झारखंडच्या सरस्वती देवींची अनोखी राम भक्ती; ३० वर्षे मौन व्रताचे केले पालन!

    08-Jan-2024
Total Views | 93
saraswati devi
 
रांची : येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी भारतभर जोरदार तयारी सुरु आहे. ५०० वर्षांच्या संघर्षांनंतर आज हे मंदिर बनत असल्याने भारतभर या दिवशी दिवाळी साजरी केली जाणार आहे. झारखंडच्या धनबाद येथील सरस्वती देवी यांचे अनोखे व्रतही यानिमीत्ताने पूर्ण होणार आहे.
 
 सरस्वती देवी या ८५ वर्षांच्या आहेत. अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी त्या गेली ३० वर्षे मौन व्रताचे पालन करत आहेत. २२ जानेवारी २०२४ रोजी रामललाच्या मूर्तीला अभिषेक होताच त्यांचे हे व्रत पुर्ण होणार आहे. सरस्वती देवी यांनी १९९२ मध्ये हे मौनव्रत सुरू केले होते. ६ डिसेंबर १९९२ रोजी स्वामी नृत्य गोपाल दास यांच्या आदेशानुसार त्यांनी मौन व्रत पाळण्यास सुरुवात केली. याच दिवशी सरस्वती देवी यांनी संकल्प केला की, राम मंदिराच्या अभिषेकाच्या दिवशीच त्या हे व्रत तोडतील.
 
त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या निर्णयाचे स्वागत केले आणि त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. यानंतर त्यांचा जवळपास सर्व वेळ उपासनेत गेला होता. त्यांना राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रणही देण्यात आले आहे. रामलल्लांनी मला प्राण प्रतिष्ठेसाठी बोलावले आहे. माझी तपश्चर्या पुर्ण झाली, माझे जीवन सफल झाले अस मत त्यांनी व्यक्त केले. त्यांना मिळालेल्या आमंत्रणामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब आनंदी झाले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
रेल्वे उपकरणांच्या निर्यातीत भारताची झेप केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आढावा

रेल्वे उपकरणांच्या निर्यातीत भारताची झेप केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आढावा

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवार, दि.२७ रोजी गुजरातमधील वडोदरा येथील सावली येथे असलेल्या अल्स्टॉम या रेल्वेनिर्मिती कारखान्याला भेट दिली. यावेळी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत वडोदरा खासदार डॉ. हेमांग जोशी, सावलीचे आमदार केतनभाई इनामदार, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, वडोदरा आणि अहमदाबादचे डीआरएम आणि इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी होते. यावेळी कारखान्यात काम करणाऱ्या अल्स्टॉमचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रेल्वे ..

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र आणि अपात्र लाभार्थी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र आणि अपात्र लाभार्थी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र असलेल्या २.२५ कोटी लाभार्थ्यांना जूनचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे.मात्र २६.३४ लाख लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले आहेत. य.ाअपात्र लाभार्थ्यांपैकी काहीजण एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत आहेत. तर काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी आहेत,तसेच ही ठिकाणी पुरुषांनीही अर्ज केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या सर्व २६.३४ लाख अपात्र लाभार्थींना जूनपासून योजनेचा लाभ घेण्यास स्थगिती दिल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या योजनेअ..

महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश राजवटी विरोधात सर्व भारतीयांना एकत्र करून स्वातंत्र्यलढा हा देश पातळीवरून नेला. स्वदेशी,स्वधर्म जागरूत करून राष्ट्रीय शिक्षणावर भर दिला. या सर्व कामासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले.आपल्याला महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे.‘असे पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले. नुकतेच मातंग साहित्य परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्र विभाग व अण्णा भाऊ साठे अध्यासन यांच्या वतीने लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121