वाढवण बंदरामुळे आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी

‘जेएनपीए’चे अध्यक्ष उन्मेश वाघ यांची माहिती

    19-May-2025
Total Views | 10
Employment created because of extension of vadhvan port

नाशिक : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा विकास बंदरांमुळे झाला असून जवाहरलाल नेहरू प्राधिकरण विकसित करत असलेले वाढवण बंदर भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. सुमारे 3 हजार, 600 एकर जागेत निर्माण होणारे वाढवण बंदर आंतरराष्ट्रीय स्तरावरील नव्या रोजगारांच्या संधी निर्माण करणार असल्याची माहिती मुंबईच्या ‘जवाहरलाल नेहरू पोर्ट अ‍ॅथोरिटी’चे अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी दिली. गोदा घाटावरील देव मामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर आयोजित वसंत व्याख्यानमालेचे 18 वे पुष्प गुंफताना स्व. लक्ष्मण (काका) तांबे स्मृती व्याख्यानात ‘वाढवण बंदर : एक कल्पवृक्ष’ या विषयावर ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर नवलनाथ तांबे, उद्योजक रमेश पवार, शरद वाघ, अपर्णा वाघ आदि उपस्थित होते. पुढे बोलताना वाघ म्हणाले की, “शैक्षणिक स्तरावर विद्यार्थ्यांना बंदरांचा अभ्यास उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्याचबरोबर वाढवण बंदरामुळे भारताचा इतर देशांसोबतचा व्यापार, उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तसेच, नाशिकपासून अवघ्या 150 किमी अंतरावर असलेले वाढवण बंदर गुजरात-मुंबईबरोबरच अनेक जवळच्या रेल्वेस्थानकांनाही खूपच जवळ आहे. येत्या दहा वर्षांमध्ये या बंदरामुळे अनेक क्षेत्रांमध्ये भारताची प्रगती झपाट्याने होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2030 साल उजाडेपर्यंत जागतिक बाजारपेठेत भारताच्या अनेक क्षेत्रांचा विकास झालेला दिसेल,” असेही वाघ यांनी यावेळी सांगितले.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी केले. नवलनाथ तांबे यांनी प्रमुख वक्ते उन्मेश वाघ यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार, तर प्राचार्य प्रशांत पाटील यांनी परिचय करून दिला.

भारताच्या विकासाची नांदी

“सिंधू संस्कृतीची जी ओळख जगाला झाली, ती केवळ तेथे निर्माण करण्यात आलेल्या बंदरामुळे झाली. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील मराठा आरमाराची स्थापना केली होती. इंग्रज, पोर्तुगीज आणि डच या परकीय आक्रमकांनीदेखील बंदरांचा अत्याधुनिक विकास केल्यामुळेच ते अनेक क्षेत्रांमध्ये पुढे गेले. त्यामुळे वाढवण बंदरदेखील भारताच्या विकासाची खर्‍या अर्थाने नांदी ठरेल,” असेही वाघ म्हणाले.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121