मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Rajdeep Sardesai on PoJK) भारत-पाकिस्तानमधील तणाव संपवण्यावर भाष्य करणारे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमुळे त्यांच्याविरोधात देशभरातून संताप व्यक्त होताना दिसतोय. सरदेसाई यांनी भारत सरकारला पीओके पूर्णपणे पाकिस्तानला सोपवण्याचा आणि नियंत्रण रेषा आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून स्वीकारण्याचा सल्ला दिलाय. हा व्हिडिओ २२ मे चा असल्याचे सांगण्यात येतेय.
हे वाचलंत का? : कोणालाही मनमानी पद्धतीने वागण्याची परवानगी नाही!; का संतापले योगी आदित्यनाथ?
मिळालेल्या माहितीनुसार, राजदीप सरदेसाई यांनी एका चर्चेदरम्यान म्हटले की, जोपर्यंत आपण खऱ्या मुद्द्यावर चर्चा करत नाही तोपर्यंत कायमस्वरूपी तोडगा निघणार नाही. आपण पाकिस्तानशी दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे, आपल्याला काश्मीरमधील आपले प्रश्न सोडवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. राजदीप सरदेसाई यांच्या बुद्धीमत्तेवर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहेत.