जगन्नाथ रथयात्रेच्या धर्तीवर मणिपूरमध्ये रंगला 'कांग उत्सव'

    28-Jun-2025   
Total Views | 8

मुंबई : ओडिसाच्या जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेला सुरुवात झाली की, मणिपुर येथे कांग उत्सवाची धुमधाम सुरु होते. कांग हा मणिपूरमधील मेईतेई समुदायाद्वारे साजरा केल्या जाणाऱ्या प्रमुख हिंदू सणांपैकी एक आहे. याची रचना साधारण जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेसारखीच असते. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची रथावर बसून यात्रा काढली जाते. कांग उत्सवादरम्यान केले जाणारे विधी सुद्धा जगन्नाथ पुरी रथयात्रेसारखेच असतात.  
 
यंदाचा कांग उत्सवाला २७ जून पासूनच सुरुवात झाला. या शुभ प्रसंगी, मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी इम्फाळ येथील श्री श्री गोविंदाजी मंदिराला भेट दिली, जे राज्याच्या राजधानीत स्थित एक प्रमुख वैष्णव मंदिर आहे. मणिपूरच्या माजी राजघराण्यातील विद्यमान सदस्य आणि भाजप खासदार सानाजाओबा लेशेम्बा यांनीही इम्फाळ मंदिरात कांग उत्सवादरम्यान प्रार्थना केली.
 
कांग उत्सव हे नाव कांग या शब्दावरून आले आहे जे भगवान जगन्नाथ आणि त्यांच्या भावंडांच्या रथाचा संदर्भ देते. देवतांना फुले, फळे आणि तुपात भिजवलेले कापसाचे लहान गोळे ज्याला बारती म्हणतात, ते अर्पण केले जातात. भक्त 'खुबाकिसेई' नावाचे कीर्तन देखील गातात आणि विविध ठिकाणी सामुहिक भोजन व्यवस्थेची सोय केलेली असते. कांग यात्रेची सुरुवात इम्फाळमधील श्री गोविंदाजी मंदिरापासून होते आणि कांगला किल्ल्याच्या पश्चिम प्रवेशद्वारावरील सनाथोंग येथे पोहोचल्यानंतर ती मंदिरात परत जाते.
 
श्री गोविंदाजी मंदिर हे या प्रदेशातील वैष्णव संस्कृतीचे केंद्र मानले जाते, तर मेईतेई भाषेत सनाथोंग म्हणजे 'सोनेरी दरवाजा'. हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कारण मिरवणुकीदरम्यान भाविक रथाभोवती गाणी गातात आणि नृत्य करतात. संपूर्ण उत्सवात स्थानिक मेईतेई समुदाय मोठ्या प्रमाणात सहभागी असतो.

रथयात्रेव्यतिरिक्त, उत्सवाच्या दहा दिवसांत दररोज संध्याकाळी, विविध मंदिरांमध्ये भाविकांकडून जयदेव चोंगबा नावाचे एक अनोखे भक्ती कीर्तन सादर केले जाते. जयदेव चोंगबामध्ये, पुरुष आणि स्त्रिया वेगवेगळे वर्तुळ बनवतात आणि 'पुंग' या मणिपुरी संगीत वाद्यावर नृत्य करतात. त्यानंतर पारंपारिक पोशाखात सजलेल्या महिला आणि तरुणी भक्ती नृत्य सादर करतात.



ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121