आता ‘जुशे’च कसे सुचे?

    13-May-2020   
Total Views | 111

 mahua moitra_1  




जुशेवरुन मोदींमध्ये कोरियाच्या माजी हुकूमशहाची झलक दिसलेल्या मोइत्राबाईंना कदाचित स्वत:च्याच पक्षाध्यक्षांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या मा, माटी, मानुषच्या हाकेचा विसर पडलेला दिसतो, अन्यथा मोदींच्या आत्मनिर्भरतेची अशी थट्टा त्यांनी मांडली नसती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंगळवारच्या संबोधनानंतर प्रथेप्रमाणे पुरोगामी, विरोधक आणि डावे त्यांच्यावर तुटून पडले. ज्यांनी इतकी वर्षे भ्रष्टाचार करुन देशाचे लाखो कोटी गिळंकृत केले, ते या २०लाख कोटींच्या पॅकेजवर निर्बुद्धपणे शंका उपस्थित करु लागले. अशाच एक मोदीविरोधकांच्या गळ्यातल्या ताईत म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या धडाडीच्या खासदार महुआ मोइत्रा... ताईत अशासाठी की, या बाई फाडफाड इंग्रजीमध्ये संसदेत आणि बाहेरही तावातावाने सरकार विरोधी गरळ ओकतात आणि पक्षाध्यक्षा ममतादीदींना खूश ठेवतात. असो. तर या अतिअभ्यासू मोइत्राबाईंनी मोदींच्या आत्मनिर्भर’, ‘स्वदेशीच्या नार्‍याची तुलना केली, ती थेट उत्तर कोरियाचे माजी हुकूमशहा किम जोंग इल यांच्या जुशेया संकल्पनेशी. जुशेहा जर्मनी, जपानी भाषेतून नंतर कोरियन भाषेत किम जोंग इल (किम जोंग उन याचे वडील) यांनी प्रचलित केलेला शब्द. त्याचा शब्दश: अर्थही होतो सेल्फ रिलायन्सअर्थात आत्मनिर्भरताकिंवा स्वयंपूर्णता.मोइत्राबाईंनी हा शब्द अचूक हेरला असला तरी त्यांच्या या संदर्भातील खोचकपणा ही अतिशयोक्तीच म्हणावी लागेल. केवळ या एका संकल्पनेचा टेकू धरुन उत्तर कोरियाच्या हुकूमशहाची झलक मोइत्राबाईंना मोदींमध्ये दिसत असेल, तर त्यांनी कोरोनानंतर जरा उत्तर कोरियात चार दिवस वास्तव्य करुन यावेच. आपण केवळ तृणमूलच्या नेत्या नव्हे, तर या सार्वभौम लोकशाही देशाच्या संसदेत खासदारही आहोत, याचेही भान या मोइत्राबाईंना राहिले नाही. उत्तर कोरियाच्या भूतकाळ आणि वर्तमानाविषयीही वेगळे सांगायला नको. त्यामुळे त्या देशातील शासनप्रणालीची आणि भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीप्रधान देशाची, त्यांच्या नेत्यांची अशी तुलनाच करणे मुळात गैर. पण, मोदीद्वेषाने पछाडलेल्यांना कावीळ झाल्याने त्यांना अख्खे जग हे पिवळेच दिसते, त्यातलाच हा प्रकार. आपली बुद्धिमत्ता, आपला अभ्यास, अशी संशोधक वृत्ती सकारात्मक आणि देशाच्या भल्यासाठी वापरण्याऐवजी वायफळ तुलना करुन यांना नेमके काय सुचवायचे आहे? दोन परस्पर विरोधी शासनव्यवस्था असलेल्या प्रणालींमध्ये जर तफावत असू शकते, तर त्यामध्ये एखादा सामायिक धागा असल्यास, सूतावरुन स्वर्ग गाठण्याची गरजच काय? तेव्हा, जग आंधळे नाही. तुमच्या या परसेप्शन वॉरला जनता आता भुलणारी नाही, हे ध्यानात घ्यावे. 


स्वदेशी’ भारताच्या रक्तातच!


 

जुशेवरुन मोदींमध्ये कोरियाच्या माजी हुकूमशहाची झलक दिसलेल्या मोइत्राबाईंना कदाचित स्वत:च्याच पक्षाध्यक्षांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या मा, माटी, मानुषच्या हाकेचा विसर पडलेला दिसतो, अन्यथा मोदींच्या आत्मनिर्भरतेची अशी थट्टा त्यांनी मांडली नसती. एकवेळ स्वदेशीची संकल्पना नवीन नाही, जुनीच आहे, फार फार तर काय काँग्रेसचीच देण आहे, वगैरे राजकीय शेरेबाजी एकवेळ समजूही शकतो. पण नाही, मोइत्राबाईंची मोठी झेप. त्यांना हे सगळे स्वदेशी वगैरे तत्त्वज्ञान तुच्छ, निम्नस्तरीय वाटत असावे. म्हणूनच मग त्यांची गाडी थेट उत्तर कोरियावर घसरली. म्हणा, मोदी या असल्या टीकांना भीकही घालत नाही. कारण, किम जोंग इलच काय, तर मोदींची तुलना चक्क क्रूरकर्मा हिटलरशी करण्यापर्यंतही अनेकांची मजल गेलीच आहे. पण, बुद्धिमान मोइत्रा बाईंनी हे समजून घेतले पाहिजे की, उत्तर कोरियाने जुशेचा मार्ग स्वीकारणे हा तेथील राजकीय अपरिहार्यतेचा आणि सत्तालोलुपतेचा परिपाक होता. भारतात मात्र कदापि तशी स्थिती नाही. किम जोंग इल यांनी जुशेची तीन मूलभूत तत्त्वे १९५५ साली त्यांच्या भाषणात सांगितली होती. ती म्हणजे, ‘जाजू’, ‘जरीपआणि जावी.’ ‘जाजूअर्थात राजकीय स्वातंत्र्य, ‘जरीपअर्थात आर्थिक स्वयंपूर्णता आणि जावीम्हणजे संरक्षण क्षेत्रातील स्वयंसिद्धता. या त्रयींवरच उ. कोरियाने सारी ऊर्जा केंद्रित केली आणि एकाधिकारशाहीच्या प्रणालीमुळे ही उद्दिष्टे बर्‍यापैकी साध्यही केली. सुरुवातीला इल यांची विचारसरणीही मार्क्ससिस्ट-लेनिनिस्ट विचारप्रवाहाचाच एक भाग असल्याचे म्हटले गेले, पण इल यांनी कोरियाच्या अनुषंगाने या तत्त्वांमध्ये मूलभूत बदलही केले. तेव्हा, मोइत्राबाईंनी खरंतर एवढ्या दूर कोरियापर्यंत याची पाळेमुळे खणताना, जरा आपल्याच देशाच्या इतिहासावर नजर टाकली असती, तर कोरियाच्याही फार पूर्वीपासून आपण स्वदेशीचा पुरस्कार केला आहे, हे त्यांच्या लक्षात आले असते. दादाभाई नौरोजी, योगी अरविंद, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, बिपीन चंद्र पाल, लाल लजपतराय, बाबू गेनू आणि अशा कित्येक स्वातंत्र्यसेनानींनी स्वदेशीचा या भारतभूमीला मंत्र दिला. विदेशी कपड्यांची होळी पेटवली. ब्रिटिशांना जेरीस आणले. तेव्हा, मोइत्रासारख्यांनी विलायती अक्कल पाजळण्यापेक्षा स्वदेशीइतिहासाचीच जरा उजळणी करावी.

 






विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121