मोठी बातमी! अभिनेता दिनो मोरियाच्या घरी ईडीची छापेमारी

    06-Jun-2025
Total Views | 24
 
Dino Morea
 
मुंबई : बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया याच्या मुंबईतील घरी ईडीने छापेमारी केली आहे. मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी ही छापेमारी सुरु असून शुक्रवार, ६ जून रोजी सकाळी ८ वाजतापासून त्याच्या घरी छापेमारी सुरु आहे. दिनो मोरिया हा उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो. 
 
मिठी नदी स्वच्छता घोटाळ्यात आतापर्यंत १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदम याचे अभिनेता दिनो मोरिया आणि त्याच्या भावाशी फोनवरून संभाषण झाल्याचे आढळल्याने त्या दोघांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. तसेच या तिघांमध्ये अनेकदा आर्थिक व्यवहार झाल्याचाही माहिती उघड झाली आहे.
 
दरम्यान, मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सलग तीन दिवस अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो यांची चौकशी केली होती. त्यानंतर आता त्याच्या घरी ईडीने छापेमारी सुरु केली आहे. यासोबतच मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदमच्या घरीदेखील ईडीने छापा टाकला आहे. त्याच्या वरळीतील घरी ईडीने छापेमारी सुरु केली आहे. तसेच कांदिवली येथील जय जोशी याच्या घरीदेखील ईडीने छापा टाकला आहे.
 
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अनुभव घेतोय. कोणीही, कधीही, कुठेही जाऊ शकतो, मनासारखे (झेपेल त्याप्रमाणे) काहीही करू शकतो. मग विषय कोणताही असो. ‘कोरोना’चा असो किंवा चिनी घुसखोरीचा, शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा विपर्यास करण्याचा, दि. २६ जानेवारी रोजीच्या राजधानीत घातलेल्या धुडगुसाचे निर्लज्ज समर्थन करण्याचा, खलिस्तानचे समर्थन करण्याचा, ‘वॅसिन’च्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचा, स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर निर्लज्जपणे केंद्र सरकारवर फोडण्याचा, केतकीच्या कवितेवरून तिला चार महिने तुरुंगवारी घडविण्याचा आणि मोदींना ..

पवनार-पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग होणारच !

पवनार-पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग होणारच !

राज्य सरकारकडून २० हजार ७८७ कोटींची तरतूद १२ जिल्ह्यांना जोडणारा ८०२ किलोमीटरचा महामार्ग नागपूर ते गोवा १८ तासांचा प्रवास ८ तासांत महाराष्ट्रात धार्मिक यात्रा करण्याची थोर परंपरा असून जनसामान्य त्यानिमित्याने मोठ्या प्रमाणात पर्यटन करतो. या पर्यटनामुळे आर्थिक उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सर्व धार्मिक स्थळांना जोडणारा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याच्या पूर्वेकडील वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून पश्चिमेकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121