रुग्णाची आजारी स्थिती म्हणजेच बदललेली स्थिती (altered state of disposition) जाणून घेण्यासाठी त्या वैयक्तिक रुग्णाच्या चैतन्यशक्तीने दाखवलेले विशेष गुणधर्म व लक्षणे जाणून घ्यावी लागतात. एकाच आजाराने त्रस्त अशा दोन वेगळ्या रुग्णांमध्ये त्यांचा वेगळेपणा हा त्यांच्या मानसिक स्थितीमध्ये व general symptoms मध्ये दिसून येतो. कारण, प्रत्येक माणसाची ही लक्षणे पूर्णपणे भिन्न असू शकतात.
मानसिक स्थितीबरोबरच जनरल लक्षणे जसे की खाण्यापिण्याच्या सवयी, खाण्यामधील विशेष आवडीचे व न आवडणारे पदार्थ (general symptoms) वातावरणातील व तापमानातील बदलाचे शरीरावर होणारे परिणाम, तसेच थंड हवा व गरम हवा आणि वातावरण यांचा शरीरावर होणारा परिणाम, शरीराला येणारा घाम व त्याचे काही विशेष गुणधर्म तसेच झोप व त्याची लक्षणे इत्यादी ही लक्षणे किंवा चिन्हे प्रत्यक्ष आजाराच्या जागेशी किंवा लक्षणांशी विसंगत वाटली तरीही ती औषध शोधण्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची असतात. कारण, ही लक्षणे आजाराची नसून आजारी पडलेल्या माणसाची वैयक्तिक लक्षणे असतात.(general symptoms ) उदाहरणच घ्यायचे झाले, तर आपण संधीवात झालेले दोन रुग्ण पाहू. समजा, त्या दोन्ही रुग्णांना ‘ह्युमॅटॉईड आर्थरायटिस’ (general symptoms) झाला असेल, तर त्या दोन्ही रुग्णांना साध्यांमध्ये दुखते, सूज येते. काही अस्थिव्यंग होऊ शकते. त्यांच्या रक्ताच्या तपासणीमध्ये पण काही त्रास दिसून येतो. हे सर्व सारखे असते आणि म्हणूनच त्या समान लक्षणांवरून वरवरचे औषध जर दिले गेले, तर ते औषध फक्त ‘पेनकिलर’ किंवा वेदनाशमनाचे कार्य करते व ते पण फार थोडा वेळ.
म्हणूनच या ठिकाणीच होमियोपॅथी श्रेष्ठ ठरते. कारण, होमियोपॅथीमध्ये फक्त आजाराची लक्षणेच नव्हेत, तर आजारी माणसाची वैयक्तिक लक्षणे जी त्याच्या आजारी चैतन्यशक्तीपासून तयार होत असतात, त्यांच्याही अभ्यास केला जातो व त्यामुळेच आजाराचे मूळ शोधण्यास फायदा होतो. बाहेरून आलेल्या आजाराला माणसाचे शरीर, मन, चैतन्यशक्ती कसे ‘(individualization) ’ करतात, यावर त्या आजाराची लक्षणे प्रदर्शित होत असतात. त्यामुळे होमियोपॅथिक तज्ज्ञ रुग्णाला आजाराच्या जागेबद्दल संवेदनेबद्दल, आजाराच्या वाढण्या व कमी होण्याच्या लक्षणाबद्दल विचारत असतात. त्यामुळे चैतन्यशक्ती कशाप्रकारे प्रतिक्रिया देते ते कळते. दोन रुग्णांची स्वत:ची अशी लक्षणे विभिन्न असू शकतात. म्हणूनच होमियोपॅथीमध्ये एकाच आजाराच्या दोन रुग्णांची औषधे मात्र वेगवेगळी असू शकतात. ज्या रुग्णाची मानसिक स्थिती आणि त्याचबरोबर आजाराची वैयक्तिक लक्षणे जुळून येतात, अशा रुग्णांना औषधाने पूर्णपणे आराम पडतो. म्हणूनच होमियोपॅथिक डॉक्टर जे बारीकसारीक प्रश्न विचारतात, त्याचा काही उद्देश असतो, त्यांना व्यवस्थित माहिती दिली पाहिजे (क्रमशः)
डॉ. मंदार पाटकर
9869062276