अंतराळाचे आकर्षण मानवाला सुरुवातीपासूनच होते आणि आजही आहे. यासाठीच विविध मोहिमा जगभर आखल्या जातात. अंतराळातील मोहिमांसाठी भारताची ‘इस्रो’ ही संस्था म्हणजे आदर्शत्वाचे उत्तम उदाहरण ठरावे! जगाला अचंबित करणार्या अनेक मोहिमा ‘इस्रो’ने लीलया पूर्ण करून अंतराळ क्षेत्रातील भारताची क्षमता सिद्ध केली आहे. तीच परंपरा पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा राकेश शर्मा यांच्यानंतर शुभांशु शुक्ला हे अंतराळात झेपावणार आहेत. त्यांच्या या मोहिमेचा आणि त्यासाठीच्या तयारीचा घेतलेला आढावा...
भारतीय अंतराळप्रेमींना अभिमानाचा क्षण देणारी आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारी ऐतिहासिक बातमी नुकतीच जाहीर झाली. ती म्हणजे, राकेश शर्मा यांच्यानंतर दुसरे भारतीय अंतराळवीर म्हणून शुभांशु शुला यांची निवड झाली आहे. ते ‘एक्जिओम-४’ या खासगी अंतराळ मोहिमेंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर झेपावणार आहेत. हा क्षण केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीच्या सहकार्याने उभारलेल्या अंतराळ प्रवासाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे.
विंग कमांडर राकेश शर्मा हे ‘सोयूझ टी-११’ अंतराळयानातून रशियन मिशनसह अंतराळात झेपावले आणि भारतीय अंतराळयात्रेचा इतिहास १९८४ साली लिहिला गेला. त्यांच्या ‘सारे जहाँ से अच्छा’ या विधानाने भारताच्या अंतराळ प्रवासाची सुरुवात एका अभिमानाच्या क्षणाने झाली होती मात्र, त्यानंतर चार दशके उलटून गेली, तरी कोणीही भारतीय अंतराळवीर या यादीत सहभागी होऊ शकला नव्हता. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता शुभांशु शुला यांच्या रूपाने हा पल्ला गाठला जात आहे.
शुभांशु शुला यांचा जन्म उत्तर प्रदेशातल्या कानपूर जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातला. त्यांनी अभियंता म्हणून सुरुवात केली आणि नंतर भारतीय हवाईदलात वैमानिक अधिकारी म्हणून कार्यरत राहिले. लढाऊ विमानांचे अनुभव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि तांत्रिक कौशल्य यांमुळे त्यांची निवड अंतराळवीर प्रशिक्षणासाठी झाली. त्यांनी ‘एक्जिओम स्पेस’ या अमेरिकास्थित खासगी अंतराळ संस्थेच्या मोहिमेसाठी अर्ज केला. कठोर चाचण्या पार केल्यानंतर ‘एक्जिओम-४’ मोहिमेसाठी, अंतिम अंतराळवीर म्हणून त्यांची निवड झाली.
‘एक्जिओम-४’ ही एक वैश्विक स्तरावरील खासगी अंतराळ मोहीम आहे, जी अमेरिकेतील ‘एक्जिओम स्पेस’ या खासगी अंतराळ कंपनीकडून राबवली जात आहे. ही मोहीम ‘नासा’ आणि ‘स्पेसएस’ यांच्या सहकार्याने पार पडणार असून, ती आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारी ‘एक्जिओम स्पेस’ची चौथी मानवी मोहीम आहे. ‘एक्जिओम-४’ मोहिमेचा मुख्य उद्देश व्यावसायिक पातळीवर अंतराळ संशोधन करणे, विविध देशांतील वैज्ञानिक आणि वैद्यकीय प्रयोगांना प्रोत्साहन देणे, तसेच भविष्यातील खासगी अंतराळ स्थानकांच्या उभारणीसाठी अनुभव गोळा करणे हा आहे. या मोहिमेच्या माध्यमातून अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात खासगी कंपन्यांची भूमिका अधिक ठळक होत आहे.
‘एक्जिओम-४’ मोहिमेसाठी ‘स्पेसएस’चे ‘क्रू ड्रॅगन’ अंतराळयान वापरण्यात येणार आहे. हे यान चार अंतराळवीरांना कक्षेत घेऊन जाईल आणि ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर दहा ते १४ दिवस राहणार आहेत. तिथे ते सूक्ष्म गुरुत्वीय परिस्थितीत विविध प्रयोग, जैवतंत्रज्ञान, औषधनिर्मिती, अंतराळातील मानवशरीराचे वर्तन, पर्यावरणीय निरीक्षण आणि शाश्वत तंत्रज्ञानविकास यांसारख्या बाबींवर काम करतील.
या मोहिमेतील अंतराळवीरांची निवड ही केवळ त्यांचे वैयक्तिक शौर्य नव्हे, तर त्यांच्या तांत्रिक कौशल्य, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि विशिष्ट प्रयोगांमध्ये योगदान देण्याच्या क्षमतेवर आधारित आहे. ‘एक्जिओम स्पेस’चा दूरगामी हेतू म्हणजे २०३० सालानंतर जेव्हा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सेवेतून निवृत्त होईल, तेव्हा त्याऐवजी ‘एक्जिओम स्थानक’ या नावाने खासगी अंतराळ स्थानक कार्यान्वित करणे. ‘एक्जिओम-४’ आणि यापूर्वीच्या ‘एएस-१’, ‘एएस-२’ आणि ‘एएस-३’ या मोहिमा याच उद्दिष्टाचा भाग आहेत. या मोहिमांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे, खासगी क्षेत्राला अंतराळ संशोधनात अधिक सहभाग घेता येतो आहे.
‘एक्जिओम-४’ मोहीम ही भविष्यातील सर्वनिम्न कक्षीय अर्थव्यवस्थेचा (लो अर्थ ऑर्बीट इकोनॉमी) पाया घालणारी आहे. शैक्षणिक संस्था, उद्योगसमूह, संशोधन संस्था, वैद्यकीय प्रयोगशाळा हे सर्वच आता प्रत्यक्ष अंतराळात प्रयोग करण्याच्या तयारीत आहेत आणि ‘एक्जिओम-४’ हे एक माध्यम ठरत आहे. विशेष म्हणजे, यामध्ये शुभांशु शुला यांच्यासारख्या प्रतिनिधींमुळे भारतीय संशोधन व प्रतिभेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर स्थान मिळते आहे. ‘एक्जिओम-४’ हा केवळ एक अंतराळप्रवास नसून, तो भविष्यातील मानवजातीच्या अंतराळ मोहिमांचा पाया घालणारा, विविध देशांतील सहकार्याने पार पडणारा प्रयोगशाळासदृश अनुभव आहे. एकीकडे जिथे ‘इस्रो’च्या ‘गगनयान’सारख्या स्वदेशी मोहिमेवर काम करत आहे; तिथे ‘एक्जिओम-४’सारख्या खासगी मोहिमा भारतीय अंतराळयात्रेला नवे आयाम देत आहेत. ‘एक्जिओम-४’ प्रक्षेपण २०२५ सालच्या उत्तरार्धात अपेक्षित आहे, त्यासाठी ‘स्पेसएस’च्या ‘फाल्कन-९’ रॉकेटचा वापर केला जाईल. मोहिमेतील यशस्वी सहभाग आणि सुरक्षित पुनरागमन हे ‘एक्जिओम स्पेस’च्या भविष्यातील विश्वासार्हतेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. ‘एक्जिओम-४’ हे नव्या युगाचे प्रतीक आहे, जिथे अंतराळ हे फक्त शासकीय संशोधनापुरते मर्यादित न राहता सर्वसामान्य संशोधक, वैज्ञानिक, उद्योजक, शिक्षण संस्था आणि नवउद्योजक यांचेही क्षेत्र होत आहे. यात भारताचा सहभाग ही केवळ अभिमानास्पद बाब नाही, तर भारताच्या जागतिक वैज्ञानिक नेतृत्वाची नांदी आहे.
‘एक्जिओम-४’ मोहिमेसाठी निवड झाल्यानंतर शुभांशु शुला यांना ज्या प्रशिक्षण प्रक्रियेला सामोरे जावे लागले, ती केवळ शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांची कसोटी नव्हे, तर मानसिक आणि तांत्रिक तयारीचाही एक अत्यंत शिस्तबद्ध प्रवास आहे. अंतराळवीरांचे प्रशिक्षण हे अत्यंत कडक निकषांवर आधारित असते आणि ते अनेक महिन्यांपर्यंत चालते. हे प्रशिक्षण अमेरिका, युरोप, जपान अशा विविध देशांतील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रांमध्ये दिले जाते.
प्रशिक्षणाची सुरुवात होते ती, अंतराळात शरीर कसे वागेल याच्या शारीरिक तयारीने. सूक्ष्म गुरुत्व अवस्थेत माणसाचे शरीर विविध प्रकारे प्रतिसाद देते. स्नायूंवर भार नसल्यामुळे ते कमकुवत होतात, हाडे ठिसूळ होतात आणि रक्तप्रवाहाचेही वितरण बदलते. यासाठी कठोर शारीरिक व्यायाम, धावण्याचा सराव, जलप्रशिक्षण, वजन प्रशिक्षण आणि सहनशक्ती चाचण्या घेतल्या जातात. मानसिक दृष्टिकोनसुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो. बंदिस्त जागेत इतर अंतराळवीरांसोबत आठवड्यांच्या कालावधीत राहणे, तणावपूर्ण स्थितीत निर्णय घेणे आणि एकसंधपणे काम करणे यांसाठी मानसशास्त्रीय चाचण्या आणि कृतींचा सराव केला जातो.
या प्रशिक्षणाचा दुसरा मोठा भाग म्हणजे तांत्रिक ज्ञान. अंतराळयान, त्यातील संगणक, दाब नियंत्रण प्रणाली, ऑसिजन आणि पाण्याचा पुरवठा, वायू विश्लेषण, यानाच्या बिघाडांवर मात करण्याच्या प्रणाली यांचे सखोल प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक अंतराळवीराला आपल्या यानातील प्रत्येक बटण आणि यंत्रणेची माहिती असावी लागते. काहीवेळा या प्रणालींच्या देखभालीसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत हस्तक्षेप करण्याची गरज भासते, म्हणून अंतराळयानाची पूर्ण प्रणाली समजून घेणे आणि ती हाताळण्याचे प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक असते.
गुरुत्वशून्यतेचा अनुभव प्रत्यक्ष मिळणे शय नसल्याने, त्यासाठी गुरुत्वशून्यतेचा कृत्रिम अनुभव देणार्या खास विमानांतून प्रशिक्षण घेतले जाते. त्यातून काही सेकंदांसाठी मिळणार्या अनुभवामुळे शरीर आणि मनाची तयारी होते. त्याशिवाय खोल पाण्यात, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रतिकृतीत कार्य करण्याचा सरावदेखील केला जातो. यात अंतराळवीरांना स्पेससूट घालून पाण्यात काम करावे लागते, जे अंतराळातील हालचालींशी समान असते.
अंतराळ स्थानकात राहून झोप घेणे, अन्न तयार करणे, स्नान करणे, व्यायाम करणे याबाबतची शिस्त आणि सवयीदेखील या काळात अंगी बाणवल्या जातात. विशेष म्हणजे अंतराळवीरांना विविध भाषा समजाव्या लागतात कारण, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अनेक देशांचे वैज्ञानिक एकत्र काम करतात. त्यामुळे संवाद कौशल्य, सांस्कृतिक समज आणि सहकार्य यावरही भर दिला जातो.
पृथ्वीवर परत आल्यानंतरच्या शारीरिक आणि मानसिक पुनर्वसनासाठी लागणारी माहिती आणि सवयींचा समावेश या प्रशिक्षणात असतो. अंतराळात काही आठवडे राहिल्यानंतर, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात पुन्हा शरीर आणि मन सावरायला वेळ लागतो. त्यासाठी योग्य आहार, व्यायाम, वैद्यकीय तपासणी आणि मानसोपचार यांचा समावेश असतो. एकूणच अंतराळवीर बनणे ही केवळ सन्मानाची गोष्ट नाही, तर ती प्रचंड चिकाटी, जिद्द आणि निष्ठेची परीक्षा आहे.
शुभांशु शुला यांचा हा अंतराळप्रवास सुमारे दहा दिवसांचा असणार आहे. त्यात ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर विविध वैज्ञानिक प्रयोग, भारतीय पद्धतीने संशोधन आणि अंतराळातील जीवनशैलीचा अनुभव घेणार आहेत. विशेष म्हणजे, ते भारतात विकसित झालेल्या काही सूक्ष्म उपकरणांची आणि प्रयोगांचीही चाचणी घेणार आहेत. सूक्ष्म गुरुत्वाच्या परिस्थितीत जैवविविधतेचा अभ्यास, भारतीय औषधी वनस्पतींवर आधारित प्रयोग, मानव शरीरावर गुरुत्व नसल्यास होणारे परिणाम आणि भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचे प्रात्यक्षिक अशा अनेक संशोधनात ते सहभागी होतील.
‘एक्जिओम-४’मध्ये शुभांशु यांच्यासोबत अमेरिकन, युरोपियन आणि जपानी अंतराळवीर सहभागी असतील. हा विविध संस्कृतींचा संगम असलेला आणि जागतिक सहकार्याने राबवला जाणारा कार्यक्रम आहे. शुभांशु शुला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील राष्ट्रीय ध्वजासह फोटो काढून, भारताचा सन्मान जागतिक व्यासपीठावर उंचावतील अशी सर्वांना अपेक्षा आहे.
शुभांशु शुला यांचा अनुभव ‘गगनयान’ मोहिमेच्या उभारणीतही मोलाचा ठरेल. या मोहिमेमुळे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला नवे दालन खुले होईल आणि भविष्यातील व्यावसायिक अंतराळ पर्यटन, संशोधन व शिक्षणाच्या संधी भारतात निर्माण होतील. आज भारतीय युवकांचा दृष्टिकोन बदलतो आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनात करिअर करण्याची आकांक्षा वाढते आहे. शुभांशु शुला यांचे अंतराळात जाणे ही केवळ एक वैयक्तिक यशोगाथा नाही, तर भारतीय तरुणाईला दिलेले एक स्वप्न आणि ध्येय आहे. शुभांशु शुला यांची ही झेप लाखो विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ठरेल.
भारताने अंतराळ तंत्रज्ञानात अनेक झेप घेतल्या. आता माणूस अंतराळात पाठवण्याच्या दिशेनेही पावले टाकली जात आहेत. शुभांशु शुला यांची ‘एक्जिओम-४’ मोहिमेतील निवड ही भारताच्या वैज्ञानिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. त्यांच्या झेपेबरोबर भारताच्या नव्या अंतराळ युगाची सुरुवात होत आहे. राकेश शर्मांपासून शुभांशु शुलांपर्यंतचा हा प्रवास हे सिद्ध करतो की, भारतीय युवकही आता अवकाश जिंकण्यासाठी सज्ज आहेत!