बहराइच : उत्तर प्रदेशातील बहराइच येथे नुकत्याच झालेल्या देवीच्या विसर्जन मिरवणुकीत दोन्ही गटात रडा झाला होता. काही दुकाने आणि घरांना आग लागल्याची माहिती आहे. यामुळे घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी गोळीबार केला असून या गोळीबारात एका २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आहे. यामुळे देवीच्या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याची घटना आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रविवारी महसी तहसील येथे महाराजगंज शहरातून मूर्ती विसर्जनाची मिरवणूक निघाली होती. त्यावेळी रस्त्यावर जल्लोषाचे वातावरण होते. सर्वजण भक्तीभावात तल्लीन होऊन डीजेवर नाचत होते. दरम्यान, ही मिरवणूक मुस्लिमबहुल भागातून येत होती. तेव्हा जल्लोषात डिजे वाजवल्या जाणाऱ्या गाण्यावर कट्टरपंथींनी विरोध दर्शवला. गाणे बंद करण्यावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला. याप्रकरणात एका युवकाला गोळी लागल्याची घटना आहे.
गोळीबारात युवकाची हत्या
प्रसारमाध्यमानुसार, बराच वेळ दोन्ही गटांमध्ये वाद आणि शिवीगाळ केल्यानंतर इतर समुदायातील लोकांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. दोन गटात सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. मात्र या गोळीबारात २२ वर्षाच्या युवकाची हत्या झाली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोडलं मौन
.याप्रकरणी आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या प्रकरणावर मौन सोडले. पर्यावरण बिघडवणाऱ्या लोकांना सोडले जाणार नाही, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. गैरप्रकार करणाऱ्यांची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. या हिंसाचारात अनेकजण गंभीर झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.