का झाले गुलाम नबी कॉंग्रेसमधून 'आझाद'? वाचा सविस्तर

    26-Aug-2022
Total Views | 118
घुलाम
 
 
नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या ज्येष्ठ नेत्याने राजीनामा पत्रात राहुल गांधींना टोला लगावला आहे. गांधींवर जोरदार प्रहार करत ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेसचा राजीनामा दिला. आणि काँग्रेसमधून बाहेर पडण्यासाठी राहुल गांधींना जबाबदार धरले. एका ज्वलंत राजीनामा पत्रात आझाद यांनी राहुल गांधींना फाडून दावा केला की पक्षातील सर्व महत्त्वाचे निर्णय त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैयक्तिक सहाय्यक घेतात.
 
पक्षाची सल्लागार यंत्रणा उद्ध्वस्त केल्याचा आरोप त्यांनी राहुल गांधींवर केला आहे. तसेच २०१३ मधील त्यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. "सर्व अनुभवी नेत्यांना बाजूला केले गेले आणि अननुभवी गुंडांची एक नवीन टोळी पक्षाचा कारभार चालवू लागली." असे घुलाम नबी आझाद म्हणाले.
 
गुलाम नबी आझाद यांनी आपल्या परतत हे मुद्दे नमूद करत सोडला पक्ष
 
- राहुल गांधींचे बालिश वर्तन

- सल्लागार समिती प्रक्रिया राहुल यांच्याकडून बंद

- सर्व वरिष्ठ नेत्यांना निर्णय प्रक्रियेतून बाजूला ठेवले

- पक्षाचा कारभार अनुभवशून्य लोकांचा हाती

- सरकारचा अध्यादेश फाडणे हे राहुलच्या अपरिपक्वतेचे ज्वलंत उदाहरण

- राहुलच्या या कृतीमुळे २०१४ मध्ये यूपीएचा पराभव झाला

- राहुल यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले
 
 
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात आझाद यांनी पक्षातून बाहेर पडण्यामागील कारणे म्हणून वरिष्ठ नेत्यांना बाजूला सारणे आणि "अननुभवी गुंडांच्या टोळीचा" वाढता प्रभाव अधोरेखित केला. दि. १६ ऑगस्ट रोजी आझाद यांनी जम्मू आणि काश्मीर काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख पद सोडल्यानंतर त्यांनी थेट पक्षातून देखील राजीनामा दिला आहे. राहुल गांधींवर टीका करत काँग्रेसच्या कमी होत चाललेल्या राजकीय प्रभावासाठी आणि निवडणुकीतील खराब कामगिरीसाठी त्यांच्या अपरिपक्वतेला दोष दिला. “या अपरिपक्वतेचे सर्वात ज्वलंत उदाहरण म्हणजे राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांच्या पूर्ण चकाकीत सरकारी अध्यादेश फाडणे... या ‘बालिश’ वर्तनाने भारत सरकारचा अपमान केला.याच कृतीमुळे मुख्यत्वे कॉंग्रेस २०१४ सालीच डपघाईला गेली.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतराची सवलत नाही - बाबासाहेबांच्या आरक्षणाचा अपमान थांबवाच!

धर्मांतराची सवलत नाही - बाबासाहेबांच्या आरक्षणाचा अपमान थांबवाच!

धर्मांतराच्या जाळ्यात नुकताच ऋतुजा राजगेसारख्या गर्भवती, सुशिक्षित युवतीचा दुर्दैवी अंत झाला. तिच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा छळ करण्यात आला. या घटनेनंतर आता तरी आरक्षणाचा लाभ घेणार्‍या समाजाला जागं होणं अत्यावश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आरक्षण व्यवस्था धर्मांतरासाठी नव्हे, तर सामाजिक न्यायासाठी होती. शतकानुशतके शोषित राहिलेल्या घटकांना सन्मानाने उभं राहता यावं म्हणून होती. मात्र, आज जिहादी आणि ख्रिस्ती मिशनरी वृत्तीने प्रेरित झालेल्या धर्मांतरितांकडून, या व्यवस्थेचा दुरुपयोग ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121