मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरातील २२७ वार्डांमध्ये एकेक “ डेप्युटी अभियंता” नियोजित करून नविन उपक्रम राबविला आहे. प्रत्येक अभियंता त्याच्या वार्डात १० ते १५ किमीचा रस्ता रात्री-रोज तपासतो. दर दोन दिवसांनी दुचाकीवरून किंवा पायी जाउन रस्ता तपासला जातो. यामुळे खड्यांची वेळेवर ओळख होईल आणि त्वरित भरपाई केली जाईल .
पहिली सभा महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी रोड्स आणि ट्रान्सपोर्ट विभागाशी ९ जून रोजी घेतली. यात त्यांनी निर्देश दिले खड्डे ६ ते १२ इंच रुंद असताना भरली पाहिजेत. मोठे खड्डे कामात अडचण निर्माण करण्याची शक्यता आहे.
अनेक ठिकाणी रस्त्यांचे काम करताना सामान्या नागरिकांना त्रास होतो. हा त्रास टाळण्यासाठी रस्त्यांची जास्तीत जास्त कामे शनिवार-रविवारमध्ये करण्यात येतील. उरलेल्या दिवसात काम सुरु राहणार आहेत.
खड्डे भरताना घ्यायची खबरदारी१) खड्डे चौकोनी स्वरुपात भरावे.
२) ६ मीटरपेक्षा जास्त जाड असलेल्या रस्त्यांवर cold mix वापरु नये. त्याजागी mastic asphalt किंवा Geo polymer concreate यांचा वापर करावा. बीएमसीने हया वर्षीसाठी एकूण १५४ करोड रुपये फक्त खड्डे बुझवण्याच्या कामासाठी बाजूला काढून ठेवले आहेत. माहितीनूसार गेल्या ३ वर्षात खड्यांची संख्या कमी झाली आहे. ह्या वर्षाच्या रक्कमेमधून बाकीच्या भागातील खड्डे बुझवणे हे बीएमसीचे लक्ष आहे.
माय बीएमसी ’पॉटहोल फिक्स ’ अॅप किंवा WhatsApp नंबरद्वारे नागरिकांना खड्डे नोंदवण्याची सुविधा आहे. इथे तक्रार आल्यानंतर २४ तासातच खड्डा भरून टाकलं जाईल, कोणत्याही भागातील नागरिकांना गैरसोय होणार नाही ह्याची संपूर्ण खबरदारी घेतली जाईल. काँक्रीटच्या रस्त्यांचा विस्तार सुरु आहे. त्यामुळे खड्यांची संख्या कमी झाली आहे. हे सगळं लक्षात घेऊन, बीएमसीचे मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आहे:
१. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्ते तयार करणे.
२. खड्यांची वेळेत भरपाई.
३. दिवसातून वार्ड अभियंत्यांची सक्रिय कामगिरी.
४. जाड रस्त्यांवर टिकाऊ साहित्याचा वापर.
या सर्व उपाययोजनांमुळे मुंबईत पावसाळा सुरू झाल्यावर नागरिकांची गडबड होऊ नये, रस्ते सुरक्षित असावेत आणि वाहतूक सुरळीत व्हावी हे बीएमसी चे धोरण आहे.