फडणवीसांचे 'माजी मुख्यमंत्रीपद' अल्पकाळ : सरकार्यवाह भैय्याजी जोशी

    22-Feb-2020
Total Views | 213


bhaiyyaji joshi RSS_1&nbs



नागपूर
: देवेंद्र फडणवीस यांच्या वाट्याला आलेले विरोधी पक्षनेतेपद हा फार दिवसांचा विषय नाही. तसेच माजी मुख्यमंत्रिपदही त्यांच्या जीवनात अल्पकाळ असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले. नागपुरातील साधना सहकारी बँकेच्या नूतन वास्तूच्या लोकार्पणप्रसंगी जोशी बोलत होते.


ते पुढे म्हणाले, लोकशाहीमध्ये सरकार येत-जात असते, मात्र लोकशाहीमध्ये सरकारची खूप मोठी शक्ती असते आणि ही शक्ती लोकच निर्माण करतात. लोकशाही व्यवस्थेत काही गोष्टी कमी-अधिक होत असतात, परंतु देशाचा सामान्य नागरिक लोकशाही बळकट करण्याचे कार्य करीत राहतो. सामान्यांची हीच कृती देशाची खरी शक्ती आहे. सामान्य नागरिक जागरूक असला की लोकशाही यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले.


महाविकासआघाडीचे सरकार कधीही कोसळू शकते असा अंदाज भाजपच्या नेत्यांकडून वारंवार व्यक्त होत आहे. अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले. कालच दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन केले त्यामुळे या भेटीनंतर शिवसेनेचा  नागरिकत्व सुधारणा कायद्याला असणारा विरोधाचा सूर मावळल्याचेही दिसून आले.
अग्रलेख
जरुर वाचा
२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अनुभव घेतोय. कोणीही, कधीही, कुठेही जाऊ शकतो, मनासारखे (झेपेल त्याप्रमाणे) काहीही करू शकतो. मग विषय कोणताही असो. ‘कोरोना’चा असो किंवा चिनी घुसखोरीचा, शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा विपर्यास करण्याचा, दि. २६ जानेवारी रोजीच्या राजधानीत घातलेल्या धुडगुसाचे निर्लज्ज समर्थन करण्याचा, खलिस्तानचे समर्थन करण्याचा, ‘वॅसिन’च्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचा, स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर निर्लज्जपणे केंद्र सरकारवर फोडण्याचा, केतकीच्या कवितेवरून तिला चार महिने तुरुंगवारी घडविण्याचा आणि मोदींना ..

पवनार-पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग होणारच !

पवनार-पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग होणारच !

राज्य सरकारकडून २० हजार ७८७ कोटींची तरतूद १२ जिल्ह्यांना जोडणारा ८०२ किलोमीटरचा महामार्ग नागपूर ते गोवा १८ तासांचा प्रवास ८ तासांत महाराष्ट्रात धार्मिक यात्रा करण्याची थोर परंपरा असून जनसामान्य त्यानिमित्याने मोठ्या प्रमाणात पर्यटन करतो. या पर्यटनामुळे आर्थिक उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सर्व धार्मिक स्थळांना जोडणारा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याच्या पूर्वेकडील वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून पश्चिमेकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121