पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
19-Jul-2023
Total Views | 60
मुंबई : गेल्या २४ तासांपासून राज्यभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असून राज्यातील विविध भागांतील जनजीवनाला फटका बसला आहे. विशेषतः पश्चिम किनारपट्टीभागात पावसाचा जोर कायम असून येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागने दिला आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील अनेक शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, राज्यातील प्रशानस यंत्रणा अलर्टवर असून राज्यातील विविध भागातील पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका संभवतो आहे. भारतीय हवामान विभागाने दि. १९ जुलै रोजी मुंबई आणि उपनगरातील काही भागांसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला असून काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून काही भागात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.