाणी वेगवेळल्या तीव्रतेने पाऊस पडताना दिसतो. म्हणजेच, मुंबईची वार्षिक सरासरी सामान्य इतकीच असली, तरी महत्त्वाचा बदल हा पावसाच्या वितरणात आणि तीव्रतेत झालेला दिसून येतो.


२०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या ’नेचर’ नावाच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमधील शोधनिबंधात असे नमूद केलेले आहे की, मुंबईमध्ये १९५०च्या दशकापासून तीव्र पर्जन्य वादळांच्या घटनांमध्ये तब्बल तिप्पट वाढ झाली आहे. हा ट्रेंड मध्य भारतात अतिवृष्टीच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीच्या व्यापक नमुन्याचा भाग असल्याचे शोधनिबंधात म्हटले आहे.


याचे उत्तम उदाहरण म्हणजे, २००५च्या विक्रमी जलप्रलयासारख्या घटनांमध्ये हा बदल स्पष्टपणे दिसतो, जिथे सांताक्रूझमध्ये एकाच दिवसात अभूतपूर्व ९०० मिमी पाऊस पडला, तर फक्त २५ किमी दूर असलेल्या कुलाबा येथे केवळ ८१ मिमी पाऊस पडला. हे उदाहरण, असंतुलन आणि तीव्रता अधोरेखित करते. पण अशा घडामोडी आता अधिक सामान्य होत आहेत, असा डेटा सांगतो. यासारख्या उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की, जरी एकूण वार्षिक पाऊस सारखाच राहिला, तरी पावसाळ्यात काही तास किंवा दिवसांमध्ये त्या पावसाचे प्रमाण वाढल्याने शहरी पुराचा धोका लक्षणीयरित्या वाढतो.


‘इंटर-गव्हरमेन्टल पॅनेल ऑन लायमेट चेंज’ (खझउउ) अहवालांनीही या निरीक्षणांना दुजोरा दिला आहे. या अहवालांमध्ये असे स्पष्ट नमूद केले आहे की, २१व्या शतकात भारतातील महानगरांपैकी मुंबईमध्ये एकूण वार्षिक पर्जन्यमानात सर्वाधिक वाढ अपेक्षित आहे. अंदाजित डेटाच्या आधारे जर सर्वांत जास्त वाढीचा विचार केला, तर २०२१-२०४० दरम्यान एकूण पर्जन्यमान २०.५ टक्के, २०४१-२०६० दरम्यान ३२.७ टक्के आणि २०८१-२१०० दरम्यान ६१.२ टक्के इथपर्यंत लक्षणीय वाढू शकते, असे अहवालांमधील डेटावरून कळते. याव्यतिरिक्त एकाच दिवसातील कमाल पर्जन्यमानातही लक्षणीय वाढ अपेक्षित आहे, अशा दिवसांमध्ये सरासरी १०२ मिमी इतका पाऊस अपेक्षित आहे. एक महत्त्वाचा संदर्भ द्यायचा तर, २००५च्या महापुरात अभूतपूर्व असा ९०० मिमी पाऊस पडला होता आणि दि. २६ मे २०२५ रोजी २९५ मिमी पाऊस पडला होता. हे दोन्ही आकडे, अपेक्षित पावसाच्या तुलनेत आताच काही पटींनी जास्त आहेत. सरासरी १०२ मिमी पाऊसदेखील औद्योगिक पूर्व काळाच्या तुलनेत ५३ टक्के वाढ दर्शवतो. ही सांख्यिकीय वाटचाल शहराला अधिकाधिक तीव्र आणि अप्रत्याशित पावसाचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट चित्र रेखाटते.


आता काय? उपाययोजना, भविष्यातील दृष्टिकोन आणि मान्सूनचे अंदाज




मुंबईतील बदलत्या पावसाच्या पद्धतींना सामोरे जाण्यासाठी विचारविनिमयाने तयार केलेली मजबूत, पण तितकीच बदलाभिमुख उपाययोजना निर्माण करण्यासाठी दूरदृष्टीचे धोरण आवश्यक आहे. शहराची पुराची संवेदनशीलता केवळ वाढलेल्या पावसामुळे नाही, तर जुन्या पायाभूत सुविधा, नैसर्गिक पूर संरक्षणाचे अदृश्य होणे आणि अनियोजित शहरीकरण यांसारख्या अनेक घटकांमुळे आहे, हे समाजणे आणि स्वीकारणे आवश्यक आहे.


सर्वांत महत्त्वाच्या उपाययोजनांपैकी एक म्हणजे, मुंबईच्या पर्जन्यजल निचरा प्रणालीची दुरुस्ती आणि त्यात तांत्रिक सुधार करणे. शहराच्या भूमिगत निचरा प्रणालीचा मोठा भाग ब्रिटिशकालीन आहे, जो प्रतितास केवळ २५ मिमी पाऊस हाताळण्यासाठी तयार केलेला होता. आज ही प्रणाली तीव्र अतिवृष्टीसाठी अत्यंत अपुरी पडत आहे. ‘बृहन्मुंबई स्ट्रॉम वॉटर ड्रेन प्रकल्पा’सारख्या महत्त्वाकांक्षी योजना प्रस्तावित केल्या गेल्या असल्या तरी, त्यांची अंमलबजावणी मंद गतीने होत आहे. या प्रकल्पांना गती देणे, योग्य देखभाल सुनिश्चित करणे आणि गटारांमधील गाळ नियमितपणे काढणे मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.


पारंपरिक निचरा प्रणालीच्या पलीकडे, मुंबई भूमिगत जलसाठ्यांसारख्या अभिनव उपायांचादेखील शोध घेते आहे. या टाया तीव्र पावसादरम्यान अतिरिक्त पाणी साठवण्यासाठी बनवल्या जाऊ शकतात. हे पाणी नंतर कमी भरतीच्या वेळी समुद्रात सोडले जाऊ शकते किंवा भूजल पुनर्भरणासाठी वापरले जाऊ शकते.


मुंबईतील नैसर्गिक परिसंस्था, विशेषतः तिचे विस्तृत खारफुटीचे जंगल आणि पाणथळ जागा, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण नैसर्गिक स्पंज म्हणून काम करत आल्या आहेत. तथापि, अनेक दशकांच्या अनियंत्रित विकासामुळे ४० टक्क्यांपेक्षा जास्त खारफुटीचा नाश झाला आहे. उर्वरित खारफुटीचे संरक्षण करणे आणि मोठ्या प्रमाणावर पुनर्संचयनाचे प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. शहराच्या नैसर्गिक जलशास्त्राचा आदर करणारे शाश्वत शहरी नियोजनदेखील आवश्यक आहे. हयात पूरप्रवण क्षेत्रांमध्ये बांधकामावर नियंत्रण ठेवणे आणि नवीन विकास प्रकल्पांमध्ये पाणी शोषून घेणार्या पृष्ठभागांचा किंवा पर्जन्यजल संचयन प्रणालींचा समावेश करणे आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेली, ‘मुंबई लायमेट अॅशन प्लॅन’ (MCAP) ही योजना, हवामान कृतीला शहरी विकासात समाकलित करून या आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करते. हयात ऊर्जा आणि इमारती, शाश्वत कचरा व्यवस्थापन, शहरी हरितीकरण आणि जैवविविधता, हवेची गुणवत्ता आणि शहरी पूर व जलस्रोत व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे.

रिअल-टाईम हवामान डेटा, प्रगत अंदाज मॉडेल आणि लवकर धोयाची सूचना देणारी प्रणाली, आपत्ती परिस्थितीत तयारीसाठी महत्त्वपूर्ण कार्य करू शकतात. भारतीय हवामान विभागाची वेळेवर आणि अचूक अंदाज देण्याची क्षमता वाढवल्यास आणि ती माहिती लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवू शकल्यास, अतिवृष्टीच्या घटनांचा प्रभाव लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. याव्यतिरिक्त समुदायस्तरीय तयारीदेखील शहराची लवचिकता वाढवू शकते. अनुकूलन उपाय महत्त्वाचे असले, तरी दीर्घकालीन लवचिकतेसाठी हवामानबदलाच्या शमनासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करणेदेखील आवश्यक आहे. या प्रयत्नांमध्ये स्वच्छ ऊर्जास्रोतांकडे संक्रमण, इलेट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे आणि शाश्वत कचरा व्यवस्थापन पद्धती लागू करणे यांचा समावेश होतो.


येत्या काळात मुंबईच्या हवामानाची वाटचाल अधिक वारंवार आणि तीव्र पावसाच्या घटना, वाढत्या समुद्राची पातळी आणि उच्च सरासरी तापमान दर्शवते. यासाठी शहरी विकास आणि हवामान अनुकूलनासाठी एक सक्रिय आणि एकात्मिक दृष्टिकोन आवश्यक होणार आहे. भविष्यातील नियोजनाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे स्मार्ट सिटी तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करणे नक्कीच आपत्कालीन परिस्थितीत मुंबईला संसाधनाचा उत्तम वापर करायला मदत करू शकते. यासाठी डेटा विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचादेखील लाभ घेतला जाऊ लागला आहे. उन्नत रस्ते, पूर-प्रतिरोधक इमारती आणि रेसिलियंट ऊर्जा प्रणाली यांसारख्या पायाभूत सुविधांचा विकास करणे महत्त्वाचे ठरेल. पर्यावरणीय कारभाराची संस्कृती आणि नागरिक सहभागाला प्रोत्साहन देणेदेखील महत्त्वाचे आहे, ज्यात खारफुटी पुनर्संचयनामध्ये समुदायांना गुंतवणे आणि पर्जन्यजल संवर्धनाला प्रोत्साहन देणे यांचा समावेश होतो. लहान मुलांना हवामानबदलाविषयी शिक्षित करणे (उदा. महाराष्ट्रातील शाळांमधील ‘माझी वसुंधरा’सारखा अभ्यासक्रम) अधिक हवामानजागरूक नागरिक निर्माण करेल.


२०२५चा पावसाळा कसा असेल?



लवकर आणि तीव्र आगमनानंतर, भारतीय हवामान विभागाने (IMD) सूचित केले आहे की, मुंबईत पावसाला थोडा विराम मिळण्याची शयता आहे, ज्यात दि. २९ मे ते ७ जून दरम्यान कोरडे हवामान अपेक्षित आहे. या काळात मुंबई, पुणे आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात नगण्य पाऊस पडेल. हा तात्पुरता विराम कमी दाबाच्या प्रणालीमुळे मान्सूनवर झालेल्या प्रारंभिक खेचण्याच्या प्रभावार्(Pulle ffect) मुळे असेल.


मुंबईसाठी भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार जून ते ऑगस्ट २०२५ या काळात जोरदार मान्सून अपेक्षित आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धात मान्सूनचे आगमन जरी लवकर आणि तीव्र झाले असले, तरी जूनच्या सुरुवातीला थोडा विराम असू शकतो. तरीही, संपूर्ण मान्सून हंगामासाठी (जून ते सप्टेंबर) देशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. विशेषतः जून महिन्यात खचऊने देशात सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या जुलै आणि ऑगस्ट हे मुंबईसाठी सर्वांत जास्त पावसाचे महिने असल्याने शहराला या काळात वारंवार मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, उच्च आर्द्रता आणि शहरात ठराविक ठिकाणी पाणी साचण्याच्या नेहमीच्या आव्हानांसाठी तयारी करावी लागेल.

मुंबईच्या बदलत्या मान्सूनच्या पद्धतींमुळे निर्माण झालेली आव्हाने प्रचंड आहेत. परंतु, यांचा सामना करणे शय आहे. भूतकाळातील अनुभवांमधून शिकून, वैज्ञानिक अंतर्दृष्टी स्वीकारून, मजबूत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करून, नैसर्गिक परिसंस्था पुनर्संचयित करून आणि सामूहिक कृतीला प्रोत्साहन देऊन, मुंबई एक खर्या अर्थाने ‘लायमेट रेसिलियंट’ महानगर बनू शकते. हे शहर मग नक्कीच बदलत्या हवामानातील गुंतागुंत हाताळू शकेल आणि जागतिक पातळीवर भरभराट करत राहील.



डॉ. मयूरेश जोशी
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
वेदिका ब्राम्हण महिला मंडळ भीशीच्या माध्यमातून महिलांचे एकत्रीकरण

वेदिका ब्राम्हण महिला मंडळ भीशीच्या माध्यमातून महिलांचे एकत्रीकरण

भिशीचे फायदे अनेक असले, तरी भिशीच्या माध्यमातून महिलांचे एकत्रीकरण आणि त्याद्वारे पुढे सामाजिक कार्य उभे राहिल्याचे आपण क्वचितच ऐकले असेल. मनमाडमधील ‘वेदिका ब्राह्मण महिला मंडळ’ भिशीच्या माध्यमातून शेकडो महिलांना एकत्र करून सामाजिक आणि धार्मिक कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवत आहे. केवळ पैसा हे उद्दिष्ट न ठेवता, महिलांनी एकत्र येऊन सामाजिक, धार्मिक कार्यात सहभागी व्हावे, तसेच एकमेकांशी संवाद वाढावा, हे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. जाणून घेऊया, मनमाडमधील नोंदणी नसतानाही सर्वदूर प्रसिद्धीस पावलेल्या या अनोख्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121