शासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करावी

    16-Jun-2025
Total Views | 10


नागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) टप्पा क्रमांक २.० या योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करीत योजनेच्या ऑनलाईन नोंदणीला अधिक गती देण्याची गरज आहे. यासाठी प्रशासनाला लोकप्रतिनिधींनी सहकार्य करण्याचे आवाहन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.


नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात एनएमआरडीए क्षेत्रातील सरपंच व ग्रामसेवकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) टप्पा क्रमांक २.० या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वित्त राज्यमंत्री ॲड . आशीष जयस्वाल, नासुप्र सभापती तथा एनएमआरडीए आयुक्त संजय मीणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, एनएमआरडीए क्षेत्रातील सरपंच, ग्रामसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.


या वेळी चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) टप्पा क्रमांक २.० ही सर्वसामान्यांसाठी योजना शासनाने आणली आहे. त्यामुळे या योजनेची नोंदणी करताना येणा-या अडचणी दूर करण्यात याव्यात. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रशासन, सरपंच व ग्रामसेवकांच्या सहकार्याने नाव नोंदणीस गती देण्याचे आवाहन पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नासुप्र सभापती तथा एनएमआरडीए आयुक्त संजय मीणा यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश सांगितला.

उत्कृष्ट कार्य करणा-या ग्रामपंचायतींचा गौरव

जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) मध्ये उत्कृष्ट कार्य कऱणा-या नऊ ग्रामपंचायतींचा गौरव पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यात मौदा तालुक्यातील वाकेश्वर, कोदामेंढी, सिरसोली,, कामठी तालुक्यातील महालगाव, उमरी, उमरेड तालुक्यातील सुरगाव कुही तालुक्यातील तितुर, सावनेर तालुक्यातील पिपळा डा.ब. तसेच पारशिवनी तालुक्यातील उमरी पाली या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सचिवांना पालकमंत्र्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
मुसळधार पावसामुळे १ चौ.मी क्षेत्रफळातच खड्डे दिवस रात्र विशेष दुरूस्ती पथकाची नेमणूक

मुसळधार पावसामुळे १ चौ.मी क्षेत्रफळातच खड्डे दिवस रात्र विशेष दुरूस्ती पथकाची नेमणूक

भुयारी मार्ग पुलाची क्षती झालेली नाही : एमएसआरडीसी समृद्धी महामार्गावरून सुरक्षित वाहतूक सुरु हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरील इगतपूरी ते आमणे या ७६ किलोमीटरचा चौथा टप्पा दि.५ जून रोजी वाहतुकीस खुला करण्यात आला. महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर ६७०/६८० मध्ये भुयारी मार्ग पूलावर कॉक्रीट पृष्ठभागावर २५ मी.मी.जाडीचा डांबरी चर देण्यात आलेला आहे. दि. २४ जून रोजी मुसळधार पावसामुळे ७ ठिकाणी डांबरी पृष्ठभाग निघून खड्डे पडले होते. या खड्यांचे एकूण क्षेत्रफळ साधारण १ चौ.मी. होते. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121