‘ऑपरेशन सिंदूर’मुळे एक गोष्ट भारताच्या लक्षात आली, ती म्हणजे दहशतवादाविरोधी लढाई भारताला एकट्यालाच लढावी लागणार आहे. भारत हा जागतिक स्तरावरील ‘ब्रिस’, ‘क्वॉड’ वगैरे अनेक गटांचा सदस्य आहे. पण, या गटांतील कोणतेही देश या दहशतवादाविरोधी लढ्यात भारताच्या बाजूने उभे राहिलेले नाहीत. ‘जी-७’ या बड्या देशांच्या आगामी बैठकीचे तर जगातील चौथी अर्थव्यवस्था असलेल्या भारताला निमंत्रणच देण्यात आलेले नाही.
ऑपरेशन सिंदूर’मुळे भारताला स्वतःची आणि बदललेल्या जगाची नव्याने ओळख होत आहे. भारतीय सशस्त्रदलांना आपल्या ताकदीची आणि क्षमतेची योग्य कल्पना असली, तरी सामान्य भारतीय त्यापासून बहुतांशी अनभिज्ञच होता. भारताकडे अनेक ताकदवान अस्त्रे-शस्त्रे आहेत याची सर्वसामान्य माणसाला कल्पना असली, तरी त्यांचा वापर किती प्रभावीरित्या केला जाऊ शकतो, याची कल्पना कोणालाच नव्हती. तसेच, भारताचे लढाऊ वैमानिक, सैनिक आणि नौदलातील जवान हे किती उत्कृष्ट कुशल आणि व्यावसायिक आहेत, तेही या संघर्षाने स्पष्ट केले. भारत हा निःसंदिग्धपणे जागतिक लष्करी महासत्ता म्हणून उदयाला आला आहे पण, हीच गोष्ट त्याच्या विरोधातही जात आहे.
भारताच्या या लष्करी सामर्थ्याची खरी कल्पना जगालाही नव्हती, हेही या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दिसून आले. भारताने गेल्या दहा वर्षांत अनेक महाग, पण तितकीच प्रभावी अस्त्रे आणि शस्त्रे विकत घेतली पण, त्यांचा वापर करण्याची संधीच मिळत नव्हती. त्यामुळे ही शस्त्रास्त्रे किती भेदक आणि प्रभावी आहेत, तेही ‘ऑपरेशन सिंदूर’मुळेच दिसून आले. ‘ब्राह्मोस’, ‘आकाश’, ‘स्काल्प’ वगैरे अशा अनेक अस्त्रांमुळे शत्रूचे किती जबरदस्त नुकसान होते आणि काही दिवसांतच शत्रू गुडघ्यावर येतो, हे पाहून प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने फुलून येईल. हे लष्करी सामर्थ्य प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असले, तरी जगाच्या दृष्टीने त्यातही प्रस्थापित महासत्तांच्या दृष्टीने ती एक धोयाची घंटाच होती. कारण, भारताकडे ही अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आहेत इतकेच नव्हे, तर त्यांचा अचूक आणि योग्य प्रमाणात वापर करण्याची क्षमता आणि हिंमतही भारतीय लष्करी आणि मुलकी नेतृत्वाकडे आहे, ही गोष्ट प्रस्थापित महासत्तांसाठी आव्हानात्मक आहे. एक प्रकारे भारताने या प्रस्थापित सत्तांना दिलेले ते आव्हानच आहे. भारतासारखा देश आपल्या तोडीस तोड बनू नये, म्हणून अमेरिकेसारखा देशही प्रयत्न करीत होता, मग चीन आणि युरोपीय देशांची गोष्ट सोडाच. कारण, आजच्या घडीला अमेरिका, रशिया आणि चीन हे तीनच देश खर्या अर्थाने लष्करी महासत्ता आहेत. आता ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारतही या तीन देशांइतकाच लष्करीदृष्ट्या सामर्थ्यशाली देश झाल्याचे स्पष्ट झाले. हीच गोष्ट अन्य तीन महासत्तांच्या मनात सलत आहे. यात रशियाचा किंचित अपवाद करता येईल.
भारताला आपल्या पायाखाली दाबून ठेवण्यासाठी केवळ चीनच उत्सुक नव्हता, तर अमेरिका आणि काही युरोपीय देशही प्रयत्नशील होते. पण, यापुढे भारताची कुरापत काढणे शय नाही, त्याची भलतीच महाग किंमत मोजावी लागेल, हीच गोष्ट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केल्याने, या देशांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. चीन आज गप्प आहे, त्यामागे भारताची ही बदललेली भूमिका आहे. त्यातच लष्करी संघर्षाला तोंड देतानाही भारताची अर्थव्यवस्था नव्या जोमाने प्रगती करीत असल्याचे पाहून, चीनला धक्काच बसला आहे. कारण, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या मालावर भरमसाठ शुल्क आकारून, त्याच्या अर्थव्यवस्थेला तडाखा दिला आहे. आर्थिक फटका बसलेला चीन आज लष्करी कारवाई करून, आपल्या खर्चात अधिक वाढ करण्याच्या मनःस्थितीत नाही. म्हणून त्याने पाकिस्तानला पुढे करून भारताला लष्करी युद्धात गुंतविण्याचा प्रयत्न केला. पण, भारताच्या अत्यंत कुशल सशस्त्रदलांनी कारवाईने पाकिस्तानचा दोन दिवसांत पाचोळा करून टाकला. ही लष्करी कारवाई थांबविण्याची विनंती पाकिस्तानला नव्हे, तर अमेरिकेला करावी लागली. कारण, भारताच्या या लष्करी कारवाईत अमेरिकेचे सामरिक हितसंबंध धोयात आले.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने पाकिस्तानच्या ज्या लष्करी ठिकाणांवर हल्ले केले, त्यात कैराना टेकडी हे एक ठिकाण. या टेकडीतील भुयारांमध्ये पाकिस्तानने आपली काही अण्वस्त्रे लपवून ठेवल्याची माहिती भारताकडे होती. सरगोधाजवळील या टेकडीवर हल्ला करून भारताने या भुयारांची तोंडेच उद्ध्वस्त केल्याची चर्चा आहे. पाकिस्तानने आपल्याकडील अण्वस्त्रांचे भांडवल करून जगाला वेठीला धरले होते. भारतालाही तो देश अण्वस्त्रांची धमकी देत होता. परंतु, आपण मनात आणले, तर तुमची अण्वस्त्रे उडवून देऊ शकतो, हा इशारा पाकिस्तानला देण्यासाठी भारताने या टेकडीवर हल्ला केला असल्याचे म्हटले जाते. पण, घडले भलतेच. त्या हल्ल्यात आतील अण्वस्त्रे निकामी झाल्याचे लक्षात येताच अमेरिकेची घाबरगुंडी उडाली. कारण, ही अण्वस्त्रे वास्तविक पाकिस्तानची नसून ती अमेरिकेची होती असे म्हटले जाते. पाकिस्तानकडे स्वतःची अशी अण्वस्त्रेच नाहीत. जी आहेत, ती अमेरिकेच्या मालकीची असून, अमेरिकेने ती पाकिस्तानात सुरक्षित दडवल्याचीही चर्चा होतीच. ’ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला इशारा देता देता, भारताने अमेरिकेचीच नाजूक नस नकळत दाबली.
भारताच्या या कारवाईने अमेरिकेचे गुपित तर उघड झालेच पण, भारताच्या लष्करी ताकदीचा अंदाजही अमेरिकेला आला. भारताशी मैत्रीच्या कितीही गोड गोड गोष्टी अमेरिका वरकरणी करीत असली, तरी भारताचे सामर्थ्यशाली होणे तिला खुपते हे आता उघड गुपीत आहे. चीनचे आव्हान सांभाळताना अमेरिकेची दमछाक झाली असून, आता भारत हा नवा प्रतिस्पर्धी तिला नकोसा आहे. कारण, भारत हा कोणत्याच देशापुढे झुकत नाही. तो आपले हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठी कसलीही तडजोड करीत नाही. अमेरिकेच्या इशार्यावर नाचण्याची त्याला गरज नाही. कारण, त्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. त्यामुळे आपल्याला न जुमानणारा ताकदवान देशच अमेरिकेला नको आहे. म्हणूनच भारताशी संघर्ष सुरू असतानाही अमेरिकेने, ‘आयएमएफ’तर्फे पाकिस्तानला कोटी डॉलर्सचे कर्ज देऊ केले. त्याचा विनियोग कुठे होणार आहे, हे सार्या जगाला ठाऊक आहेच. तरीही ते त्याला मिळाले, याचे कारण भारताला युद्धसदृश्य स्थितीत सतत गुंतवून ठेवणे, हाच यामागचा अमेरिकेचा अंतःस्थ हेतू. यापुढे इस्रायलप्रमाणेच भारतालाही दहशतवादाची लढाई एकट्यानेच लढावी लागणार आहे. जागतिक राजकारणाच्या पटावर सामर्थ्यशाली बनल्याची ही किंमत आहे. ती भारताला एकट्याच्या बळावर चुकवावी लागणार हे निश्चित!
राहुल बोरगांवकर