भुजबळांनी मदत करण्याचा प्रश्नच नाही : जयंत पाटील

    24-May-2018
Total Views | 15

नरेंद्र दराडे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया


नाशिक विधान परिषदचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी छगन भुजबळांच्या पाठींब्यासंबंधी केलेल्या वक्तव्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसने नाकारले असून भुजबळ यांनी दराडेंना पाठींबा देण्याचा अथवा मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. राज्य विधान परिषद निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी कोकण मतदारसंघामधून विजयी झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचे विजयीसाठी अभिनंदन देखील त्यांनी यावेळी केले.

विधान परिषद निवडणुकांमधील पाच पैकी तीन जागा राष्ट्रवादीने लढवल्या तर तीन जागा या काँग्रेस पक्षाने लढवल्या होत्या. यातील नाशिक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे मुळातच संख्याबळ हे कमी होते, असे ते म्हणाले. परंतु तरी देखील सहाणे यांनी प्रयत्न केले. पण अपुऱ्या संख्याबळामुळे राष्ट्रवादीला यश आले नाही. त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, आणि राहता राहिला भुजबळांच्या समर्थनाचा प्रश्न तर कोण कोणाची भेटी घेतो यावर मतदान अवलंबून नसते. त्यामुळे भुजबळ साहेबांनी दराडे यांना मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे म्हणत त्यांनी आपली चर्चा थांबवली.

आज जाहीर झालेल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये नाशिकमधून शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे हे विजयी झाले आहेत. विजयी झाल्यानंतर दराडे यांनी आपल्याला पाठींबा दिलेल्या नेत्यांचे आभार मानतात, भुजबळ यांचा देखील आपल्या विजयात हातभार आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वीच भुजबळांच्या सुपुत्रांनी उद्धव यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे भुजबळ यांच्यासंबंधी वेगवेगळ्या चर्चना उधान आले होते.
अग्रलेख
जरुर वाचा
२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अनुभव घेतोय. कोणीही, कधीही, कुठेही जाऊ शकतो, मनासारखे (झेपेल त्याप्रमाणे) काहीही करू शकतो. मग विषय कोणताही असो. ‘कोरोना’चा असो किंवा चिनी घुसखोरीचा, शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा विपर्यास करण्याचा, दि. २६ जानेवारी रोजीच्या राजधानीत घातलेल्या धुडगुसाचे निर्लज्ज समर्थन करण्याचा, खलिस्तानचे समर्थन करण्याचा, ‘वॅसिन’च्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचा, स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर निर्लज्जपणे केंद्र सरकारवर फोडण्याचा, केतकीच्या कवितेवरून तिला चार महिने तुरुंगवारी घडविण्याचा आणि मोदींना ..

पवनार-पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग होणारच !

पवनार-पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग होणारच !

राज्य सरकारकडून २० हजार ७८७ कोटींची तरतूद १२ जिल्ह्यांना जोडणारा ८०२ किलोमीटरचा महामार्ग नागपूर ते गोवा १८ तासांचा प्रवास ८ तासांत महाराष्ट्रात धार्मिक यात्रा करण्याची थोर परंपरा असून जनसामान्य त्यानिमित्याने मोठ्या प्रमाणात पर्यटन करतो. या पर्यटनामुळे आर्थिक उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सर्व धार्मिक स्थळांना जोडणारा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याच्या पूर्वेकडील वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून पश्चिमेकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121