पुढील १० वर्षात, भारतामध्ये ₹२.५ ते ₹३ लाख कोटी भुयारी मार्ग प्रकल्पांची उभारणी करण्याची योजना – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एमआयटी-डब्ल्यूपीयू मध्ये घोषणा

Total Views | 31

पुणे, भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. याचाच एक भाग म्हणून पुढील १० वर्षांत ₹२.५ ते ₹३ लाख कोटींच्या टनेल (भुयारी मार्ग) प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांनी दिली. ते एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU), पुणे येथे आयोजित ‘सस्टेनेबल टनेलिंग फॉर बेटर लाईफ’ या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, "भारत पायाभूत सुविधांच्या सुवर्णयुगात प्रवेश करत आहे. टनेलिंग केवळ प्रवासासाठी नाही, तर सुरक्षा, पर्यावरणीय संवर्धन आणि टिकावू विकासासाठीही अत्यंत गरजेचे आहे. आपण या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याचा निर्धार केला पाहिजे. टनेल बांधणीचा खर्च कमी करताना गुणवत्ता कायम ठेवावी लागेल. यासाठी CNG, इथेनॉल, हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक इंधनांचा वापर वाढवणे गरजेचे आहे. जुन्या टनेलिंग मशिन्सचे पुनर्निर्माण करणे, युरोपातील ऑस्ट्रिया, नॉर्वे आणि स्पेनमधून वापरलेल्या यंत्रणा आयात करणे आणि पुढे जाऊन भारतातच त्या उत्पादनात आणणे, ही दिशा असली पाहिजे. भारतात भूगर्भ रचना वेगवेगळी असल्याने संशोधन आणि प्रशिक्षण अत्यंत गरजेचे आहे. यासाठी माझं मंत्रालय यंत्रसामग्री, प्रशिक्षण आणि आवश्यक संसाधनांसाठी सहकार्य करायला तयार आहे."

या कार्यशाळेत भारत, युरोप, यूके आणि यूएस येथील तज्ज्ञ सहभागी झाले असून इंटरनॅशनल टनेलिंग असोसिएशन (ITA-CET) च्या सहकार्याने हे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात सेंटर ऑफ एक्ससिल्लेन्स फॉर टनेलिंग अँड अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन (Center of Excellence for Tunnelling and Underground Construction) चे उद्घाटन करण्यात आले. हे केंद्र सँडविक (Sandvik) आणि टाटा प्रोजेक्ट्स लि. (Tata Projects Ltd.) यांच्या सहकार्याने उभारण्यात आले असून, यात Tunnel Monitoring Laboratory आणि Drilling & Blasting Laboratory यांचा समावेश आहे.

अरनॉल्ड डिक्स, आंतरराष्ट्रीय टनेलिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष, यांनी सांगितले, "अनेक वेळा डिझाईन केलेल्या गोष्टी प्रत्यक्षात उतरवताना कामगार योग्य प्रशिक्षणाअभावी धोका पत्करतात. हे सेंटर ऑफ एक्ससिल्लेन्स जागतिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणार आहे. MIT-WPU मध्ये मी विद्यार्थ्यांमध्ये आणि प्राध्यापकांमध्ये एक कौटुंबिक नातं अनुभवतो. दोन वर्षांपूर्वी येथे शिकलेले विद्यार्थी आज देशाची पायाभूत घडण घडवत आहेत – हे विशेष कौतुकास्पद आहे.”

कार्यक्रमात डॉ. विश्वनाथ कराड, संस्थापक, MIT-WPU, यांनी आपल्या अध्यात्मिक दृष्टीकोनातून विचार मांडताना सांगितले, "फेसबुक, AI सारखी तंत्रज्ञानप्रगती झाली असली तरी खरी शांतता निर्माण करणारे उपकरण अजून विकसित झालेले नाही. मी एक अभियंता असूनही माझा विश्वास आहे की – ‘बॉडी, ब्रेन, माइंड आणि स्पिरिट’ या चार शक्तींचा समतोल म्हणजेच खरा प्रगतीचा मार्ग आहे. याच माध्यमातून आपण आत्मचिंतन करून ‘कॉन्शसनेस’ समजून घेऊ शकतो – जी अखेरची सत्यता आहे.”

कार्यक्रमात डॉ. राहुल कराड, कार्यकारी अध्यक्ष, MIT-WPU, म्हणाले: “Sandvik आणि Tata Projects यांच्या सहकार्याने सुमारे ₹२ कोटी मूल्याची उपकरणे या केंद्रात बसवण्यात आली आहेत. यामुळे उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातला दुवा अधिक घट्ट होईल आणि आपला देश टनेल अभियांत्रिकीसारख्या विशेष क्षेत्रात आघाडीवर येईल.”

या कार्यशाळेत Building Information Modeling (BIM), लेझर स्कॅनिंग, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान यासह हिमालयासारख्या दुर्गम भूभागांतील बांधकामासाठी आवश्यक कौशल्यांवर चर्चा झाली.

यावेळी विद्यापीठाने टनेलिंग अवार्ड्स २०२५ (MIT-WPU Tunnelling Awards 2025) चे आयोजन करण्यात आले. यात TATA Projects Ltd., L&T, नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेसवे लिमिटेड (NMSCEL), J. Kumar Infra Projects Ltd. यांना त्यांच्या कामाबद्दल विविध पुरस्कार देण्यात आले.

तसेच भुयारी मार्ग अभियांत्रिकी क्षेत्रात अत्युच्च योगदान दिल्याबद्दल श्री. एस के. धर्माधिकारी यांना "लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार" प्रदान करण्यात आला. "त्यांचे अनुभव आणि मार्गदर्शनामुळे भारतातल्या पुढच्या पिढीच्या टनेल अभियंत्यांना प्रेरणा मिळाली आहे," असे आयोजकांनी नमूद केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी पेपर प्रेसेंटेशन देखील झाले, जिथे तरुण अभियंत्यांनी आपल्या नवकल्पना मांडल्या. या संपूर्ण उपक्रमाचे उद्योग, सरकार आणि शिक्षण संस्था यांच्यामध्ये भक्कम समन्वय साधणारे एक उत्तम उदाहरण म्हणून कौतुक करण्यात आले.

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121