भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेविषयीचे आमूलाग्र परिवर्तन उलगडताना...

    29-Feb-2024
Total Views | 85
National Security
 
आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत मोदी सरकारने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेमध्ये आमूलाग्र परिवर्तनाची भक्कम पायाभरणी केली. आपण सध्या संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेमधील सर्वांत दूरगामी सुधारणांच्या टप्प्यावर उभे आहोत. राष्ट्रीय सुरक्षा आव्हानांची प्रचंडता (चीन) आणि जटिलता (तंत्रज्ञान विषयक नवकल्पना, ज्या ज्ञात इतिहासातील युद्धाच्या स्वरूपात सर्वाधिक पायाभूत बदलाला चालना देत आहेत) लक्षात घेतल्या, तर बरेच काही साध्य केले गेले असले तरी अजूनही अनेक संक्रमणे होऊ घातलेली आहेत. त्यामुळे यासंदर्भातील थोडा वास्तववादी परामर्श घेणे उपयुक्त ठरावे.

राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातला भव्य व्यूहरचनात्मक आराखडा स्वत: पंतप्रधानांनी 2015च्या डिसेंबरमध्ये सेनानींना संयुक्तरित्या संबोधित करताना मांडला होता. व्यापक दृष्टिकोन आणि उद्देशाची स्पष्टता यांचा प्रत्यय यामुळे पंतप्रधानांचे हे भाषण उल्लेखनीय ठरले-आपला उत्क्रांतीवादी धोरणात्मक दृष्टिकोन, संरचनात्मक सुधारणा, तंत्रज्ञानविषयक सुधारणा, सांस्कृतिक संक्रमणे, सामर्थ्य प्रदर्शनाचा समावेश करण्याच्या हेतूने संस्थागत आणि क्षमता सुधारणा यांच्याशी संबंधित मार्गदर्शक आराखडा, या भाषणातून मांडला गेला. त्यांनी सिद्धांत आणि धोरणे यांत व्यापक सुधारणा करण्याबाबत आवाहन केले. वास्तविक, हे मूलत: आपल्या आंतरिक प्रतिभेमध्ये दृढमूल असले, तरीही राष्ट्रीय सुरक्षा प्रणालीच्या माध्यमातून परिवर्तनाला दिशा आणि प्रेरणा देणार्‍या वैचारिक नेतृत्वाची गरज आहे. हा आराखडा इतका महत्त्वाकांक्षी होता की, त्याच्या आविष्करणाविषयी काही गैरसमज होते- शेवटी, भूतकाळात अशा अनेक उपक्रमांची फलनिष्पत्ती शून्य ठरल्याचा अनुभव जमेस होताच. यावेळी मात्र निरंतरता, नियमितता आणि दृढ संकल्प यांच्या योगे, सुधारणा अचूक टप्प्यांत उलगडल्या आहेत.
 
या सार्‍याची सुरुवात CDS/DMA अर्थात संयुक्त संरक्षण सेवांच्या/लष्करी घडामोडी विभागाच्या निर्मितीसारख्या पथदर्शक चालीपासून झाली. संकल्पना आणि झपाटा याबाबत ती अमेरिकन बॅरी गोल्डवॉटर निकोलसपेक्षाही अधिक शक्तिशाली ठरली. या पायरीचे महत्त्व उघडपणे दृष्टोत्पत्तीस येणार्‍या संरचनात्मक सुधारणांच्याही पलीकडचे ठरले; ज्यायोगे भारताच्या नागरी-लष्करी संबंधांच्या (CMR) चौकटीमधील एक मोठी विसंगती दुरुस्त झाली, संरक्षण सेवांना लष्करी घडामोडींच्या संदर्भातला त्यांचा न्याय्य आवाज परत मिळवून दिला गेला. ज्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे विचार करण्यास, संकल्पनानिर्मिती करण्यास, त्या संकल्पना प्रचलित करण्यास आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या चौकटीमध्ये अत्यावश्यक असलेले बदल अमलात आणण्याची मोकळीक देते. इतकेच नव्हे, तर त्यासाठी प्रोत्साहितही करते, अर्थातच हे सर्व मजबूत राजकीय देखरेखीखाली घडत आहे. अत्यंत अभूतपूर्व असेच म्हणावे लागेल.
बालाकोट आणि हिमालयाच्या पर्वतरांगांमधील कारवाईमधून प्रतिबिंबित झालेल्या देशाच्या धोरणात्मक दृष्टिकोनामध्ये आपल्याला एक नवे सामान्य (न्यू नॉर्मल) प्रत्ययास आले आहे. एका वेगवान कारवाईमधून आपण आपल्या शत्रूंना सुचित केले आहे की, कोणत्याही प्रकारचे दु:साहस केल्यास त्याची जबर किंमत त्यांना मोजावी लागेल. पण, अशाच प्रकारचा संदेश द्यायला क्लिष्ट मुत्सद्देगिरीने कदाचित कित्येक महिने लागले असते.

मोदी युगातील संरक्षण नीती ही अत्यंत सुस्पष्ट आणि परिवर्तनशील धोरणात्मक दृष्टिकोन बाळगणार्‍या परराष्ट्र धोरणाच्या छत्रछायेखाली उदयाला आली आहे. बळ आणि मुत्सद्देगिरी या परराष्ट्र धोरणाच्या नाण्याच्या एकसारख्या ठळक बाजू आहेत, ही वस्तुस्थिती या संरक्षण धोरणाने ओळखली आहे. भारताची धोरणात्मक स्थिती मजबूत करण्यासाठी बळ आणि मुत्सद्देगिरी यांच्या गुणधर्मांना एकत्रितपणे लागू केले पाहिजे. पंतप्रधान स्पष्टपणे प्रतिपादन करतात की, ’शांती की चाह और शक्ती की राह, भिन्न नही हैं।’ अर्थात, शांततेची आकांक्षा आणि बलसंपन्नतेचा़ मार्ग हे परस्परसंवादी आहेत. उत्तरेकडे मोठ्या लष्करी संतुलनाच्या परिणामस्वरूप (चीनबरोबरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर) आपली संरक्षणसज्जता ही धमकीला अधिक अचूक प्रत्युत्तर देणारी आहे. ‘आयएसआर’ (अर्थात गुप्तवार्ता, टेहळणी आणि हेरगिरी), शक्तिपातळी आणि यांत्रिकीकरण यासंदर्भात आपली प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणावर मजबूत झाली आहे.

सैन्यबळ, तोफखाना, बलगुणक, राखीव साठा, तंत्रज्ञान, श्रेणीसुधार आणि प्रतिसाद पर्याय संरक्षण उपक्रमामधील आत्मनिर्भरतेचे प्रेरक हे आत्मनिर्भरतेच्या गंभीर उद्दिष्टाच्या बरेच पुढे जातात. नावीन्यपूर्णता, ऊर्जा आणि उपक्रमशीलता यांच्या नव्या संस्कृतीमध्ये प्रविष्ट होण्याचा हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान व्यवसाय आणि उद्योगजगत यामधील प्रतिभावंतांना येण्यासाठी, संरक्षण क्षमता निर्माण करण्यासाठी आणि भविष्यासाठी पुरवठा साखळीमध्ये लवचिकता निर्माण करण्यासाठी हे आमंत्रण आहे. iDEX (संरक्षण उत्कृष्टतेसाठी नवकल्पना) द्वारे सक्षमीकृत असे ’114ai’, ’3rditech’ आणि ’New Space’ यांच्यामुळे भारतीय राष्ट्रीय विजेता बनण्याची आणि वाढण्याची क्षमता दाखवली आहे. अंतराळ क्षेत्रासारख्या उच्चश्रेणीतील राष्ट्रीय सुरक्षा उपक्रमांमध्येही पूर्वी ज्या गोष्टी केवळ देशांतर्गत तयार होत असे, त्या आता वेगाने कंपन्या बनवू लागल्या आहेत, हे एलोन मस्क यांनी दाखवून दिले आहे. युक्रेनमध्येही ‘शेल्फ’ तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकांद्वारे युद्धे अधिक सुशोभित केली जात आहेत, सरकारी अनुदानित प्रयोगशाळद्वारे नव्हे. त्यामुळे ज्या विचार आणि गतीने खासगी क्षेत्रातील सक्षमता/स्टार्टअप ऊर्जांचे क्षमतानिर्मिती आणि युद्धात एकीकृत झाल्या आहेत, त्या भविष्यातील भारतीय सैन्याची शक्ती निश्चित करतील. येथे नमूद केलेल्या संदर्भात, ओएफबी (आयुधनिर्माण कारखाना मंडळा)चे खासगीकरण दीर्घकाळ प्रलंबित असताना, ‘डीआरडीओ’ (संरक्षण संशोधन आणि विकास संघटना) बाबतच्या सुधारणा केवळ चित्तथरारक आहेत.

एकत्रितपणे, सातत्यपूर्ण उपक्रम हे वैश्विक संरक्षण केंद्र तसेच संरक्षण क्षेत्रातील ऊर्जास्रोत बनण्याच्या भारताच्या संकल्पाची अभिव्यक्ती आहेत - जर जगातील शीर्ष 20 मोठ्या संरक्षण कंपन्यांपैकी सात चिनी आहेत, तर भारताच्या समान आकांक्षा का असू नयेत?संरक्षण सेवांनी ‘थिएटर कमांड्स’च्या वादग्रस्त मुद्द्यावर व्यापक एकमत विकसित केले आहे आणि आता ते अंमलबजावणीच्या किरकोळ समस्यांना सोडवत आहेत - त्यामुळे ‘थिएटर कमांड्स’ लवकरच घडून येतील. संयुक्त संस्कृतीला चालना दिली जात आहे. त्याहूनही लक्षणीय बाब म्हणजे, बहु-कार्यक्षेत्र क्षमतेसह कृत्रिम बुद्धिमत्तेने सक्षम लष्कराचा पाया रचण्यासाठी डेटा अनलॉक करणे, ‘डिजिटल पाईपलाईन’ची संरचना करणे आणि तंत्रज्ञानाची उपछाया स्वीकारणे, ही प्रक्रिया सुरू झाली आहे.नंतरचे एक मोठे आव्हान आहे- मोठ्या भाषिक प्रतिमानांचे (LLMs), गणना क्षमता, क्लाऊड्स, फेशियल रिकग्निशन सॉफ्टवेअर, कोडर आणि अल्गोरिदम्स यांचा युद्धाच्या सर्व उपक्षेत्रांमध्ये विकास करण्यासाठी मोठ्या सर्जनशीलतेची आवश्यकता असेल - तथापि, चीनच्या असमतोलाला सामोरे जाण्याच्या दृष्टीने हे आमच्यासाठी गुप्त रहस्य असेल.

चिनी प्रचंड लष्करी बळाचा मुकाबला केवळ वाढीव खर्चाने साध्य होणार नाही. चीन आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण खर्चातील तफावतीप्रमाणेच भारत आणि चीन यांच्याही संरक्षण खर्चात तफावत आहे. तथापि, प्रतिबंधक किरणोत्सर्गाच्या बाबतीत, ‘पेंटागॉन’मध्ये कारणीभूत असलेल्या ’विस्थापन चिंते’मुळे चीन कदाचित सरस ठरत आहे - सखोल सुधारणा, संघटनात्मक पुनर्रचना, तांत्रिक नवकल्पना, कल्पक रणनीती आणि फलनिष्पत्तीचे लेखापरीक्षण याद्वारे आपण बरेच काही साध्य करू शकतो आणि तेही खर्चात अपरिहार्य वाढ केल्याशिवाय. जर नवोपक्रमाचे मर्म खर्‍या अर्थाने प्राप्त करायचे असेल, तर आपल्याला नोकरशाहीच्या विश्वासाबाबत मोठी झेप घ्यावी लागेल (एकट्या राजकीय वर्गाने नव्हे, तर नागरी आणि लष्करी नोकरशाहीच्या नेतृत्वाने) - नियम आणि प्रक्रिया शस्त्रक्रियेने कमी कराव्या लागतील. संरक्षणसंबद्ध नवोपक्रमाच्या, प्रत्येक शाखेमध्ये केंद्रे तयार केली आहेत, जोखीम घेण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन दिले जात आहे, अयशस्वी निधी आणि उद्योजक ‘क्रॉस कनेक्ट’ यांना त्यांच्या नैसर्गिक प्रवाहाला वाव मिळतो.
 
सार्वजनिक अवकाशात कल्पना करणे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या आकार देणे, यासंदर्भात संरक्षण सेवांसाठी आज कितीतरी मोठे क्षेत्र उपलब्ध आहे. ‘ओआरएफ’ संचालित, वार्षिक रायसीना संवाद, परराष्ट्र धोरण, भू-राजकारण आणि भू-अर्थशास्त्र यातील सखोल समन्वयाच्या स्रोतांमध्ये वृद्धिंगत झाला आहे. अलीकडेच, भारतीय लष्कराने प्रथमच इंडो-पॅसिफिक आर्मी चीफ्स कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. ज्यात ब्राझील, टोंगा, युके, सौदी अरेबिया, थायलंड, इंडोनेशिया आणि अमेरिका अशा भौगोलिकदृष्ट्या वैविध्य असलेल्या देशांतील 17 लष्करप्रमुख आणि 12 शिष्टमंडळांच्या प्रमुखांचा जागतिक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर लवकरच ‘चाणक्य डिफेन्स डायलॉग’ आणि ग्लोबल टेक्नोलॉजी समिट’ने हे वर्तुळ पूर्ण केले. भारत आता राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रातील प्रगल्भ, विचारशील, अष्टपैलू, सर्वसमावेशक विचारसरणीचे असे जागतिक केंद्र म्हणून स्वबळावर उदयास येत आहे.नागरी-लष्करी संमीलनाचा मंत्र स्वीकारणे, हे सध्याच्या परिवर्तनाचे आणखी एक धाडसी पाऊल म्हणावे लागेल. राष्ट्रीय सुरक्षेची विशिष्ट क्षेत्रे इतकी व्यामिश्र होत चालली आहेत की, भविष्यातील लष्करी क्षमता निर्माण करण्यासाठी केवळ उपकरणे मिळवण्यापुरते मर्यादित न राहता, प्रतिभा संपादनाकडे वळावे लागेल. भारतामध्ये याबाबतीत सरकारने ऐतिहासिक सुरुवात केली आहे. त्यामुळे आपणही या सांस्कृतिक स्थित्यंतरांना गती देण्याची गरज आहे.परिवर्तनासाठी भव्य इमारतीची उभारणी करताना अनेक पर्वत हलविले गेले आहेत, तरीही याहून उंच शिखरांची मापे घेणे आवश्यक आहे.

चीन हे त्या शिखरांपैकी पहिले आहे. चीनचे आव्हान हे गुंतागुंतीचे, अत्याधुनिक आणि धोरणात्मक धूर्ततेने युक्त असल्यामुळे, ते केवळ कार्यात्मक पुनर्समतोलाच्या पलीकडे जाते: ‘डब्ल्युटीसी’मध्ये केवळ अतिवेगवान मोहिमेची क्षमता चिंतेसाठी कारणीभूत नाही, तर व्यापक तंत्रज्ञान झूम, डिजिटल लढाईचे त्यांचे दृढनिश्चयात्मक धोरण आणि रॉकेट आणि ‘स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स’सारखे त्याचे महत्त्वपूर्ण प्रकल्प, हेही यात भर घालतात. आपल्या धोरणात्मक प्रतिकारातील या उणिवा दूर करण्यासाठी आपल्याला वेगाने पुढे जाण्याची आवश्यकता आहे.इतर आव्हानेदेखील समोर आहेत. ती म्हणजे, विषमतेची शक्ती आणि अचूकतेची जादू यासारख्या जगभरातील अलीकडील संघर्षांमधून बाहेर पडलेल्या धड्यांना सामोरे जाणे. पाच दशलक्ष डॉलर्सच्या खर्चात बनवलेली हुथी क्षेपणास्त्रे 250 दशलक्ष डॉलर्सच्या अमेरिकन हवाई संरक्षणाला निष्प्रभ करत आहेत. तातारस्तान (रशियातील एक प्रदेश)मधून कमी किमतीच्या शेहजाद लाइटर युद्धसामग्रीने अचूकतेच्या बळावर युक्रेनमध्ये कहर केला आहे. पारंपरिक खरेदीचक्र ज्यासाठी सहा वर्षांचा काळ घेतील ते आता नवोपक्रमाची चक्रे सहा महिन्यांत प्रदान करत आहेत. आपल्याला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे; तो अद्याप पूर्ण झालेला व्यवहार नाही.राष्ट्रीय सुरक्षेचे जे परिवर्तन घडवून आणले गेले आहे, त्याला त्याच्या तार्किक निष्कर्षाप्रत नेण्याची गरज आहे. ’वसुधैव कुटुम्बकम्’ हा जगासोबतच्या आपल्या गुंतवणुकीचा पथदर्शक प्रकाश असलाच पाहिजे. परंतु, असे करत असताना आपण ‘जग ही एक व्यायामशाळा आहे, जिथे राष्ट्रे स्वत:ला मजबूत करण्यासाठी येतात,’ या स्वामी विवेकानंदांचा शहाणपणाच्या बोलांकडेही तितकेच लक्ष देऊन त्यातील धोके कमी केले पाहिजेत - ‘शक्तीतून शांती’ हा आपला मूलमंत्र असला पाहिजे.


 
 
राज शुक्ला

(लेखक लेफ्टनंट जनरल निवृत्त आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य आहेत.)



अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121