
योगसाधना केल्यावर जे अतींद्रिय अनुभव येतात, त्या दिव्य अनुभवांचे सूत्रमय वर्णन म्हणजे वेद होय. ‘विद्’ म्हणजे जाणणे व वेद म्हणजे जाणलेले ज्ञान असा त्याचा अर्थ आहे. वेदांत मृत्यूनंतरच्या दिव्य प्रवासाचे वर्णन पुष्कळ ठिकाणी आले आहे. दिव्य साधना करणार्यांना वेदांत वर्णन केल्याप्रमाणे सर्व अनुभव येतात. वेदांतील पुढील ऋचा पाहा -
य ई चकार न सो अस्य वेद य इ ददर्श हिरुगिन्नु तस्मात्|
स मातुर्योना परिवीतो अन्तर्बहुप्रजा निरृतिमा विवेश॥ (ऋग्वेद १|१६४|३२)मातृगर्भाच्या आवरणात बद्ध पडलेला जीव अज्ञानवश अनेक जन्म धारण करतो. हा अजन्मा असूनही अज्ञानामुळे सदा स्खलनशील बनून, बहुप्रजा म्हणजे अनेक जन्म धारण करतो व विवश होऊन या घोर कर्मजालात पडूनसुद्धा तो काय करतो, याचे त्याला भान राहात नाही. तो जे पाहतो, तेसुद्धा त्याच्यापासून लपलेले असते. त्यामुळे तो सदा अज्ञानात राहतो. (य इ द दर्श हिरुगिन्नु तस्मात्) सर्वज्ञ आणि उदात्त अशा आत्म्याचे हे अधःपतन कसे आहे, ते पाहा. जीवात्म्याला जाण आल्यावर जीवात्मा प्रार्थना करतो,
न विजानामि यदि वेदमस्मि निण्यः सन्नद्धी मनसा चरामि|
यदा मागन् प्रथमजा ऋतया दिद वाचो अश्नुवे भागमस्याः॥मी कोण आहे, हे मी जीवात्मा जाणत नाही. संस्काररुप मना सन्निद्ध झाल्यामुळे मी अनेक योनींतून सदा फिरत असतो. माझ्या शुभ इच्छेचा सुयोग्य परिणाम (भागम अस्याः) व्हावा, म्हणून मला ‘प्रथमज’ म्हणजे मूल अशा ऋताची अवस्था प्राप्त करून द्या. तेव्हाच मी स्वतःला समजू शकेन (यदि वेदम् अस्मि निण्यः|) यात मनाची प्रकृती सांगितली आहे. मन म्हणजे अन्य काही नसून, संस्कारांची एकप्रकारची मूस आहे. सतत झालेले संस्कार ज्यावेळेस ग्रहण व्हायला लागतात, त्यावेळेस मन नावाच्या अवस्थेला सुरुवात होते. वरील संस्कार ज्यावेळी स्थिरत्व पावतात, त्यावेळी मनाची घडण पक्की होते. अशा तर्हेने मनावर अनेक संस्कार ग्रहणामुळे पक्के होऊन मन विस्तार पावते, मनाची क्षमता वाढते किंवा घटते. जसे संस्कार तसे मन. मन नावाचे स्वतंत्र इंद्रिय नाही. असल्या संस्काररुप मनामुळे, मूलतः मुक्त असा जीवात्मा संस्कारामुळे बद्ध होऊन गतकर्मानुसार पुनः पुनः जन्म घेतो. मनाच्या बद्ध अवस्थेतून मुक्त होण्याकरिता, जीवात्मा त्याच्या मूल अवस्थेकडे जाणे आवश्यक असते. ती मूळ अवस्था म्हणजे आत्मा होय. वरील श्लोकात जीवात्मा, मूळ अशा आत्मस्वरुपात नेण्याची प्रार्थना करतो.
शेवटी जीव आपल्या कर्मानुसार कोणकोणती गती प्राप्त करतो, याबाबत वेद सांगतात,
द्वे सृति अश्रृणवं पितृणाम् अहं देवानाम् उत मर्त्यानाम्|
ताभाम् इदं विश्वं एजत् सम एति यदंतरा पितरं मातरंच॥ (ऋग्वेद १०|८८|१५; यजु. १९४७)मर्त्य जीव आपल्या कर्मानुसार दोन मार्गांनी जातो. एक आहे पितृयान, तर दुसरा आहे देवयान. विश्वाला स्पंदित करणारा देवयान मार्ग आहे, तर काही काळ थोड्या उच्च अशा कर्मप्रक्रियेच्या अवस्थांतरात घोटाळून, पुन्हा पृथ्वीतत्त्वात लिप्त होणारा मार्ग पितृयान आहे. एक परम दीप्तिमान, तर दुसरा अंधकारमय वा धूम्रमार्ग आहे. यालाच गीतेत उत्तरायण व दक्षिणायन म्हटले आहे. भौगोलिक उत्तरायण व दक्षिणायन नसून, ते साधकाचे परिपक्व उत्तर अवस्थेचे द्योतक आहे. साधनेची प्रथम अप्रगत अवस्था म्हणजे दक्षिणायन आहे, तर उत्तर प्रगत अवस्था म्हणजे उत्तरायण होय. भीष्मांचे उत्तरायणात देह ठेवणे म्हणजे साधकाच्या दृढ चित्ताची (भीष्म) ही उत्तर अवस्था होय. या उच्च संस्कारमय अवस्थेला देवयान मार्ग वा उत्तरायण म्हणतात. या अवस्थेत असणार्या साधकाला देवमार्गाचे व्रत धरणारा निश्चल वृत्तीचा ‘देवव्रत’ असे म्हणतात. म्हणून भीष्माला देवव्रत म्हणत असत. असल्या उच्च अवस्थेतील साधक देहत्याग करीत असताना त्याला परम गती मिळणारच. म्हणून भीष्म उत्तरायणात मरण पावले, असे महाभारतात वर्णन आहे.
वेदातील वरील ऋचेचे कथारूप म्हणजे महाभारतातील भीष्माचार्यांचे उत्तरायणातील मरण होय. मध्यंतरीच्या आत्मविस्मृतीच्या काळात दिव्य योगानुभूतींचे ज्ञान नसल्यामुळे, भीष्मांनी आपला प्राण सूर्यगतीवर अवलंबून असलेल्या भौगोलिक उत्तरायणात सोडला, असा चुकीचा अर्थ काढला गेला. वरील ऋग्वेद ऋचा १|१६४|३२ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे सर्वज्ञ अश उदात्त आत्म्याचे हे कसे अधःपतन आहे, असे म्हटल्यावाचून राहवत नाही. याच वैदिक ऋचेला धरून गीतेतील आठव्या अध्यायात उत्तरायण दक्षिणायन याचे वर्णन आले आहे, ते साधकाच्या उत्तर व दक्षिण अवस्थेला धरून होय. त्यात भौगोलिक उत्तरायण, दक्षिणायन शोधणे व्यर्थ होय. गीता सांगते,
अग्निर्ज्योतिरहः शुलः षण्मासा उत्तरायणम्|
तत्र प्रयाता गच्छंति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः॥२४॥
धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम्॥
तत्र चांद्रमसं(चंद्रमसं) ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते॥२५॥
शुलकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते|
एकया यात्यनावृत्तिमन्ययाऽऽवर्तते पुनः॥२६॥अ.८॥
मागील अध्यायात सर्व विश्वघटनाकरिता सव्य वा प्रदक्षिण गती, तर मुक्तीकरिता अपसव्य गती आवश्यक असल्याचे आपण पाहिले आहे. बंधनात घालणारी प्रदक्षिण गती धूम्ररात्री तथा कृष्णरुप षण्मास दक्षिणायण होय, तर अग्निः ज्योतिः शुलगती षण्मास उत्तरायण होय. आपण सारेच देहभावाला म्हणजे मायारुप बंधनाला सोकावलो असल्याने, सव्य वा प्रदक्षिण गती आपल्याला सुदर्शन वाटते हा भाग वेगळा. पण मुक्तीची गती अपसव्य असून ज्ञानाकडे नेणारी आणि अंततोगत्वा मुक्ती देणारी गती असते, हे गीतेच्या वरील श्लोकात स्पष्ट सांगितले आहे.
शुल कृष्णेगती ह्येते जगतः शाश्वते मते|
एकया यात्यनावृत्तिमन्ययाऽऽवर्तते पुनः॥२६॥म्हणजे अपसव्य मृत्युरुप शुल गतीमुळे जग मुळाकडे जाते व पुन्हा बंधनात पडत नाही, तर सव्य मायारुप कृष्णगतीमुळे सर्व जगच पुन्हा जन्म-मृत्यूच्या फेर्यात सापडते. वेदांकडे या दिव्य ज्ञानप्राप्तीच्या दृष्टीने पाहिल्यास त्यातून बरेच गहन ज्ञान जगासमोर येईल, अशी लेखकाला स्वानुभवाने खात्री आहे. मरून पुनः जिवंत झाल्याचे प्रत्यक्ष अनुभव अनेकांना असतील, पण त्याचे व्यवस्थित संकलन करून जगासमोर मांडण्याचे काम भारतात अद्याप सुरू झालेले नाही. पाश्चात्य देशांत असल्या प्रकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचे एक फल म्हणजे मूडी यांचे ‘ङळषश रषींशी ङळषश’ हे पुस्तक होय!