देशांतर्गत शत्रूंवर स्ट्राईक

    19-May-2025
Total Views | 16
internal enimes to be killed


पाकचे पाणी अडवून आणि तेथील हवाईतळ नष्ट करून भारताने पाकची चांगलीच जिरवली. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सैन्याने विशेषतः हवाई दलाच्या जोरदार प्रत्युत्तरामुळे पाकची पळता भुई थोडी झाली. भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्यानंतर भारतीय क्षेपणास्त्रे आणि हवाई संरक्षण प्रणालीची सज्जता संपूर्ण जगाने पाहिली. दहशतवाद आणि दहशतवादाला पोसणार्‍या पाकिस्तानवर भारताने जोरदार प्रहार केल्यानंतर आता आणखी एक स्ट्राईक केला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आता अवैध बांगलादेशी आणि म्यानमारमधील घुसखोरांची ओळख पटवण्यासाठी 30 दिवसांची मुदत निश्चित केली असून, त्यानुसार अवैध बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्यास सुरुवातदेखील झाली आहे. समोरील गोटातील शत्रू तत्काळ लक्षात येतो, मात्र आपल्यातलेच शत्रू लक्षात येत नाहीत. काँग्रेस नेते गौरव गोगोई हे पाकिस्तानात फिरायला नाही, तर पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’कडून प्रशिक्षणासाठी गेले असल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिचे पाकिस्तानी एजंटशी संबंध असल्याचे समोर आले आहे. ज्योती पहलगाम हल्ल्याआधी त्याठिकाणी जाऊन आली होती. तसेच, तिने चीनचाही दौरा केला होता. ज्योतीबरोबरच आणखी काही युट्यूबरलाही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे भारतात राहून भारताशी गद्दारी करणार्‍यांचा बंदोबस्त करणे आता गरजेचे. तिकडे सैन्य देशाच्या सीमांचे आणि भारतीयांचे रक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लावत असताना, इकडे असे फुटकळ युट्यूबर पाकिस्तानला मदत करत असतात. मात्र, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आता देशांतर्गत जे शत्रू वावरत आहेत, त्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. दरम्यान, 30 दिवसांच्या कालावधीनंतर संबंधित व्यक्तीला भारतीय नागरिक असल्याचे सबळ पुरावे देता आले नाही, तर त्यांना हद्दपारीला सामोरे जावे लागणार आहे. हद्दपारीच्या प्रलंबित व्यक्तींना ठेवण्यासाठी पुरेसे जिल्हास्तरीय अटक केंद्रे स्थापन करण्यास सांगितले गेले आहे. फेब्रुवारीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले होते, त्यानुसार कारवाई सुरू झाली आहे.

देशहितासाठीचे अममत्व


‘शांतिप्रिय’ समाजाविषयीचा कमालीचा कळवळा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना येणे साहजिकच. मतांच्या लालसेपोटी ममतांनी हिंदूंना बंगालमध्ये अक्षरशः वार्‍यावर सोडले असून, हिंदूंवर अत्याचार होत असतानाही त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. त्यात त्यांचे शांतिप्रिय खासदार हे तर ‘चहापेक्षा किटली गरम’ असा प्रकार. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. याला प्रत्युत्तर म्हणून दि. 6 आणि दि. 7 मे रोजी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत हवाई हल्ल्याद्वारे पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आता भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ला जागतिक व्यासपीठावर जगासमोर आणण्यासाठी आणि पाकचा बुरखा फाडण्यासाठी 59 सदस्यांचे सात शिष्टमंडळ तयार केले आहे. त्यात समाविष्ट असलेले प्रतिनिधी 33 देशांमध्ये जाऊन ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल माहिती आणि सत्यता सांगणार आहे. या शिष्टमंडळामध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांचाही समावेश होता. मात्र, त्यांनी जाण्यास नकार दिला आहे. थोडक्यात, ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजेच भारतीय सैन्याची शौर्यगाथा आणि पाकिस्तानचे दहशतवाद्यांविषयी असलेले प्रेम सांगण्यास पठाण साहेब नाही म्हणत आहेत. ते हो तरी कसे म्हणतील म्हणा, एकेकाळी भारतीय क्रिकेट संघात समावेश असलेल्या पठाणने विशिष्ट समाजाच्या मदतीनेच खासदारकी मिळवली. त्यामुळे हिंदू धर्म विचारून हत्या झालेल्या कुटुंबीयांची व्यथा आणि भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ याविषयी त्यांना कळवळा तरी कशाला असेल? ममता बॅनर्जी यांनी हेदेखील स्पष्ट केले आहे की, युसूफ पठाण किंवा त्यांच्या पक्षाचा कोणताही नेता या शिष्टमंडळाचा भाग असणार नाही. हेच पठाण साहेब मुर्शिदाबाद हिंसाचारादरम्यान चहा पित बसले होते आणि अप्रत्यक्षरित्या ‘शांतिप्रियां’ची पाठराखण करत होते. तृणमूलचे आणखी एक खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनीदेखील आरोग्याच्या कारणास्तव शिष्टमंडळात सामील होण्यास नकार दिला. आमच्याशी सल्लामसलत न करता तृणमूलच्या खासदारांना परदेशात पाठवले जाते, म्हणून ममताही लालबुंद झाल्या. आता देशहितासाठीच्या मुद्द्यांवर कसली सल्लामसलत ममतांना हवी, हे त्याच जाणो. परंतु, ममतांचा हिंदूविरोधी बुरखा पठाण साहेबांच्या नकारघंटेमुळे पुन्हा एकदा फाटला, हे नक्की.
पवन बोरस्ते
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121