‘समरसता साहित्य परिषदे’तर्फे ‘राज्यस्तरीय खुली लेखन स्पर्धा’

    06-Nov-2024
Total Views | 60
AH

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त ‘समरसता साहित्य परिषद’, महाराष्ट्रतर्फे ‘राज्यस्तरीय खुली लेखन स्पर्धा’ ( Writing Competition ) आयोजित करण्यात आली आहे. “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे धार्मिक सामाजिक आणि राजकीय नेतृत्व कालातीत आहे. त्यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त परिषदेतर्फे राज्यस्तरीय खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यास आम्हाला आनंद होत आहे,” असे मत समरसता परिषदेचे कार्याध्यक्ष प्रसन्न पाटील यांनी व्यक्त केले.

लेख मराठी भाषेतूनच असावा. तसेच लेखाची शब्द मर्यादा 8०० ते १००० शब्द असावी. लेख पूर्ण टाईप करून त्यावर आपले नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि जिल्हा लिहून samarasatamah@gmail.com या ईमेलवर दि. १० जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ पर्यंत पाठवावा, असे आयोजकांनी नमूद केले आहे.

ही स्पर्धा प्रथम जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येत असून त्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ विजेते निवडण्यात येतील. पुढे जिल्हास्तरीय विजेत्या स्पर्धकांमधून राज्यस्तरीय विजेते निवडले जाणार आहेत.

राज्य पातळीवर पारितोषिक रक्कम ही प्रथमसाठी ७ हजार, ००१, द्वितीयसाठी ५ हजार, ००१, तृतीयसाठी ३ हजार, ००१ आणि उत्तेजनार्थ (५ जण) एक हजार, ००१ अशी आहे. तसेच जिल्हा पातळीवर प्रथमसाठी २ हजार, ००१, द्वितीयसाठी १ हजार, ५०१, तृतीयसाठी एक हजार, ००१ आणि उत्तेजनार्थ (५ जण) ५०१ रुपये असे आहेत. स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी समरसता साहित्य परिषदेच्या https://www.facebook.com/samarasatap?mibextid=LQQJ4d या फेसबुक पेज बुकवर माहिती मिळेल, असे आयोजकांनी सांगितले आहे.

स्पर्धेसाठी विषय आहेत
  • अहिल्यादेवी-न्यायप्रिय, आदर्श प्रशासक व समाज सुधारक

  • अहिल्यादेवींचे धर्मकार्य व राष्ट्रीय दृष्टिकोन

  • अहिल्यादेवी होळकर-भारतीय स्त्री चिंतनाच्या आदर्श

  • अहिल्यादेवींचे जीवनकार्य-आजच्या युगातील प्रासंगिकता.

  • अहिल्यादेवी आणि पारंपरिक स्थापत्य आणि कला विकास


अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121