“चांदवडचा रंगमहाल ही वास्तू डोळे दिपवणारी आहे. अहिल्याबाई होळकर यांनी महिलांची ताकद ओळखली होती. त्यांनी अनिष्ट प्रथा बंद केल्या. त्यांनी प्रशासक म्हणून उत्तम कामगिरी बजावली. 300 वर्षांपूर्वी त्यांनी जलसंवर्धनाचे महत्त्व ओळखले होते. अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादनासाठी राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी चौंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. होळकर साम्राज्याची उपराजधानी असलेल्या चांदवड येथे अहिल्याबाई होळकर यांचे शिल्प साकारण्यात येईल. तसेच, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तूंच्या संवर्धनासाठी निधीची
Read More
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त भाजपच्या वतीने रविवार, दि. २५ मे रोजी पवई येथील गणेश विसर्जन घाटावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यानंतर घाटाचे पूजन करून राजमाता अहिल्यादेवींना आदरांजली वाहण्यात आली.
देवी उपनिषदामध्ये जगदंबेच्या बीजमंत्राचा ऊहापोह करण्यात आला आहे. या मंत्राच्या शक्तीच्या आणि उपासनेच्या माध्यमातून येणार्या जगदंबेच्या कृपेचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. देवी उपनिषददेखील असेच स्तोत्र. त्याचा घेतलेला हा आढावा...
Sri Devi Upanishad महादेवी जगदंबा ही जशी विश्वमोहिनी आहे, तसेच सारे चराचर हे तिचेच रुप आहे. विश्वातील सगळ्याचीच व्युत्पत्ती तिच्यापासूनच झाली आहे. विश्वातील समस्त ईश्वरी तत्वेही तिचेच अवतार आहेत. अशा जगदंबेच्या स्वरुपाचा या देवी अथर्वशीर्षातून घेतलेला आढावा...
कातळ सड्यावरील पाण्याचा डबक्यांचा आकार हा त्याठिकाणी वाढणाऱ्या बेडूकमाशांच्या संख्येवर परिणाम करत असल्याचे संशोधन संशोधकांनी केले आहे (rock pools of the Devihasol plateau). रत्नागिरी जिल्ह्यातील देवीहसोळच्या सड्यावर हे संशोधन पार पडले (rock pools of the Devihasol plateau). यामध्ये संशोधकांना देवीहसोळच्या सड्यावर तीन प्रजातीचे बेडूकमासे आढळले असून डबक्याचा आकार, पावसाची वारंवारता आणि शिकारी प्राणी या तीन घटकांचा परिणाम बेडूकमाशांच्या वाढीवर कसा होतो याचा उलगडा झाला आहे. (rock pools of the Devihasol plateau)
Extramarital Affairsठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे.
मुंबई विद्यापीठाच्या बाळ आपटे विद्यार्थी व युवा चळवळी अभ्यास केंद्र आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ फेब्रुवारी रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती त्रिशताब्दी समारंभाच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठात ‘अहिल्यादेवी होळकर : एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने परिसंवादातील विचारमंथन मांडणारा हा लेख...
बोली भाषा हा भारताचा आत्मा आहे. भारतीय संस्कृती ही भाषिक संस्कृती असून तिचे संवर्धन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन भाषाशास्त्रज्ञ गणेश देवी यांनी केले. मॅजेस्टिक बुक डेपो आयोजित मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात ते बोलत होते.
महिलांचा पाठिंबा आणि मुंबादेवीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी : शायना एनसी ( shayana nc ) Maha MTB मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा...
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त ‘समरसता साहित्य परिषद’, महाराष्ट्रतर्फे ‘राज्यस्तरीय खुली लेखन स्पर्धा’ ( Writing Competition ) आयोजित करण्यात आली आहे. “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे धार्मिक सामाजिक आणि राजकीय नेतृत्व कालातीत आहे. त्यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त परिषदेतर्फे राज्यस्तरीय खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यास आम्हाला आनंद होत आहे,” असे मत समरसता परिषदेचे कार्याध्यक्ष प्रसन्न पाटील यांनी व्यक्त केले.
उत्तर प्रदेशातील बहराइच येथे नुकत्याच झालेल्या देवीच्या विसर्जन मिरवणुकीत दोन्ही गटात रडा झाला होता. काही दुकाने आणि घरांना आग लागल्याची माहिती आहे. यामुळे घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी गोळीबार केला असून या गोळीबारात एका २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आहे. यामुळे देवीच्या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याची घटना आहे.
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील दुर्गा मातेच्या विसर्जन मिरवणुकीत काही कट्टरपंथीयांनी दगडफेक केली असल्याची धक्कादायक घटना आहे. यावेळी समाजकंटकांनी समाजात तेढ निर्माण होतील अशा घोषणाबाजी केली आहे. यावेळी अतिरिक्त पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला होता. यावेळी वाद निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी वाद शमवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी दगडफोक करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असून ही घटना १२ ऑक्टोंबर रोजी घडली आहे.
आज नवरात्राची सातवी माळ.आज आपण आगरी-कोळी बांधवांची कुलदेवता असणार्या आई एकवीरेची गाथा पाहणार आहोत.
प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक म्हणजे स्कंदमाता
माटुंग्याच्या तलावातून बाहेर आलेल्या स्वयंभू सात देवी...Sat Asara Devi ...
माथ्यावर चंद्रकोर असणारी देवी चंद्रघंटा | Navratri 2024
बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरागडावर येणारे नरेंद्र मोदीजी हे पहिले पंतप्रधान आहेत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी वाशिममधील पोहरादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर झालेल्या सभेत फडणवीस बोलत होते.
(Mumba Devi Temple) मुंबईतील जुन्या आणि महत्वाच्या मंदिरांची ओळख करून देणाऱ्या ‘मुंबईतील नवशक्ती’ या मालिकेतील आजचं मंदिर आहे ‘मुंबादेवी मंदिर’
( Tembhi Naka Devi ) “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना सर्वजण ‘मातोश्री’वर येत असत. आता मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी बाळासाहेबांचे वारस दिल्लीत गल्लोगल्ली फिरत आहेत,” असे टीकेचे बाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठांचे नाव न घेता सोडले आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मृतीभवन उभारण्यात येणार आहे. मानखुर्दच्या महिला व बालविकास विभागाच्या जागेवर हे स्मृतीभवन साकारले जाणार आहे.
मानखुर्द येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि भारतातील पहिले ‘अहिल्या भवन’ उभारले जाणार असल्याची घोषणा कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने चेंबूरमधील फाईन आर्ट्स सोसायटीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे प्रारंभीक टप्प्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना आयोजित करण्यात आली आहे, या योजनेसाठी रु.१०० कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आली असून, सुमारे ५०० स्टार्टअप्सना रू १ लाख ते रू २५ लाखपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येईल तरी या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील इच्छुक महिला स्टार्टअप्सनी ५ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत असे
कोळंबी पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्राॅल जाळ्यांना 'टर्टल एक्सल्यूडर डिव्हाईज' (turtle excluder device) उपकरण न लावल्यामुळे अमेरिकेने गेल्या पाच वर्षांपासून भारतामधून होणाऱ्या सागरी कोळंबीच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे भारताला वार्षिक ४ हजार ५०० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे करावे लागत असल्याची माहिती 'समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणा'ने (एम्पीडा) दिली आहे (turtle excluder device). पावसाळ्यानंतर महाराष्ट्रात 'टर्टल एक्सल्यूडर डिव्हाईज' वापरण्यासंदर्भातील चाचण्या सुरू होणार असून राज्यातील
राज्यातील प्रजेला सुखी आणि समाधानी करायचे असेल, तर राज्यात उत्तम शासन व्यवस्था आणि त्याचबरोबर कृषीपूरक वातावरण हवे, याचे महत्त्व अहिल्यादेवी पुरते जाणून होत्या. राज्यातील शेतीचा विकास व्हावा, तसेच व्यापार वृद्धिंगत व्हावा आणि राज्य समृद्ध व्हावे, यासाठी अहिल्यादेवींनी केलेल्या अनेकविध क्रांतिकारक उपाययोजनांचा आढावा घेणारा हा लेख...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव घेताच, डोळ्यांसमोर सर्वप्रथम उभे राहतात, ते त्यांनी नदीकाठी उभारलेले देखणे घाट. केवळ घाटच नाही, तर असंख्य मंदिरे, किल्ले, राजवाडे, तलाव, विहिरी, बारवांच्या निर्मितीतूनही अहिल्यादेवींची सौंदर्यदृष्टी प्रतीत होते. तेव्हा या लेखातून अहिल्यादेवींच्या स्थापत्यक्षेत्रातील एकूणच योगदानाविषयी आणि त्यांच्या त्यामागील कलात्मक दृष्टिकोनाचा आढावा घेतला आहे.
होळकर घराणे मुळातच हे शिवभक्त होते. त्यामुळे अहिल्यादेवी यांनी श्री सोमनाथ, श्री ओंकारेश्वर, श्री नागनाथ, श्री त्र्यंबकेश्वर, श्री काशी विश्वनाथ, श्री घृष्णेश्वर आदी शिवमंदिरांचा जीर्णोद्धार केला. अहिल्यादेवी यांनी आपले राज्य हे शिवार्पण करून, राज्यकारभार केला. म्हणून, त्यांच्या हातात आपल्याला शिवपिंड दिसते. त्यांच्या दरबारी आदेशावर ‘श्रीशंकर आज्ञेवरून’ अशी राजमुद्रा असे. भगवान शिवशंकराच्या नावानेच त्यांनी लोककल्याणकारी राज्य चालवले. तसेच संपूर्ण देशभरात अहिल्यादेवींनी मंदिरे, वास्तू, जलकुंडे आणि बारवांची न
ज्याप्रमाणे सुपीक शेतजमिनीतून धान्याचे मोती पिकवण्यासाठी मशागत आवश्यक असते, त्याचप्रमाणे बालपणीचे संस्कार आणि शिक्षण उत्तर आयुष्याची पायाभरणी करते. चौंडीमध्ये माणकोजी पाटील शिंदे आणि सुशीलाबाईंच्या पोटी जन्मललेल्या अहिल्येचीही जडणघडण अशीच विलक्षण होती. म्हणूनच वयाच्या आठव्या वर्षापर्यंत आई-वडिलांकडून अहिल्याबाईंना भविष्यातील जीवनाची दिशा मिळाली. अशा या ‘अहिल्या’ ते ‘अहिल्यादेवी’ जीवनप्रवास उलगडणारी ही कथा...
व्यक्तिगत दु:खाला बाजूला सारून राष्ट्रहिताला प्राधान्य देत, अहिल्याबाईंना होळकर राज्याची धुरा हाती घेतली. पण, नुसतीच ती जबाबदारी न घेता, त्या जबाबदारीचे आयुष्यभर समर्थपणे निर्वहनदेखील केले. या कार्यात भारतात परकीय आक्रांतांच्या धार्मिक उन्मादाने धास्तावलेल्या संस्कृतीला आपल्या क्षात्रतेजाने पुन्हा तेजोवलय प्राप्त करून दिले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात देशभरात केलेल्या व्यापक कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
चौंडी... पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर (आधीचे अहमदनगर) जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सीना नदीच्या किनारी वसलेले एक सुंदर गाव. आज या गावाची ओळख आहे ती अहिल्यादेवींची जन्मभूमी म्हणून. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि पर्यटनदृष्ट्याही चौंडीचे स्थान अनन्यसाधारण असेच. त्यानिमित्ताने चौंडी गाव, तेथील अहिल्यादेवी होळकर यांचे स्मृतिस्थळ, शिल्पसृष्टी, या स्थळाचे राजकीय महत्त्व, नगरच्या नामांतराचा लढा यांसारख्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारा हा लेख...
अहिल्याबाई होळकर म्हणजे इतिहासातील अद्वितीय व्यक्तिमत्त्व. भारताच्या मध्यकालीन इतिहासात थोरले राजे छत्रपती शिवराय आणि नंतरच्या काळात अहिल्याबाई होळकर ही दोन राज्यकर्ती व्यक्तिमत्त्वे अतिशय वेगळी होती, महत्त्वपूर्ण होती. त्या काळात राजेशाही असली, तरी लोकशाहीतल्या भारतीय राज्यघटनेतील लोककल्याणकारी राज्याची (welfare state) संकल्पना, दोघांनीही आपल्या शासनातून आणि प्रशासनातून प्रत्यक्षात उतरविली होती. आधुनिक काळातल्या लोकतंत्राची त्यांना जाणीव होती आणि राज्यव्यवहारातील अनेक पातळ्यांवर तर्कशुद्ध आणि लोकाभिमुख कार
१९९५ सालापासून शाळेत दिनविशेषांवर आधारित तीन हजारांहून अधिक फलक रेखाटन करणार्या भाटगाव शाळेतील कलाशिक्षक देविदास हिरे यांच्याविषयी...
बोरीवलीत बांधकामाधीन इमारतीचे मचान कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची घटना समोर आली आहे. कल्पना चावला चौक, सोनी वाडी, बोरिवली येथे मंगळवार, दि. १२ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार येथील २४ मजल्याच्या बांधकामाधीन इमारतीच्या १६व्या मजल्यावरील मचान कोसळल्यामे सदर दुर्घटना घडली.
न्यायाधीश व्हीजी श्रीदेवी यांच्या हत्येला प्रवृत्त करणाऱ्यास केरळ पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. न्यायाधीश श्रीदेवी यांच्या हत्येला प्रवृत्त करणारा मुहम्मद हादी याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा दिल्यानंतर न्यायाधीश श्रीदेवी हे इस्लामिक कट्टरतावादी यांच्या निशाण्यावर आले होते.
‘प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह’ योजनेअंतर्गत देशातील उत्पादन क्षेत्राला चालना देण्यात आली. ही योजना विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच रोजगाराच्या संधीही निर्माण करत आहे. म्हणूनच जागतिक पातळीवर भारत प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याबरोबरच ‘मेक इन इंडिया’ला बळ देणारी, ही योजना म्हणूनच ‘गेम चेंजर’ ठरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज १२ जानेवारीला युवा दिन दिवशी नाशिक मध्ये युवा मोहोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक मान्यवर उपस्थीत होते. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी मराठी मध्ये राजमाता जिजाऊंना वंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज १२ जानेवारीला युवा दिन दिवशी नाशिक मध्ये युवा मोहोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक मान्यवर उपस्थीत होते. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी मराठी मध्ये राजमाता जिजाऊंना वंदन केले. "राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती दिनी मला त्यांना वंदन करण्यासाठी महाराष्ट्राच्या मातीत येण्याची संधी मिळाली याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो" अस ते यावेळी म्हणाले.
अवघ्या पाचव्या वर्षांपासून सुरू झालेला, त्यांचा भरतनाट्यम्चा नृत्यमय प्रवास आजही अव्याहतपणे सुरू आहे. जाणून घेऊया, नाशकात भरतनाट्यमची मुहूर्तमेढ रोवणार्या सोनाली करंदीकर यांच्याविषयी...
येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी भारतभर जोरदार तयारी सुरु आहे. ५०० वर्षांच्या संघर्षांनंतर आज हे मंदिर बनत असल्याने भारतभर या दिवशी दिवाळी साजरी केली जाणार आहे. झारखंडच्या धनबाद येथील सरस्वती देवी यांचे अनोखे व्रतही यानिमीत्ताने पूर्ण होणार आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) आमदार फतेह बहादूर सिंह कुशवाह यांनी सरस्वती देवीवर आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लालू यादव यांच्या पक्षाचे आमदार फतेह बहादूर सिंह कुशवाह यांनी माता सरस्वती आणि ब्रह्मदेवाच्या नात्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे.
नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रेची तारीख जाहीर झाली आहे. २ मार्च २०२४ मध्ये ही जत्रा असल्याचं आंगणे कुटुंबियांनी जाहीर केलं आहे. कोकणात आंगणेवाडी जत्रेला विशेष महत्त्व आहे. या जत्रेला देशभरातून भाविक पोहोचतात. भराडी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी सुमारे लाखो भाविक येथे येतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या दिवशी धार्मिक भजनांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.
यूपीच्या प्रयागराजमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रयागराजमध्ये एक तरुण मोठी सुटकेस घेऊन फिरत होता. त्यानंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकाला त्याच्यावर संशय आला. त्याची चौकशी केली असता तो घाबरला. सुटकेस उघडून पाहिल्यावर पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह होता. हा मृतदेह त्याच्या आईचा असल्याचे तरुणाने सांगितले. त्यानेच आईचा खून केला आहे.
'शिख फॉर जस्टिस'चे गुरपतवंत सिंग पन्नू यांनी संसद भवनात घुसून गोंधळ घालणाऱ्या लोकांना 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. 13 डिसेंबर रोजी लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी सभागृहात उडी टाकून गोंधळ घातला. त्यात सहभागी असलेल्या ७ जणांपैकी ६ जणांना (विशाल-वृंदा, नीलम देवी, अमोल शिंदे, सागर शर्मा, डी मनोरंजन) पोलिसांनी अटक केली आहे. हे सहा आरोपी 4 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि काही काळापासून ही घटना घडवण्याचा कट रचत होते. संसदेत हे कृत्य करण्यापूर्वी त्यांनी रेके केल्याचेही बोलले जात आहे.
विकासापासून दूर असलेले पाडे मूळ विकासात कसे येतील, यासाठी ‘सेवा संकल्प समिती’ गेल्या सात वर्षांपासून प्रयत्न करत आहे. अशाच एका पाड्यामध्ये शांती आणि सलोखा राहावा, विकासाची आणि विचारांची गंगा प्रभू श्रीराम यांच्या साक्षीने प्रकट व्हावी, या उद्देशाने अतिदुर्गम हेदपाडा येथे भव्य श्रीराम मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामस्थांचे श्रमदान आणि सहेली सेवा मंडळ, उद्योजक मदन देवी यांच्या प्रयत्नांतून हे श्री राम मंदिर आता सर्वांसाठी खुले झाले आहे. त्याविषयी...
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या दर आठवड्याला चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. मराठी चित्रपटांपुढे इतर भाषिक चित्रपटांशी स्पर्धा तर आहेच, पण एकाच तारखेला दोन अथवा तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याचे वाढते प्रमाण धोकादायक असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ या चित्रपटाची नुकतेच पोस्टर लॉंच झाले असून २ फेब्रुवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र, याच दिवशी सिद्धार्थ चांदेकर आणि सई ताम्हणकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘श्री देवी प्रसन्न’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणा
धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर ठाण्यातील २५० वर्षे प्राचीन व स्वयंभू घंटाळी देवीची मंदिर वास्तूचे खरेदीखत व बक्षिसपत्राने मंदिराच्या सध्याच्या वारसदारांनी हिंदू जागृती न्यासकडे ट्रस्टच्या सर्व कायदेशीर बाजू पूर्ण करून हवाली केले. या शुभकार्यावेळी आसित झावबा, स्वाती विजयकर , मोहनाताई धैर्यवान व अलकनंदा कोठारे अशा चार वारसदारांचा अतिशय हृद्य असा सत्कार विश्वस्तांच्या हस्ते घंटाळी देवी मंदिरात करून त्यांना देवीचा प्रसाद म्हणून महावस्त्र देण्यात आले.
समुद्र देवतांचे किनार्यावरील समाज भक्तिभावाने पूजा करतात. बर्याचदा गुहा किंवा दगडातून त्यांनी आकार घेतलेले असतात. त्यांना ‘स्वयंभू दैवते’ म्हणतात. असेच एक स्वयंभू देवस्थान पालघर जिल्ह्यत एडवण या गावी आहे. मनात काही आशा घेऊन देवीच्या दर्शनाला गेलात, तर आपल्या आशा ती पूर्ण करते. म्हणून या देवीला आशापुरा देवस्थान असे म्हटले जाते.
‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने, बँकिंग सेवांचा लाभ घेण्याची सुलभता आणि सुविधा वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आपल्या आर्थिक समावेशी (ऋख) ग्राहकांसाठी ’मोबाईल हॅण्डहेल्ड डिव्हाईस’ सादर करण्याची घोषणा केली आहे. ‘एसबीआय’चे अध्यक्ष दिनेश खारा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा उद्देश आर्थिक सर्वसमावेशकता सशक्त करणे आणि आवश्यक बँकिंग सेवा जनतेपर्यंत पोहोचवणे, हा आहे.
स्वानुभवाने सांगावेसे वाटते की, गायनाने वस्तुलाभ व घटनाप्राप्ती होऊ शकते. पण, यावर अधिक संशोधन व प्रयोग होणे आवश्यक आहे.
स्टर्लिंग जनरेटर्स प्रायव्हेट लिमिटेड (एसजीपीएल) ह्या स्टर्लिंग अँड विल्सन ग्रुपमधील कंपनीने तसेच भारतातील आघाडीच्या जनित्रसंच (जेनसेट) उत्पादक कंपन्यांपैकी एकीने, आज, आपल्या रेट्रोफिट एमिशन कंट्रोल डिव्हाइस (आरईसीडी) हे नवोन्मेषकारी शुद्ध हवेचे उपकरण, बाजारात आणले.पीआय ग्रीन इनोव्हेशन्ससह कंपनीने हे उपकरण बाजारात आणले आहे.आरईसीडी फिल्टर-लेस तंत्रज्ञानावर घडवण्यात आले आहे आणि इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेशनच्या मूलभूत तत्त्वांवर आधारित आहे.हे उपकरण इंजिनाच्या एग्झॉस्टमधील (पार्टिक्युलेट मॅटर अर्थात पीएम) 70 ट
रा. स्व. संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अभाविपचे माजी संघटनमंत्री मदनदासजी देवी यांचे दि. २४ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मदनदासजींनी घडविलेले असंख्य कार्यकर्ते, स्वयंसेवक यांनी त्यांच्याप्रतीच्या भावना विविध माध्यमांतून व्यक्तही केल्या. देशाच्या कानाकोपर्यात श्रद्धांजली सभांमधून मदनदासजींना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. त्यानिमित्ताने मदनदासजींची लहान बहीण मंगल परीख यांनी त्यांच्या लाडक्या पिलाभईंच्या स्मृतींना दिलेला उजाळा...