रामायणात, रामाने सामान्य लोकांना एक ध्येय दिले आणि रावणाची शक्ती नष्ट केली. आपल्या सर्वांना दिशा देण्यासाठी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. समाजात अनेक चुकीच्या कथा निर्माण झाल्या आहेत ज्या खूप खोलवर रुजल्या आहेत आणि त्यांना पूर्णपणे नष्ट करण्याची जबाबदारी खूप मोठी आणि महत्त्वाची आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश सोनी यांनी केले.
Read More
रामायण, महाभारताचे गाढे अभ्यासक, तत्तवचिंतक दाजी पणशीकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मालवली. ठाणे इथल्या त्यांच्या निवासस्थानी ६ जूनच्या सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वामध्ये व्यासंगी अभ्यासक अशी ज्यांची ख्याती होती त्या दाजी पणशीकरांनी समाजप्रबोधनाचे अत्यंत महत्वाचं काम केले. त्यांच्या हेच जीवनकार्य जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून
Ramayana हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही तितक्याच ठळकपणे आग्नेय आशियातील कंबोडियामध्ये दृष्टिपथास पडतात. अंगकोर वाट हे जगातील सर्वांत मोठे हिंदू मंदिरदेखील याच कंबोडियामध्ये. यावरुन कंबोडियातील हिंदू धर्मप्रभाव स्पष्ट व्हावा. त्यात रामकथेच्या अविट गोडीची भुरळ कंबोडियाच्या जनमानसावर आजही स्पष्टपणे दिसून येते. कंबोडियातील रामायणाची कथा काही बदल आणि पात्रे सोडल्यास भारतीय रामकथेशी अगदी मिळतीजुळतीच! तर या लेखात जाणून घेऊया कंबोडियातील रामकथेचा प्रवास...
Sri Lanka Ramayana हिंद महासागरातील श्रीलंका हे केवळ एक निसर्गरम्य द्वीपराष्ट्र नाही, तर भारतीय संस्कृतीशी घट्ट नाळ जोडलेले महत्त्वपूर्ण पौराणिक स्थळसुद्धा आहे. रामायणात प्रसिद्ध असलेली ही सोन्याची लंका म्हणजेच रावणाचे साम्राज्य होते. श्रीलंकेत आजही रामायणकालीन स्थळे जसे की अशोकवन, केलानिया बिभीषण मंदिर, रामसेतू आणि दिवूरुमवेला अस्तित्वात आहेत. रामायणातील प्रसंग तिथे जिवंत वाटतात. निसर्गसंपन्नता, ऐतिहासिक स्थळे आणि श्रद्धेचा संगम असलेले ही भूमी भारतीयांसाठी केवळ एक पर्यटनस्थळ नसून, एक भावनिक नाते जपणारे पव
Lord Shree Ram रामायण हे केवळ एक महाकाव्य नसून, संपूर्ण दक्षिण आशियाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. नेपाळमध्ये या रामकथेचे विशेष स्थान. नेपाळमधील जनकपूर ही माता सीतेची जन्मभूमी मानली जाते, तर भानुभक्त आचार्यांनी वाल्मिकी रामायणाचे नेपाळी भाषांतर करून ते रामायण नेपाळमधील घराघरांत पोहोचविले. त्यांच्या साहित्यामुळे रामायण केवळ एक धर्मग्रंथ न राहता, नेपाळी जनतेच्या जीवनशैलीचा भाग झाले. नेपाळमधील रामकथेची ही परंपरा भारताशी सांस्कृतिक संबंध दृढ करत असून, रामायणातील मूल्यांचा प्रसार देखील सर्वदू
Ram Navami 2025 तिबेटी पर्वतरांगांमध्ये गुंजणार्या वार्याच्या सुरांत एक वेगळीच रामायणगाथा गुंफलेली आहे. येथे ‘राम’ होतो ‘रामन’, जो शौर्य आणि करुणेचे साक्षात मूर्तिमंत उदाहरण आहे. सीता म्हणजे ‘पृथ्वीची कन्या’, जी नांगरलेल्या भूमीतून प्रकटते, ती प्रतीक आहे निर्मळतेचं. कथेच्या शेवटी धर्माचं तेज तिबेटी हिमालयाच्या शिखरांवर अखंड प्रज्वलित राहतं, अशा एका सनातन, नव्या स्वरांनी झंकारलेल्या या कथेचा घेतलेला मागोवा...
भारताबाहेर मानवनिर्मित भूभागांची बंधने ओलांडून, सार्या नात्यांच्या पलीकडले असे रामायणाचे नाते, समस्त जगभरातील मानवसमूहाशी जुळले आहे. कोण वाल्मिकी, कुठे राहिले, कधी होऊन गेले, याची काहीही उठाठेव न करता सगळ्याच आशियाई देशवासीयांनी, रामकथेचे आकंठ रसपान केले आहे. भारतीय दर्यावर्दी प्रवासी, व्यापारी आणि बौद्घ भिक्षू यांच्याबरोबर, रामायणसुद्घा दक्षिण-पूर्वेकडील देशांत पोहोचले. रामायणातील शाश्वत जीवनमूल्ये आणि कर्तव्यपरायणतेची शिकवण यामुळे भारावून जाऊन, त्यांनी ते काव्य आत्मसात केले आणि आपापल्या भाषेत त्याचा अविष
Ramnavami 2025 रामायणाचे खोतानी स्वरुपखोतान राज्याच्या भूमीत, भारतीय परंपरेतील रामायण एका वेगळ्या रूपात साकारलेले आजही पाहायला मिळते. भाषा वेगळी, परंपरांची वळणं वेगळी, पण कथा तीच; धर्म, सत्य आणि आदर्शाचं तेज जपणारी! वेळ बदलली, ठिकाण बदलले, पण ही कथा आजही लोकांच्या मनांत त्याच श्रद्धेने घर करून आहे. खोतानी रामायण वाचताना, एका वेगळ्या विश्वात पाऊल ठेवल्याचा भास आपल्याला होतो, जिथे परंपरा आणि श्रद्धांच्या अतूट धाग्यांनी विणलेली ही रामायणाची नक्षी नव्या अर्थांनी समोर येते.
Japanese Ramayana रामकथेचे मूळ हिंदुस्थानात असले तरी भारतीय व्यापारी आणि बौद्ध धर्माच्या प्रचार-प्रसारातून रामायण अगदी पूर्वेकडील जपानपर्यंतही पोहोचले. साहजिकच, रामायणाची कथा जपानच्या संस्कृतीरंगात न्हाहून निघाली, वेगळ्या पद्धतीने विकसितही झाली आणि तितकीच लोकप्रियही ठरली. त्यानिमित्ताने जपानी साहित्य, संस्कृती आणि सिनेमासारख्या नवमाध्यमांतही रामायणाच्या पाऊलखुणा दिसून येतात. अशा या जपानी रामायणाच्या संपन्न परंपरेचा सविस्तर आढावा घेणाराहा लेख...
Shree Ram भारत आणि इंडोनेशिया यांचे संबंध केवळ भौगोलिक सीमांपुरते मर्यादित नाहीत, तर ते सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक बंधांनीही घट्ट विणलेले आहेत. निळ्याशार हिंद महासागराच्या लाटांइतक्याच खोल आणि अनंत या दोन्ही देशांच्या परंपरा आहेत. भारतीय संस्कृतीचा सुगंध इंडोनेशियाच्या निसर्गसंपन्न द्वीपसमूहात दरवळतो आणि तेथे रामायणाची गाथा आजही जिवंत आहे. हिंदुस्थानात जन्मलेल्या या महाकाव्याने इंडोनेशियात नवीन अर्थ, नवे रंग स्वरुप धारण केले. स्थानिक लोककला, नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून रामायणाच्या पाऊलखुणा इंडो
आग्नेय आशियाई देशांपैकी रामायणाच्या सर्वाधिक पाऊलखुणा आजही कुठे दृष्टिपथास पडत असतील, तर तो देश म्हणजे थायलंड. तेथील राजांच्या नावापासून ते अगदी मंदिरे, शिल्पकला आणि एकूणच समाजजीवनात रामकथेचा प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो. थायलंडचा राष्ट्रीय ग्रंथच ‘रामाकियन रामायण.’ असे हे थायलंडचे रामायणाशी असलेले ऋणानुबंध उलगडणारा हा लेख...
भारतापलीकडील रामायण असा विचार करताच, नजर आपसूकच आग्नेय आशियाकडे वळते. पण, रामकथेच्या संस्कृतीसंपन्न परंपरेने सातासमुद्रापार अगदी युरोपीय अभ्यासकांना, साहित्यिकांनीही भुरळ घातली. म्हणूनच केवळ फ्रेंच किंवा जर्मनच नव्हे, तर इटालियन, पोलिश, रशियन भाषेतही रामायणाचे अनुवाद प्रसिद्ध झाले आणि ती युरोपीय जनमानसानेही मनस्वी स्वीकारलेले दिसतात. त्यानिमित्ताने युरोपीय जनमनातील रामकथेच्या रामरंगाचा मागोवा घेणारा हा लेख...
Torve Ramayana दक्षिण भारतातल्या कर्नाटक राज्यातील ‘कन्नड’ ही एक सशक्त व समृद्ध भाषा. या भाषेतील वचनसाहित्याचा ठेवा कन्नड भाषेचे वैभव आहे. महात्मा बसवेश्वर, योगिनी अक्कमहादेवी, संत पुरंदास आदी संतांचे कन्नड साहित्यात विशेष योगदान आहे. कर्नाटकमध्ये शैव आणि वैष्णव, अशा दोन्ही भक्तिधारा पूर्वीपासून विद्यमान आहेत. वनवास काळात किष्किंधा अरण्यातील वानराज वाली-सुग्रीव यांच्या राज्यात श्रीरामाचे वास्तव्य होते. किष्किंधा विद्यमान कर्नाटक राज्यातील हम्पी परिसरात आहे. अशा प्रकारे कर्नाटकची भूमी श्रीराम-लक्ष्मणांच्या च
Kamba Ramayana दक्षिण भारतातील तामिळ ही जगातील संस्कृत एवढीच, प्राचीन अभिजात भाषा आहे. या भाषेत अनेक रामकथा लिहिल्या गेल्या आहेत. त्यामध्ये इसवी सनाच्या नवव्या शतकात चोल राज घराण्याच्या राजवटीत, कम्बन् हा थोर महाकवी, चिंतक, तत्त्वज्ञ होऊन गेला. या महाकवीचे रामायण ‘कम्ब रामायण’ तथा ‘रामावतारम्’ म्हणून विश्वविख्यात आहे. जागतिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृती महाकाव्य म्हणून, कम्ब रामायणाचा गौरव केला जातो. ‘कविचक्रवर्ती’ अशा अनेक पदव्याप्राप्त कम्बन् हा राजकवी होता. तामिळ भाषा गौरव, कीर्तिस्तंभ म्हणून, दोन
Ramayana सुदूर पूर्वोत्तर भारतातील आसाममधील राजकवी माधव कंदलीचे रामायण, ‘असामिया’ साहित्यातील पहिले रामायण महाकाव्य आहे. गोस्वामी तुलसीदासांच्या आधी 14व्या शतकात, हा राजकवी होऊन गेला. त्याचे रामायणातील फक्त पाच कांड उपलब्ध आहेत. पुढील काळात, थोर संत शंकरदेव यांनी उरलेली आदिकांड, उत्तरकांड लिहून माधव कंदलांचे रामायण पूर्ण केले आहे.
Jagmohan Ramayana निसर्ग व संस्कृती संपन्न ओडिशा (उत्कल) राज्यातील महाकवी बलरामदास यांनी पुरीच्या मंदिरात, भगवान जगन्नाथासमोर बसून लिहिलेले रामायण म्हणजे ‘जगमोहन रामायण.’ या रामायणाला ‘दंडी रामायण’ म्हणूनही ओळखले जाते. हे रामायण उडिया भाषेतील आदि महाकाव्य असून, ते गोस्वामी तुलसीदासांच्या ‘रामचरितमानस’ आधीच्या काळातील आहे. स्वतःला ‘मत्त कृपासिद्ध बलराम’ म्हणवून घेणारा हा कवी उडियाचा ‘राष्ट्रकवी’ आहे. हे रामायण 1 लाख, 90 हजार ओव्यां(दंडी)चे आहे. त्याविषयी...
बंगाली भाषेतील पहिली कवयित्री म्हणून चंद्रावतीला मान दिला जातो. वंगभूमीमध्ये मध्ययुगात इ. स. १५५० ते १६०० असा तिचा काळ मानला जातो. चंद्रावती ही बन्सीधर भट्टाचार्य या मनसादेवी उपासकाची कन्या, कवित्वाची नैसर्गिक देणगी लाभलेली. तिने अनेक गीतातून रामसीतेची कथा गायलेली आहे. या गीतसंग्रहालाच ‘चंद्रावतीचे रामायण’ ( Chandravatis maukhik ramayan ) म्हणून ओळखले जाते. हे रामायण नसून खर्या अर्थाने ‘सीतायन’ आहे. हे रामायण सीताप्रधान आहे. ते लिखित नसून मौखिक आहे. ही गीते आधी सर्वत्र मौखिक रूपाने लोकप्रिय झाली आणि नंतरच्
दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येच्या भव्यदिव्य राममंदिरातील रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्वार्थाने डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि सर्वार्थाने ऐतिहासिक ठरला. या संस्मरणीय अशा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्ताने अयोध्येसह देशभरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने मुंबईतील लोअर परळ फिनिक्स मॉल येथे ‘रामायण : द लिजेंड ऑफ प्रिन्स राम’ ( 'Ramayana: The Legend of Prince Rama' ) या अॅनिमेशनपटाच्या विशेष चित्रीकरणाचा कार्यक्रमही संपन्न झाला. त्यानिमित्ताने
नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या चित्रपटाची गेल्या अनेक काळापासून चर्चा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत असून दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान, सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने मासांहार सोडल्याच्या चर्चा सध्या सोशल मिडियावर रंगल्या आहेत. यावर आता साई पल्लवीनेच प्रतिक्रिया दिली आहे.
(Srilankan airlines) रामकथेच्या माध्यमातून ‘श्रीलंकन एअरलाईन्स’ केवळ पर्यटकांना आकर्षित करणार नाही, तर भारतीयांच्या मनावरही खोल प्रभाव टाकत आहे. अवघ्या पाच मिनिटांत रामायण ही कथा नसून भारतीय आणि श्रीलंकेच्या इतिहासाचा एक अस्सल दस्तऐवज आहे, ज्याने श्रीलंकेच्या मोहक प्रवासाला प्रेरणा दिली, यावर संपूर्ण जगाचा विश्वास बसला आहे.
आपल्या महाराष्ट्राचे भाग्य एवढे थोर की, आपणास ‘संत, पंत आणि तंत’ असे तीन प्रकारचे कवी लाभलेले. संतकवी, पंडितकवी आणि शाहीर कवी अशा तीन परंपरांपैकी पंडितकवींच्या परंपरेतील कवी मुक्तेश्वर हा सर्वात लोकप्रिय प्रतिभासंपन्न व कलाचतुर असा कवी होता. तो संत एकनाथांचा नातू होता. त्यांचे मराठी व संस्कृत भाषांतर प्रचंड प्रभुत्व होते. तो मराठी भाषाभिमानी म्हणून प्रसिद्ध होता. मुक्तेश्वरांचा एक भारत काव्य पर्वाचा ‘मराठी साहित्यातील कोहिनूर’ गौरव केला जातो. इतिहासाचार्य राजवाडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर सह अनेक थोर मोठ्यां
दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट केजीएफचा अभिनेता यश रामायण चित्रपटात झळकणार आहे. गेले अनेक दिवस रामायण या चित्रपटात कोणते कलाकार कोणत्या भूमिका करणार यावरुन जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, चित्रपटाची टीम किंवा कोणत्याही कलाकाराकडून अधिकृत माहिती मिळाली नव्हती. आता स्वत: यश याने रामायण चित्रपटात तो रावणाची भूमिता साकारणार असल्याचे जाहिर केले आहे.
सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत जुन्या चित्रपटांना पुन्हा प्रदर्शित केले जात आहेत. यात ‘रेहना है तेरे दिल मै’, ‘रॉकस्टार’, अशा अनेक चित्रपटांचा समावेश असून राही अनिल बर्वे दिग्दर्शित ‘तुंबाड’ हा चित्रपटही या यादीत येतो. दरम्यान, लवकरच लोकप्रिय ‘रामायण’ हा अॅनिमेशनपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. लहानमुलांपासून ते वृद्धापर्यंत अशी एकही व्यक्ती क्वचित असेल ज्यांनी हे अॅनिमेटेड रामायण पाहिले नसेल.
संत एकनाथ हे रामाचे बालभक्त होते. संत एकनाथांची साहित्यसंपदा विपुल आहे. त्यामध्ये ‘भावार्थ रामायण’ हा 40 हजार ओव्यांचा मोठा ग्रंथ आहे. पराक्रमी योद्धा श्रीरामाचे वीररसयुक्त दर्शन या ग्रंथातून घडते. मराठी भाषेतील हे पहिले रामायण लिहिण्याचा मान या संत एकनाथांना असून त्यांचा राम हा ‘नित्यविजयी रघुनंदन’ आहे. सलग दोन लेखांत आपण या रघुवीराचे दर्शन घेणार आहोत.
नुकताच रामनवमीच्या निमित्ताने रामनामाच्या उत्सवात संपूर्ण देश न्हाऊन निघाला. रामकथा ही सर्वार्थाने आदर्श. रामायणातील अशाच अनेक आदर्शांचे, संस्कारांचे प्रतिबिंब भारताच्या एकूणच राज्यकारभारात आणि परराष्ट्र धोरणातही उमटलेले दिसते. त्याचाच घेतलेला हा आढावा...
भारतीयांचा श्वास असणार्या प्रभू रामचंद्रांविषयी प्रत्येकाच्या मनात एक भक्तीची तसेच आपले पणाची भावना आहे. रामरायाची जीवनगाथा प्रत्येकाला स्वत:च्या जीवनाशी सुसंगत वाटते. आणि म्हणूनच प्रत्येक जण रामरायांना जाणून घेण्याचा आणि अधिकाधिक त्यांच्या जवळ जात राममय होण्याचा प्रयत्न विविध मार्गांनी करत असतो. आणि असा प्रयत्न देशाबरोबर विदेशातले रामभक्त देखील करतात.. अशा भक्तांबद्दल आणि त्यांच्या रामभक्तीबद्दल या लेखात जाणून घेऊया!
भारताची वैज्ञानिक प्रगती हा भारतात तसेच जगातदेखील कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. अनेकांना रामायण आणि महाभारत हा इतिहास तर काहींना तो फक्त एक साहित्याचा प्रकार वाटतो. पण, या मंथनातून कायमच सकारात्मक बाबी पुढे येत आहेत. पण, वाल्मिकी महर्षी यांनी लिहिलेले रामायण हा आपला प्राचीन इतिहास आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. संपूर्ण रामायणात विविध घटना घडताना दिसतात. त्याचा सखोल अभ्यास केला असता, त्या काळात भारताची प्रत्येक क्षेत्रात असलेली प्रगती पाहून मन थक्क होते. रामायणातील अनेक प्रसंगांत आपल्याला रामकथेबरोबरच अनेक वै
रामायण आणि महाभारत या महान ऐतिहासिक ग्रंथांचे भारतीय समाजाशी अतूट नाते आहे. महर्षी वाल्मिकी आणि महर्षी व्यास यांच्या या ग्रंथांनी भारतीय जीवनात हजारो वर्षे आदर्श निर्माण केले आहेत. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाने भारतीयांचे जीवन व्यापून टाकले आहे. या दोन्ही ग्रंथांमध्ये खगोलशास्त्रीय घटनांचे जे दाखले दिले गेले आहेत, ते आश्चर्यकारकच आहेत. अनेक संशोधकांना या खगोलशास्त्रीय दाखल्यांनी भुरळ पाडली आहे. घटनांचा काळ ठरविताना, संशोधकांना खगोलशास्त्रीय संदर्भ उपयोगी पडले आहेत. आज आपण वाल्मिकी रा
आयुर्वेदाची उत्पत्ती ही अथर्ववेदापासून झाली असल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद असे देखील म्हटले आहे. थोडक्यात अनादी काळापासून आयर्वेुदाची परंपरा ही सार्वत्रिक सुरू असल्याचे विविध संदर्भ, आपल्याला प्राचीन वाङ्मयामध्ये दिसतात. रामायणदेखील त्याला अपवाद नव्हे. या लेखात जाणून घेऊया रामायणात दिसणार्या आयुर्वेदाशी निगडीत घटनांबद्दल..!
महाराष्ट्राची भूमी आणि संस्कृतीच्या प्रेमातून-स्वाभिमानातून प्रसवलेले श्लोकबद्ध महाकाव्य म्हणजे डॉ. आनंद साधले यांचे ‘महाराष्ट्र रामायण’ होय. रामाला पिता, सीतेला माता आणि हनुमानाला महाराष्ट्राचा निर्माता मानणार्या डॉ. साधलेंचे हे रामायण भक्ती-प्रासादिकतेऐवजी शृंगार, करुण आणि वीर रसाला प्राधान्य देणारे आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची विवेचक प्रस्तावना या काव्यास लाभली असून शृंगाराच्या अतिरेकाचा त्यांनी स्पष्टपणे निर्देश केलेला आहे. आधुनिक पाश्चात्य ऐहिक दृष्टिकोनातून लिहिलेले हे रामायण काव्य-कल्पन
भारतीय वाङ्मयामध्ये वाल्मिकी ऋषींना ‘आदिकवी, महाकवी’ म्हणून अग्रपूजेचा मान असून, ‘वाल्मिकी रामायण’ काव्याचा ‘आदिकाव्य ग्रंथ’ म्हणून गौरव केला जातो. वाल्मिकी ऋषी कोण होते? अनेक जण त्यांना लुटारू-वाटमार्या मानतात. पण, प्रत्यक्ष वाल्मिकी ऋषी स्वतःबद्दल काय म्हणतात, हे महत्त्वाचे आहे. रामायणात एके ठिकाणी स्वतःचा परिचय देताना, ‘मी प्रचेतस मुनींचा दहावा पुत्र आहे’ असे ते म्हणतात. ‘रामायण’ मूळातून वाचल्यावर, आपणास वाल्मिकी ऋषींची खरी ओळख होते. ते विद्वान पंडित व कांंतदर्शी थोर कवी होेते. महान तपस्वी होते. त्यांच्
काही दिवसांपूर्वीच पुण्याच्या ललित कला केंद्रात रामायण विडंबन नाट्याचा अत्यंत अश्लाघ्य प्रकार घडला. त्यानंतर पुन्हा एकदा विद्यापीठे ही नेमकी शिक्षणाचे माहेरघर की विद्रोहाचे अड्डे, असा प्रश्न उपस्थित झाला. वर्षभरापूर्वी ‘आयआयटी मुंबई’त दर्शन सोळंकीच्या आत्महत्येच्या घटनेने विद्यापीठ प्रशासनाचा ‘हिंदूफोबिया’ असाच चव्हाट्यावर आला होता. तेव्हा, या घटनेतील तथ्य, तपास, कारवाई आणि न्यायाची प्रतीक्षा यांचा आढावा घेणारा हा लेख...
कर्नाटकातील मंगळुरू येथील ख्रिश्चन मिशनरी शाळेत जाणाऱ्या हिंदू मुलांवर सर्व प्रकारची बंधने लादण्यात आली होती. असा आरोप करण्यात आला आहे. त्यासोबतच, एका शिक्षकाने पंतप्रधान मोदींविरोधातील अपप्रचाराच्या गोष्टी सातवीच्या विद्यार्थ्यांना सांगितल्या. या शिक्षकाने विपर्यास करून 'गोध्रा घटना' आणि 'बिल्कीस बानो प्रकरण' यासारखे संवेदनशील मुद्दे मुलांसमोर मांडले, त्यामुळे मुलांमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात द्वेष भरला.
"भारतीय मुस्लिम हे अरब नाहीत, तर ते या देशातील मूळ रहिवासी आहेत ज्यांनी धर्मांतर केले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पूर्वजांचा वारसा विसरता कामा नये. भारतीय मुस्लिमांनी उपासनेची पद्धत बदलली आहे, परंतु ते त्यांच्या पूर्वजांचा वारसा बदलू शकत नाहीत." असे विधान उत्तराखंड मदरसा बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी केले आहे.
एखाद्या निवडलेल्या विषयाचा बहुपैलू वेध घेणारे आणि अनेक आयामांतून त्या विषयाचा एक एक पदर अलगद उलगडून सांगणारे लेखक आणि नाटककार म्हणजे अभिराम भडकमकर. त्यांच्या ’सीता’ या नव्या कोर्या कादंबरीचे नुकतेच प्रकाशन झाले. तसेच उद्या, दि. 22 जानेवारी रोजी रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळाही अयोध्येत मोठ्या उत्साहात संपन्न होईल.त्या पार्श्वभूमीवर रामराज्यातील सीतेचे भावविश्व आणि तिची निर्णयक्षमता व भूमिका घेण्याची वृत्ती, यावर ही कादंबरी प्रकाश टाकते. तेव्हा या कादंबरीविषयी, एकूणच सीतेच्या व्यक्तिरेखेविषयी अभिराम भडकमकर य
गा कोणता राम खरा आणि वाल्मिकी रामायणच का खरे? मी विचारतोय मी. चालू गेमाडे! काय म्हणता, मी कोण? माझ्या बोलण्याला कुत्राही भीक घालणार नाही? हे बघा असं करू नका, माझ्या मिशांकडे तरी बघा. चारचौघात उठून दिसाव्यात, म्हणून त्या मी ठेवल्यात. त्याचा तरी मान राखा. पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून बरोबर मी जातीयतेच्या कळपात शिरतो. जाणता राजा, साहेब साहेब म्हणत त्यांची हांजी हांजी करत हजेरी लावतो.
राम हा समस्त भारतीयांचा आदर्श. या रामाच्या भक्ती आणि प्रेमातून गदिमा आणि बाबूजी या द्वयीने ‘गीतरामायण’ साकारले. ते अजरामर झाले. हेच ‘गीतरामायण’ म्हणजे महाराष्ट्राचं वैभव. त्याचा छंद-वृत्तासहित हिंदीत अनुवाद करण्याचे कौशल्यपूर्ण काम गोव्याच्या दत्तप्रसाद जोग यांनी केले आहे. आगामी राममंदिर लोकार्पणाच्या औचित्याने त्यांच्याशी साधलेला हा संवाद...
‘रामायण’ हे रम्य महाकाव्य असले, तरी तो भारताचा इतिहास आहे आणि वाल्मिकींनी इतिहास म्हणूनच धर्मज्ञ, कृतज्ञ, पराक्रमी राजाचे चरित्र, ‘रामायण’ लिहिले. स्वयं वाल्मिकींनीही ‘इतिहास लिहितो’ असे अनेकवार म्हटलेले आहे. यादृष्टीने अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर साकारलेले भव्यदिव्य मंदिर हे राष्ट्रपुरुषाचे राष्ट्रमंदिर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दि. २२ जानेवारी रोजी होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा, नव्या भारताच्या स्वाभिमान युगाचा श्रीगणेशा आहे.
भारतीय संस्कृती, धर्म आणि अध्यात्माची पताका जगभर फडकविणारे स्वामी विवेकानंद यांनी अत्यंत तरूण वयात सर्व वेद, उपनिषदे, महाकाव्ये, भगवद्गीता यांचा अभ्यास केला. स्वामीजींनी भारतीय संस्कृतीच्या आदर्शाचा विमर्श तयार करून, पाश्चात्य देशांत सर्वत्र नेला. 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती त्यानिमित्त त्यांच्या विचारांचे हे ज्ञानमोती.
अयोध्या, रामायण, रामभक्ती आणि महाराष्ट्र यांचा संबध कैक शतकांचा आहे. किमान १५०० वर्ष महाराष्ट्रात रामकथा सांगितली जात आहे. मध्यंतरीच्या काळातील साहित्याचे धागेदोरे फारसे उपलब्ध नसले तरी संत नामदेवांपासून रामभक्तीच्या रचना मराठी भाषेत आढळतात. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या सर्वांना आकार देणाऱ्या मराठी संतानी अयोध्येचा महिमा वेळोवेळी वर्णन केला आहे. इ.स.च्या तेराव्या शतकाच्या अखेरीस तीर्थयात्रेच्या निमित्ताने भारतभ्रमण करणारे संत ज्ञानेश्वर (इ.स. १२७५ ते १२९६) व संत नामदेव (इ.स.१२७० ते १३५०) हे मराठीतले
रामायण-महाभारत या दोन महान आर्ष महाकाव्यांचा समावेश इतिहासाच्या अभ्यासक्रमात करावा, अशी शिफारस नुकतीच ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या (एनसीईआरटी) समितीने केली. जीवनमूल्ये, नैतिकतेचे महत्त्व देणारे हे ग्रंथ. धर्म आणि कर्म यांचे महत्त्व अधोरेखित करणारी ही महाकाव्ये न्याय तसेच शांततेची शिकवणही देतात. एक आदर्श नागरिक म्हणून विद्यार्थ्यांना घडवण्यात, त्यांची मोलाची भूमिका असेल, म्हणून ही शिफारस महत्त्वाची ठरावी.
दि. २६ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील रोहिणी परिसरातील जापनीज पार्क येथे वाल्मिकी मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कर्मसिंग कर्माजी यांच्या संघटनेने हा मेळा आयोजित केला होता. नवरात्रीचे नऊ दिवस आणि रावण दहन झाल्यानंतर पुढे चार दिवस असा त्याचा कालावधी होता. या मेळ्यात मी सहभागी व्हावे, असा दिल्लीचे संघ कार्यकर्ते रितेश अग्रवाल यांनी आग्रह केला. अगोदर मी त्यांना ‘नाही’ म्हटले. कारण, एका छोट्या भाषणासाठी एवढ्या लांबचा प्रवास करण्यासाठी मन आणि शरीर तयार होत नाही. मग अमोल पेडणेकर यांनी खूप आग्रह केला. ‘विवेक’साठी जाणं क
सुख निवास वृद्धाश्रमातील ७२ वर्षांच्या सुमनताई साळगट यांची. सोमवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांचा कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा...
गुजरातमधील वडोदरा येथे रामायणाला 'बनावट' संबोधून भगवान हनुमानाच्या मूर्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याची घटना समोर आली आहे. शाळेतील एक विद्यार्थी हनुमानजींच्या दर्शनासाठी गेला होता, त्यामुळे तो शाळेत येऊ शकला नाही. यावर शाळेतील शिक्षकाने रामायण आणि हनुमानाबद्दल अपमानास्पद गोष्टी बोलल्या. हिंदू संघटनांनी याचा निषेध करत आरोपी शिक्षकावर कारवाईची मागणी केली आहे.
विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी ही अविश्वास ठरावावर आपलं मत मांडल. संसद सदस्यत्व बहाल झाल्यानंतर राहुल गांधींच हे पहिलेच भाषण होते. या भाषणात त्यांनी रामायणाविषयी काही आक्षेपार्ह विधान केली.
'गदर' हा चित्रपट २००१ साली आला आणि त्याने प्रेक्षकांची मने कायमस्वरुपासाठी जिंकून एक नवा विक्रम केला. तब्बल २३ वर्षांनी 'गदर' चित्रपटाचा दुसरा भाग 'गदर २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांच्या या चित्रपटाचा दबदबा कायम आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याची चर्चा आणखीनच वाढली आहे. दरम्यान 'गदर २'चा 'रामायण' आणि 'महाभारत'शीही संबंध असल्याचे समोर आले आहे. याचा खुलासा खुद्द चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केला आहे.
‘भारतीय विरागिनी’ हे अरुणाताई ढेरे यांनी लिहिलेले आणि ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’ने प्रकाशित केलेले, भारताचा गौरवास्पद, आध्यात्मिक वारसा सांगणारे अमूल्य असे पुस्तक. पुरुष संतांच्या बरोबरीने भारतात अनेक वैरागी स्त्रिया पण संत झाल्या. परंतु, स्त्री संतांची चरित्रे फारशी लिहिली गेली नाहीत. त्यांच्या संप्रदायांनीसुद्धा त्यांच्या नोंदी ठेवण्याकडे विशेष लक्ष दिले नाही, ही खंत अरुणाताई मांडतात. ती कमतरता भरून काढण्यात, हे पुस्तक मदत करणारे ठरेल यात शंका नाही.
बुद्धिवंत हनुमानाने सुचवले की, रामाचे सामर्थ्य अफाट असल्याने त्याच्या नामाचे दगड बुडणार नाहीत. या रामनामाच्या दगडांनी अल्पावधीत सेतू बांधणे शक्य झाले. म्हणून समर्थ म्हणतात की, रामनामाने पाषाण तरले. भगवंताच्या नामाने निश्चितपणे (नेमस्त) पाषाणांना तारले. तसेच अनेक देहधारी पाषाणांना रामनामाने तारले आहे.
पुणे : “प्रतिकार-प्रबोधन-आचरण आणि संशोधन ही धर्म रक्षणाची चतु:सूत्री आहे. धर्म जाणून घेत कालसुसंगतरीतीने लोकांसमोर मांडणे आवश्यक आहे. शाश्वत धर्माचे काल सुसंगत आचरण लोकांना सांगावे लागते आणि आचरणामधून ते शिकवावेदेखील लागते. कालौघात विस्मरणात गेलेले ज्ञान आणि धर्म पुन्हा संशोधित करून लोकांसमोर मांडावा लागतो. समाजात एकसूत्रता आणण्यासाठी समर्थ रामदासांनी कालानुरूप रचना केली. समाज जागृतीमधूनच विध्वंसकारी शक्तीला प्रतिकार सुरू झाला. प्रभू रामचंद्रानंतर समर्थांनी शिवाजी महाराजांचा समाजासमोर आदर्श ठेवला. छत्रपती श
धुळे येथील श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर यांच्यातर्फे श्री समर्थ रामदास स्वामी लिखित वाल्मिकी रामायणाच्या संपादित आवृत्तीच्या आठ खंडांचा प्रकाशन सोहळा आज, बुधवार, दि. ५ जुलै रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता संपन्न होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते या ग्रंथांचे राष्ट्रार्पण होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फुलगाव येथील श्रृतिसागर आश्रमाचे स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांतस