पहलगाम हल्ल्याच्या एक महिन्यानंतर...

    31-May-2025
Total Views | 33

पहलगाम हल्ल्याच्या एक महिन्यानंतर...


पहलगाम हल्ल्यानंतरच्या एका महिन्यात भारताने ’ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर लक्ष्यभेदी कारवाई करत, पकिस्तानचे मोठे नुकसान केले. केवळ लष्करीच नव्हे, तर आर्थिक आणि कूटनीतिक पातळीवरही पाकिस्तानची कोंडी करण्यात भारत यशस्वी ठरला. या घटनाक्रमामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या भूमिकेला अधिक पाठिंबा मिळाला. या ऑपरेशनचे परिणाम आणि जागतिक पातळीवरील त्याचा प्रभाव याचा घेतलेला आढावा...


भारताची सशक्त हवाई सुरक्षा प्रणाली आणि भारतीय क्षेपणास्त्रांचा अचूक प्रहार यांमुळे पाकिस्तान गुडघ्यावर आला. चीनची हवाई सुरक्षा प्रणाली भारतीय हल्ल्यांपासून पाकिस्तानचे रक्षण करण्यात अपयशी ठरली. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी दि. १० मे रोजीच्या मध्यरात्री पाकिस्तानवर चार ठिकाणी क्षेपणास्त्रांचे हल्ले केले. ‘राफेल’मधून ‘स्काल्प’ आणि ‘सुखोई सु-३० एमकेआय’मधून ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र डागण्यात आले. चकालाच्या नूर खान एअरबेसवर ब्रह्मोसद्वारे पहिला हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पाकिस्तानच्या उत्तरेकडचे एअर कमांड आणि कंट्रोल नेटवर्कच उद्ध्वस्त झाले.


‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने आदमपूर बेसवरील एस-४०० या हवाई सुरक्षा प्रणालीचा ११ वेळा वापर करण्यात आला. पाकिस्तानचे साब २००० एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग सिस्टमचे विमान ३१५ किमी आतमध्ये होते. तिथपर्यंत खोलवर प्रहार करून भारताबे हे विमान पाडले. हे विमान पाडल्याने, एकप्रकारे भारताने पाकिस्तानला युद्धभूमीत आंधळे करून सोडले.


जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाममध्ये दि. २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. नंतरच्या एका महिन्यातच भारताने काय काय केले? आणि पुढे काय होणार आहे? ’ऑपरेशन सिंदूर’ सध्या सुरूच आहे. भारत पाकिस्तानला तीन आघाड्यांवर युद्ध लढण्यास भाग पाडत आहे.


अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील परिस्थिती


अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करून, त्यांचे मोठे नुकसान करत आहे. टीटीपीला नियंत्रित करण्यासाठी पाकिस्तानी सैन्य तोफखाना, हेलिकॉप्टर, गनशिप्स आणि क्षेपणास्त्रांचा वापर करत आहे. पाकिस्तानच्या आत बलुचिस्तानमध्येही ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’चे (बीएलए) हल्ले अधिक तीव्र झाले आहेत.


२०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या ३६६ दहशतवादी हल्ल्यांमध्ये, एकूण १ हजार, ३६० लोकांचा बळी गेला. यामध्ये २१० नागरिक, ४२९ सैनिक आणि ७३१ स्वातंत्र्य सैनिकांचा समावेश आहे. सध्या जवळपास ४० ते ५० टक्के पाकिस्तानी लष्कर हे दहशतवादविरोधी अभियानांमध्ये गुंतलेले आहे.


‘फेल्ड’ जनरल फील्ड मार्शल झाला?


पाकिस्तानमध्ये अलीकडेच लष्करी आणि राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ झाली. यामध्ये लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना प्रतिष्ठित फील्ड मार्शलपदावर बढती देण्यात आली. मुनीर यांना मिळालेली ही बढती, अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. या घटनेचे विश्लेषण करताना, मुनीरच्या बढतीमागील रहस्य, ’बंकर’मध्ये लपल्याच्या अफवा आणि त्यांच्या पत्नीच्या इंग्लंडला पळून जाण्याबद्दलच्या चर्चा, पाकिस्तानच्या अंतर्गत अस्थिरतेची आणि लष्कराच्या वाढत्या प्रभावाची साक्ष देतात.


फील्ड मार्शल हे पद मोठ्या लष्करी विजयानंतर दिले जाते. मात्र, विश्लेषकांच्या मते ही बढती लष्करी विजयाचे नव्हे, तर राजकीय हेतूंचे द्योतक आहे. मुनीर यांना अंतर्गत लष्करी आव्हानांपासून संरक्षण देण्यासाठी, त्यांची स्थिती मजबूत करण्यासाठी आणि कोणत्याही संभाव्य कोर्ट मार्शलच्या धोयापासून वाचवण्यासाठी ही बढती देण्यात आली असावी. हा एक रणनीतिक डाव असून, पराभवाला झाकण्याचा प्रयत्न आहे. जनरल मुनीर यांची बढती हे दर्शवते की, पाकिस्तानी लष्कर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या राजकारणावर आपली पकड मजबूत करत आहे.


लष्करप्रमुख असीम मुनीर हे पाकिस्तानच्या सैन्याच्या मोठ्या व्यावसायिक साम्राज्यामुळेही चर्चेत आहेत. पाकिस्तानी सैन्य देशातील सर्वांत मोठा ’बिझनेस ग्रुप’ आहे. पाकिस्तानी सैन्याच्या स्वमालकीच्या १०० पेक्षा जास्त कंपन्या पाकिस्तानात आहेत. त्यातील अनेक कंपन्या खूप नफा कमावतात. या व्यवसायांमुळे संस्था आणि लष्कर प्रमुखांसारख्या मोठ्या अधिकार्यांचीही चांगलीच कमाई होते. पाकिस्तानात लष्करप्रमुख असणे म्हणजे फक्त सैन्यातली नोकरी नाही, तर एका मोठ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्यासारखेच आहे. पाकिस्तानात सैन्याचा प्रभाव फक्त संरक्षण क्षेत्रापुरताच मर्यादित नाही.तिथे सैन्याला प्रचंड आर्थिक ताकद मिळाली आहे. पाकिस्तानी सैन्याच्या व्यवसायाचे एकूण आकारमान, ४० ते १०० अब्ज डॉलर्सच्या आसपास असल्याचा अंदाज आहे. यामुळेच पाकिस्तानी लष्कर, पाकिस्तानातील सर्वांत मोठे व्यावसायिक केंद्र झाले आहे.


पाकिस्तानच्या अण्वस्त्र भांडारावर हल्ला झाल्याची शयता


आम्ही पाकिस्तानच्या अण्वस्त्रतळांना लक्ष्य केले नसल्याचे, भारतीय सैन्याने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सॅटेलाईट फोटोंमध्ये सरगोधातील मुशफ विमानतळाच्या धावपट्टीवर हल्ला झाल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानच्या अण्वस्त्र भांडारावर हल्ला झाल्याची शयता वर्तवली जाऊ लागली. पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा एक साठा, सरगोधातील किराना हिल्समध्ये असल्याचे मानले जाते.


पाकिस्तानात गृहयुद्ध; गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला


पहलगाम हल्ल्याच्या दुसर्या दिवशीच म्हणजे दि. २३ एप्रिल रोजी, भारताने पाकिस्तानसोबतचा ‘सिंधू जलकरार’ रद्द केला. ‘पाणी आणि रक्त एकाचवेळी वाहू शकत नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत भारताने पाकला ठणकावले.


पाकिस्तान सध्याच्या घडीला चारही बाजूंनी संकटात सापडला आहे. एकीकडे बलुचिस्तानात अस्थिरता असताना, दुसरीकडे सिंध प्रांतही पेटला आहे. सिंधमधील जनता वादग्रस्त कालवा प्रकल्पाच्याविरोधात रस्त्यावर उतरली आहे. आंदोलकांनी सिंधचे गृहमंत्री जियाऊल हसन लंजर यांच्या घराला आग लावली. आंदोलकांनी लंजर यांच्या मालमत्तेचेही नुकसान केले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. यामध्ये दोन आंदोलकांचा मृत्यूही झाला. या संघर्षात एक डीसीपी आणि सहा पोलीस कर्मचारी यांच्यासह, दहा नागरिकही जखमी झाले.


शाहबाज सरकार चोलिस्तान वाळवंटात सिंचनासाठी, सिंधू नदीतून सहा कालवे काढण्याच्या तयारीत होते. पण पीपीपी आणि सिंध प्रांतातील अन्य राजकीय पक्ष या प्रकल्पाच्या विरोधात आहेत. या प्रकल्पाला सिंधमधून प्रचंड विरोध आहे, संपूर्ण सिंध प्रांतात या प्रकल्पाविरोधात धरणे आंदोलनं सुरू आहेत.


दहशतवादी अबू सैफुल्लाह याचा पाकिस्तानात खात्मा


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील मुख्यालयावर २००६ मध्ये बॉम्बस्फोट हल्ल्याचा कट रचणारा खतरनाक दहशतवादी अबू सैफुल्लाह याचा, पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोरांनी खात्मा केला. सैफुल्लाह याला पाकिस्तानाकडून संरक्षण देण्यात आले होते पण, ते संरक्षण भेदत त्याचा अज्ञात हल्लेखोरांनी खात्मा केला. अबू सैफुल्लाहच्या हत्येने पाकिस्तानात दहशतवाद्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.


‘बलुच लिबरेशन आर्मी’ने आणखी तीव्र हल्ले करण्याची धमकी दिली


पाकिस्तान सरकार आणि लष्कराशी प्रदीर्घ काळापासून लढा देत असलेला बंडखोर गट ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने, आणखी तीव्र हल्ले करण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात गेल्या काही महिन्यांमध्ये ५१ ठिकाणी झालेल्या ७१ हल्ल्यांची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे.


या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी सैन्य, देशाचे गोपनीय तळ, पोलीस स्टेशन, खनिज वाहतूक करणारी वाहने आणि महामार्गांवरील पायाभूत बांधकामांना लक्ष्य करण्यात आले. त्यासाठी आयईडी स्फोट, स्नायपरच्या माध्यमातून होणारा गोळीबार यांचाही वापर करण्यात आला. पाकिस्तानातील सुरक्षा चौयांना लक्ष्य करून, पाकिस्तानी सैनिकांच्या हत्या करण्यात आल्या. बलुचिस्तानी जनतेवर होत असलेला अन्याय रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानवर दबाव टाकावा, असे आवाहन ‘बलुच लिबरेशन आर्मी’कडून करण्यात आलेले आहे.


आता जागतिक मंचावर मोठा प्रयत्न


भारताने तुर्कस्थानावर बहिष्कार घालताच आता चीननेदेखील या कारवाईचा धसका घेतला आहे. चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचे सर्व जगाला माहीत आहे. मात्र, तरीदेखील आता चीनने ‘यू-टर्न’ घेतला आहे. आम्ही पाकिस्तानला मदत केली नसल्याचे चीनने म्हटले आहे.


पाकिस्तान दहशतवाद्यांना सरंक्षण देत असल्याचे अनेकदा समोर आले. आता केंद्र सरकार विविध देशांमध्ये खास प्रतिनिधीमंडळे पाठवून, पाकिस्तानच्या दहशतवादी संबंधांबद्दल जागतिक समुदायाला माहिती देत आहे. भारतीय विविध पक्षीय खासदारांची शिष्टमंडळे फ्रान्स, इटली, जर्मनी, डेनमार्क, युके आणि बेल्जियम येथे भेट देणार आहे.


संरक्षण क्षेत्रात ठोकणार मांड


‘ब्रह्मोस’ क्रूज मिसाईलसह तोफखाना आणि बंदुकीचे विविध प्रकार आणि शस्त्राच्या निर्यातीचा विस्तार झाला आहे. आता कतार, लेबेनॉन, इराक, इक्वेडोर, जपान एवढेच नाही, तर काही युरोपीय देशांनीसुद्धा भारतीय शस्त्रास्त्र खरेदीत रूची दाखवली आहे. शस्त्र, चिलखतापासून ते इतर सुरक्षा प्रणालींची निर्यातसुद्धा वाढली आहे. भारताने २०२४-२५ पर्यंत वार्षिक संरक्षण निर्यात ३५ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले. आता भारत शस्त्रनिर्मिती आणि विक्रीत आत्मनिर्भरच नाही, तर मोठा निर्यातक होण्याच्या मार्गावर अग्रेसर आहे.


थोडयात, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानवर सामरिक दबाव टाकण्यामध्ये आपल्याला यश मिळत आहे. मात्र, पाकिस्तान, चीन आणि त्याच्या समर्थकांबरोबरची लढाई अनेक वर्षे चालणार आहे, हे अधोरेखित करणेही महत्त्वाचे आहे.



(नि.) ब्रि.
हेमंत महाजन
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121