विठ्ठल-रुक्मिणी गाभारा संवर्धन कामासंदर्भात महत्त्वाची अपडेट

    06-May-2024
Total Views |

Vitthal Rukmini Pandharpur
(Vitthal-Rukmini)

मुंबई (प्रतिनिधी) :
पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी (Vitthal-Rukmini) मंदिर संवर्धन व जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरु आहे. यात दोन्ही ठिकाणच्या गाभाऱ्याच्या संवर्धनाचे काम १५ मार्च पासून सुरु करण्यात आले होते. ४५ दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र कामादरम्यान नव्याने दुरुस्ती कराव्या लागणाऱ्या कामांचीही भर पडल्याने उर्वरीत काम मे अखेरीस पूर्ण होणार असल्याची माहिती मंदिर समितीने दिली.

हे वाचलंत का? : हर हर महादेवाच्या जयघोषात बाबा केदारनाथच्या पंचमुखी विग्रह मूर्तीचे प्रस्थान

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धाराच्या कामासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये गाभारा संवर्धन कामाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी मंदिर समिती सदस्यांसह पुरातत्व विभागाचे अधिकारी, काही वास्तुविशारद, अतुलशास्त्री भगरे गुरुजी आदि मंडळी उपस्थित होती. महिनाअखेरीस काम पूर्ण करून भाविकांना विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन पूर्ववत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार कसे सुरू आहे मिशन खड्डेमुक्त मुंबई?

महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार कसे सुरू आहे मिशन खड्डेमुक्त मुंबई?

बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरातील २२७ वार्डांमध्ये एकेक “ डेप्युटी अभियंता” नियोजित करून नविन उपक्रम राबविला आहे. प्रत्येक अभियंता त्याच्या वार्डात १० ते १५ किमीचा रस्ता रात्री-रोज तपासतो. दर दोन दिवसांनी दुचाकीवरून किंवा पायी जाउन रस्ता तपासला जातो. यामुळे खड्यांची वेळेवर ओळख होईल आणि त्वरित भरपाई केली जाईल . पहिली सभा महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी रोड्स आणि ट्रान्सपोर्ट विभागाशी ९ जून रोजी घेतली. यात त्यांनी निर्देश दिले खड्डे ६ ते १२ इंच रुंद असताना भरली पाहिजेत. मोठे खड्डे कामात ..

मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

“भारताचे भांडवली बाजारमुल्य सहापटींनी वाढून ११ वर्षांत ७४ लाख कोटी रुपये इतके झाले. भारतावर मोदी सरकारच्या काळात अधिक दृढ झालेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले.”, असे वक्तव्य एनएससीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टीकोनातून भांडवली बाजाराची भूमिका अधोरेखित व्हावी या उद्देशाने विकसित भारताचा मार्ग आणि भांडवली बाजाराचे योगदान या विषयावर दि. ९ जून रोजी नवी दिल्ली येथे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तेव्हा ते ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121