म्हणून 'या' इस्लामिक राष्ट्राने भारताकडे सोपवले 'ते' दोन दहशतवादी

Total Views | 162

Indonesia handed over two terrorists to India

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Indonesia handed over two terrorists to India) एनआयएने अब्दुल्ला फयाज आणि तल्हा खान या दोन दहशतवाद्याना मुंबई विमानतळावरून अटक केल्याचे वृत्त आपण पाहिले. मात्र त्यांना मुंबईत पकडले नसून इस्लामिक राष्ट्र इंडोनेशियाने कायदेशीर प्रक्रियेनंतर दोघांना भारताच्या ताब्यात दिल्याचे स्पष्ट होते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही आधी महाराष्ट्रात आयसिससाठी गुप्तपणे काम करत होते आणि नंतर ते देश सोडून इंडोनेशियाला पळून गेले.

हे वाचलंत का? : बलुचिस्तानने उडवली पाकड्यांची झोप! चिनी डोंगफेंग आर्मर्ड व्हेईकल केले उध्वस्थ

इंडोनेशिया हा जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. असे असतानाही इंडोनेशियाने भारताला मदत केली आणि त्या दोघांनाही भारताच्या स्वाधीन केले. हे सहकार्य अशा वेळी झाले जेव्हा अलीकडेच पहलगाम येथे इस्लामिक दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढला. मात्र इंडोनेशियाने या हल्ल्याचा निषेध केला आणि भारताला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

भारत आणि इंडोनेशियाचे संबंध बऱ्याच काळापासून चांगले आहेत. इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री आणि राष्ट्रपती पदाचे उमेदवार प्रबोवो सुबियांतो यांनी भारताच्या आक्षेपामुळे त्यांनी पाकिस्तानचा दौराही रद्द केला होता आणि नियोजित वेळेपेक्षा जास्त दिवस भारतात राहिले होते. या दहशतवाद्यांना भारतात आणण्यात भारत सरकारची राजनैतिकता आणि इंडोनेशियाशी असलेले मजबूत संबंध यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

इंडोनेशिया शांतीचा संदेश देतो, इस्लाम दहशतवादाचा नाही
प्रबोवो सुबियांतो यांनी स्पष्टपणे सांगितले की इंडोनेशिया इस्लाम दहशतवादाचा नाही तर शांतीचा संदेश देतो. त्यांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि भारताला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. हे स्पष्ट आहे की भारत आणि इंडोनेशिया दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकत्र आहेत.

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121