राज्यात ५ हजार कोटींची थेट परकीय गुंतवणूक! २७ हजार रोजगाराच्या संधी मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार

    15-May-2025
Total Views | 12

MOU 
 
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, १४ मे रोजी महाराष्ट्र शासन आणि ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे राज्यात ५ हजार कोटींची थेट परकीय गुंतवणूक होणार असून त्यातून २७ हजार रोजगाराच्या संधी मिळणार आहे.
 
उद्योग सचिव डॉ. पी. अन्बळगन आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सचे अध्यक्ष आर. के. नारायणन यांच्या स्वाक्षरीत सह्याद्री अतिथीगृह येथे हा करार करण्यात आला. यावेळी उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कटकमिशनवाल्या गिधाडांच्या घिरट्या! मंत्री आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
 
"ही परिवर्तनात्मक भागीदारी नागपूर, मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणी जागतिक दर्जाचे, पर्यावरण, सामाजिक आणि शासकीय अनुकूल असे औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स हब्स तयार करण्याच्या दिशेने पाऊल टाकणारी आहे. भारतातील उत्पादन, वेअरहाउसिंग आणि पुरवठा साखळी उत्कृष्टतेसाठी एक सशक्त पायाभूत रचना ही परिवर्तनत्मक भागीदारी निर्माण करेल," असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
 
राज्यातील प्रमुख औद्योगिक आणि मल्टिमोडल लॉजिस्टिक क्षेत्रांमध्ये आधुनिक लॉजिस्टिक्स आणि इंडस्ट्रियल पार्क्सच्या विकासासाठी हा करार होणार असून या करारानुसार महाराष्ट्रात १० हून अधिक आधुनिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स पार्क्स उभारले जाणार आहेत. यासाठी ७९४.२ एकर जमीनीचे क्षेत्रफळ आहे. यापैकी १.८५ कोटी चौ. फूट जमिनीवर बांधकाम करण्यात येईल. या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून एकूण थेट परकीय गुंतवणूक ही ५ हजार १२७ कोटी रुपये आहे. या करारामुळे थेट आणि अप्रत्यक्ष अशा एकूण २७ हजार ५१० रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे.
 
लॉजिस्टिक्स पार्क्स कुठे असणार?
 
हे लॉजिस्टिक्स पार्क्स नागपूर, भिवंडी, चाकण, सिन्नर, पनवेल यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी विकसित केले जाणार आहेत. हे प्रकल्प पर्यावरणस्नेही, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरयुक्त आणि रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देणारे असून महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण २०२४ शी सुसंगत असेल.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार कसे सुरू आहे मिशन खड्डेमुक्त मुंबई?

महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार कसे सुरू आहे मिशन खड्डेमुक्त मुंबई?

बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरातील २२७ वार्डांमध्ये एकेक “ डेप्युटी अभियंता” नियोजित करून नविन उपक्रम राबविला आहे. प्रत्येक अभियंता त्याच्या वार्डात १० ते १५ किमीचा रस्ता रात्री-रोज तपासतो. दर दोन दिवसांनी दुचाकीवरून किंवा पायी जाउन रस्ता तपासला जातो. यामुळे खड्यांची वेळेवर ओळख होईल आणि त्वरित भरपाई केली जाईल . पहिली सभा महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी रोड्स आणि ट्रान्सपोर्ट विभागाशी ९ जून रोजी घेतली. यात त्यांनी निर्देश दिले खड्डे ६ ते १२ इंच रुंद असताना भरली पाहिजेत. मोठे खड्डे कामात ..

मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

“भारताचे भांडवली बाजारमुल्य सहापटींनी वाढून ११ वर्षांत ७४ लाख कोटी रुपये इतके झाले. भारतावर मोदी सरकारच्या काळात अधिक दृढ झालेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले.”, असे वक्तव्य एनएससीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टीकोनातून भांडवली बाजाराची भूमिका अधोरेखित व्हावी या उद्देशाने विकसित भारताचा मार्ग आणि भांडवली बाजाराचे योगदान या विषयावर दि. ९ जून रोजी नवी दिल्ली येथे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तेव्हा ते ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121