झारखंडमधील मॉब लिंचिंग प्रकरणी टिकटॉककडून तीन यूजर्सवर बॅन

    10-Jul-2019
Total Views | 29



काही
दिवसांपूर्वी टिक टॉक हे ऍप एक वादग्रस्त विषय बनला होता. त्यानंतर पुन्हा एकदा ते एका चर्चेचा विषय बनला आहे याचे कारण म्हणजे झारखंडमध्ये झालेल्या तबरेझ अन्सारी या मुस्लिम तरुणाच्या आंदोलनाचा व्हिडीओ. या टिक टॉकवर वायरल झालेल्या व्हिडीओमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी टिक टॉक वर आक्षेप घेतला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी टिक टॉक ने या घटनेला कारणीभूत असलेल्या यूजर्सना बॅन केले आहे.



शिवसेनेचे कार्यकर्ते रमेश सोळंकी यांनी टिकटॉकवर असलेल्या 'टीम ०७' नावाच्या एका ग्रुपविरुद्ध पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. या ग्रुपमध्ये कोटी लोकांचा सहभाग होता आणि या ग्रुपचा वापर अशांतता आणि द्वेष पसरवण्यास केला जात होता हे पोलिसांना समजले. त्यानंतर टिकटॉकवर ही कारवाई करण्यात आली.


दरम्यान टिकटॉकने दिलेल्या माहितीनुसार टिकटॉकवर अपलोड करण्यात आलेला तो वादग्रस्त व्हिडीओ डिलीट करण्यात आला असून या कृत्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, त्यामुळे हसनैन खान, फैसल शेख आणि शदन फारुकी या तीन यूजर्सना बॅन करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121