रोगाची मूळ स्थिती शोधताना काही अनुमान असे निघतात की, जर आईची मानसिक व शारीरिक स्थिती ही खूपच संवेदनशील व प्रखर असेल, तर ती स्थिती बरेचवेळा जशीच्या तशी मुलांमध्ये दिसून येते. याशिवाय अजूनही असे अनुमान काढता येते की, जेव्हा स्त्रीला गर्भधारणा होते, तेव्हा पुरुष बीज व स्त्री बीज एकत्र येऊन Zygote तयार होतो, म्हणजेच पुरुष आणि स्त्रीचे अतिशय शक्तीशाली कण एकमेकांमध्ये मिसळून त्यातून नवनिर्मिती होते. त्याचमुळे गर्भधारणेच्या वेळेस आई आणि वडिलांची जी ’State of disposition’ असते, ती ऊर्जेच्या स्वरुपात गर्भाकडे पाठवली जाते.
म्हणजेच काय तर मानसिक स्थिती व शारीरिक स्थितीचे मूळ हे-
१) एखादी मानसिक स्थिती जी खूपच प्रखर आहे, त्यामुळे त्या माणसाच्या मनावर खोलवर परिणाम होऊन माणूस त्याच स्थितीला खरी मानून पुढील वागणूक करत असतो.
२) तितकीच प्रखर शारीरिक व मानसिक स्थिती जर गर्भवती स्त्रीला असेल, तर आईकडून बाळांकडे तो स्थित प्रसारित होते.
३) आई व वडील या दोघांचीही प्रखर ‘State of disposition’ नवजात बाळाकडे येतो हे त्याच्या स्थितीचे मूळ असते.
होमियोपॅथिक डॉक्टर ज्यावेळी रुग्णाची पूर्ण माहिती लिहून घेत असतात, त्यावेळी कित्येक लोकांना असा प्रश्न पडतोे की, हे सर्व प्रश्न डॉक्टर का विचारत आहेत? आणि याचा आमच्या शारीरिक आजाराशी काय संबंध आहे? याशिवाय लहान मुलांना उपचार देत असतानाही डॉक्टर मुलाच्या आईला तिच्या गरोदरपणातील स्थिती बद्दल विचारत असतात. याचे मुख्य कारण हेच असते की, डॉक्टरांना मूळ कारण किंवा आजाराचे मूळ कारण शोधून काढायचे असते. म्हणून नेहमी डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थित व मुद्देसुद उत्तरे द्या. कारण, हे प्रश्न कधीच निरर्थक नसतात.
याचाच अर्थ जर आपण पाहिला, तर होमियोपॅथी ही अशी एकsystem of medicine आहे की, ज्यामध्ये Root causeचा शोध म्हणजेच रोगाच्या मुळाचा शोध घेतला जातो. आई-वडिलांच्या जनुकीय व संप्रेरक प्रसारित मुळाचा अभ्यास केला जातो. (Genetic Background) व त्यानुसार व्यवस्थित सिद्ध केलेल्या औषधांनीच त्यावर खात्रीचा असा इलाजदेखील केला जातो.
परंतु, दुर्दैवाने या जगामध्ये काही कंपन्यांचे इतके डॉमिनेशन आहे की, इतर कुठल्याही पॅथीला जरी त्या प्रभावी असल्या तरी वरच येऊ देत नाहीत. दर काही दिवसांनी ही मंडळी होमियोपॅथी कशी अवैज्ञानिक आहे, याचीच निरर्थक बोंबाबोंब करत असतात.
अजूनही एक वस्तुस्थिती म्हणजे, जगातील सर्व औषध उपचार पद्धती आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत, हा मोठेपणा न दाखवता अनेक डॉक्टर समाजमाध्यमांवर होमियोपॅथीच्या विरुद्ध लिहायचा वृथा खटाटोप करत राहतात. त्यांनी जर होमियोपॅथीची पुस्तके नीट वाचली तर त्या सर्वांचे गैरसमज आपोआप दूर होतील व रुग्णाला रोगमुक्त करणे, हेच सर्व डॉक्टरांचे मुख्य उद्दिष्ट आहे, ही भावना वाढीला लागेल. होमियोपॅथीचा प्रत्येक नियम हा विज्ञान व निसर्गाचा नियम यांनाच अनुसरून आहे, आता निसर्गाच्याच नियमांना काही लोक मानत नसतील, तर याहून करंटेपण ते काय? (क्रमश:)
डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
९८६९०६२२७६