विशेष प्रतिनिधी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मंगळवारी १३ व्या पासपोर्ट सेवा दिनानिमित्त पासपोर्ट सेवा कार्यक्रमाच्या (पीएसपी) पुढील टप्प्याची आणि देशव्यापी ई-पासपोर्ट सेवा सुरू करण्याची घोषणा केली.
Read More
विशेष प्रतिनिधी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या ओळखीबाबत पुरावे गोळा केले आहेत, असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली.
चेन्नईच्या अलंदूर येथील महिला पासपोर्टसाठी अर्ज करायला पासपोर्ट प्राधिकरणाकडे गेली असता प्राधिकरणाने पतीच्या स्वाक्षरीशिवाय पासपोर्ट मिळणार नाही, असा निर्णय दिला होता. या निर्णयाला एका याचिकेद्वारे मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर न्यायालयाने शुक्रवार दि. २० जून रोजी स्पष्ट सांगितले आहे की, "पासपोर्टसाठी अर्ज करताना पत्नीला तिच्या पतीची परवानगी आणि स्वाक्षरी घेणे आवश्यक नाही."
दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायामूर्ती यशवंत वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानी लागलेल्या आगीत सापडलेल्या जळालेल्या नोटांच्या बंडलांमुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. न्यायामूर्ती वर्मा यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन न्यायाधीशांच्या समितीने ६४ पानांच्या अहवालामधून ५५ हून अधिक पुरावे आणि जबाब न्यायालयासमोर सादर केले. त्यानंतर तो सार्वजनिकरित्या प्रकाशित करण्यात आला.
विशेष प्रतिनिधी शिक्षण क्षेत्रात भारताने एक नवीन ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. यावेळी ५४ भारतीय उच्च शिक्षण संस्थांनी क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२६ मध्ये स्थान मिळवले आहे. ही आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी दिली आहे.
अहमदाबाद येथे घडलेल्या एअर इंडिया फ्लाइट AI171 च्या भीषण अपघातात जवळपास २७४ नागरिक मृत्यूमुखी पडले होते. हा अपघात विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे झाला असला, तरी ते विमान ज्या प्रकारे वसतिगृहाच्या इमारतीवर आदळले होते, त्याचा विध्वंस पाहून यशवंत शेणॉय यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास असलेली अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर कुर्ल्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी, दि. १८ जून रोजी उच्च न्यायालयाला सांगितले की, उड्डाणांसा
अहमदाबादहून लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI171 विमानाचा दि. १२ जून रोजी अहमदाबाद विमानतळाजवळ दुर्दैवी अपघात झाला होता. या अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. यात २७४ नागरिकांचा मृत्यू झाला. अपघातानंतर लगेचच, टाटा ग्रुपने एक्स या समाजमाध्यमावर अधिकृत घोषणा करत अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत तसेच जखमी झालेल्यांसाठी वैद्यकीय खर्चाची भरपाई केली जाईल, असे जाहीर केले होते.
‘बिमारू राज्य’ म्हणून हिणवल्या जाणार्या बिहारमधून विदेशात होऊ घातलेली रेल्वे इंजिनांची निर्यात ही भारताच्या औद्योगिक आत्मविश्वासाचीच नांदी! बिहारच्या लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात रेल्वे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असेच समीकरण रूढ झाले होते. पण, आज आयात करणारे रेल्वे मंत्रालय, आता निर्यातदार म्हणून नावारुपास येत आहे, हे बाब सुखावणारी अशीच!
वाढवण बंदर हे या जिल्ह्याचेच नाही तर महाराष्ट्राचे आणि देशाचे चित्र बदलणार आहे. हे बंदर १० लाख रोजगार तयार करणार आहे. या रोजगारामध्ये सर्वाधिक भूमिपूत्रांना फायदा व्हावा हा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवार, दि. १५ जून रोजी, सकाळी सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या SV-3112 विमानाचे लँडिंग अतिशय भितीदायक परिस्थितीत झाले. विमानाच्या चाकातून धूर आणि ठिणग्या निघाल्याने विमानतळ प्रशासनाची ताराबंळ उडाली.विमानात २४२ हज यात्रेकरू उपस्थित होते, मात्र सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
दि. 15 डिसेंबर 2024 रोजी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास ही तुलनेने कमी चर्चिली जाणारी, पण प्रचंड संधी असलेल्या खात्यांची जबाबदारी नितेश राणे यांच्याकडे आली. बेधडक शैली, कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा आणि आक्रमक नेतृत्वासाठी ओळखल्या जाणार्या नितेश राणे यांनी या खात्यांना केवळ गतिमान केले नाही, तर महाराष्ट्रासह कोकणच्या विकासाचा एक नवा अजेंडा देशासमोर ठेवला. त्यांच्या प्रत्येक निर्णयातून दिसते ती दूरदृष्टी, कृतिशीलता आणि सामान्य माणसाच्या हिताची कळकळ. नितेश राणे यांनी मत्स्यव
अन्य धर्मीयांच्या तुलनेत जगभरात मुस्लिमांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याचा ‘प्यू रिसर्च सेंटर’चा अहवाल नुकताच जाहीर झाला. पण, या अहवालातील निष्कर्षांकडे केवळ लोकसंख्यावाढीच्या दृष्टिकोनातून न बघता, यामागील झुंडीचे धर्मांध राजकारण समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे.
(Biological Smuggling) अमेरिकेत जैविक सुरक्षा व्यवस्थेवर धोका निर्माण करणाऱ्या आणखी एका प्रकाराने खळबळ उडवली आहे. चीनमधील वुहान येथील हुआझोंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करत असलेल्या चेंग्झुआन हॅन या महिला संशोधकाला अमेरिकेत जैविक पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एफबीआयने ८ जून रोजी डेट्रॉईट मेट्रोपॉलिटन विमानतळावर ही कारवाई केली.
मच्छीमार महामंडळाचे कामकाजही तातडीने सुरु होणार
संयुक्त राष्ट्रांच्या प्रसिद्ध झालेल्या एका नवीन लोकसंख्या अहवालानुसार, २०२५ अखेरपर्यंत भारताची लोकसंख्या ही १.४६ अब्जपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारत हा आता जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनेल, जिथे आता जवळपास १.५ अब्ज लोकसंख्या आहे. आता हीच संख्या सुमारे सुमारे १.७ अब्ज होण्याची अपेक्षा आहे. असे संयुक्त राष्ट्रांच्या प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे.
क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरीसाठी सुरक्षित वाटणे महत्त्वाचे असते. त्यानुसारच आता हॉकी इंडिया आणि ‘अॅमिटी विद्यापीठा’च्या सहकार्याने हॉकी खेळाडूंना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येणार असल्याने त्यांचे भविष्य सुरक्षित होणार आहे. त्याचवेळी ‘आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघा’नेही खेळाडूंच्या सुरक्षेविषयी काही निर्णय घेतले. अशा अनेक निर्णयांचा घेतलेला आढावा...
काँग्रेस नेत्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा भाग असलेले त्यांचेच आणखी एक नेते सलमान खुर्शीद यांच्यावर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड केल्याबद्दल आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चे समर्थन केल्याबद्दल नुकताच हल्ला चढवला. थरूर यांनी ज्याप्रमाणे अशा नेत्यांना त्यांचे नाव न घेता उत्तर दिले, त्याचप्रमाणे खुर्शीद यांनीही तेच केले. यासोबतच त्यांनी आपली वेदना व्यक्त करताना असा प्रश्नही विचारला की, “देशभक्त असणे इतके कठीण आहे का?” हा फक्त एक प्रश्नच नाही, तर एक वेदना असल्याचे दिसते. अर्थात, काँग्रेसमध्ये हे नवीन नाही. यापूर्वी गांध
एम्प्लॉइर्स फेडरेशन ऑफ इंडिया (EFI) आणि भारतीय उद्योग परिसंघ (CII) यांच्या या उपक्रमातून उद्योग आणि शासन यांच्यातील सहकार्याचे मूर्त स्वरूप दिसते. महाराष्ट्राने देशात औद्योगिक पुढाकार घेतले असून, कामगार धोरणातील सुधारणा, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, आणि रोजगार संधी वाढवण्याच्या दिशेने राज्याने ठोस पावले उचलली आहेत, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी आज केले.
खारघर पूर्वमधील तळोजा हा दक्षिण नवी मुंबईतील वेगाने विकसित होणारा नोड असून, पायाभूत सुविधा आणि विकास यामुळे त्याचे भरभराटीच्या केंद्रात रूपांतरण होत आहे. खारघर, पनवेल, कल्याण आणि डोंबिवली जवळ मोक्याच्या ठिकाणी स्थित असलेला तळोजा नोड आधुनिक सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि परवडणाऱ्या किमतीचे एक अद्वितीय मिश्रण देतो, ज्यामुळे रहिवासी आणि व्यवसायांसाठी हे एक आकर्षक ठिकाण बनले आहे. सिडकोने विकसित करत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सान्निध्यामुळे तळोजा नोडचे महत्त्व अधिकच अधोरेखित होत आहे.
पर्यावरण म्हणजे नैसर्गिक आणि मानवनिर्मित परिसर जो पृथ्वीवरील जीवनावर परिणाम करतो आणि टिकवून ठेवतो. पर्यावरण हे विविध भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांपासून बनलेले आहे जे एकमेकांशी आणि मानवी क्रियाकलापांशी संवाद साधतात. पर्यावरणावर सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक घटकांचा देखील प्रभाव पडतो जे मानवी मूल्ये, दृष्टिकोन, वर्तन आणि संस्थांना आकार देतात. पर्यावरण अभ्यास हे असे शैक्षणिक क्षेत्र आहे जे पर्यावरण आणि त्याच्या समस्यांचा बहुविद्याशाखीय आणि समग्र दृष्टिकोनातून पद्धतशीरपणे अभ्यास करते. पर्यावरण अभ्यास
भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य करतात
विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष सॅंटियागो पेना पॅलासिओस यांची भेट घेतली.
मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंच्या विभागाला सूचना
भारताच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक इतिहासात ईशान्य भारताचा वाटा फार मोठा आहे. तसेच भरीव योगदान ईशान्य भारताने देशाच्या क्रीडा क्षेत्रातही दिले आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये ईशान्य भारतातील अनेक खेळाडू देशाचा नावलौकिक वाढवत असतात. ईशान्य भारतातील क्रीडा संस्कृतीचा घेतलेला आढावा...
गेल्या वर्षभरात बर्याच कंपन्यांचे‘आयपीओ’ भांडवली बाजारात दिमाखात दाखल झाले आहेत आणि अजूनही येत आहेत. यातील बरेच ‘ओव्हर सबस्क्राईब’ही झाले. याचाच अर्थ ‘आयपीओ’त फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. ‘आयपीओ’त शेअर मिळावेत, यासाठी कशा प्रकारे अर्ज केल्यास फायदा होईल, याची माहिती देणारे मेसेजही हल्ली ‘व्हॉट्सअॅप’वर येतात. शेअर बाजारात झटपट नफा कमाविण्याचे ‘आयपीओ’ हे एक साधन आहे, असा बर्याच गुंतवणूकदारांचा समज आहे. मात्र, ‘ऑफर फॉर सेल’च्या धोक्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यानिमित्ताने ‘आयपीओ’ची दुसरी बाजू स
एमएमआरडीए पारदर्शक आणि नागरिककेंद्री प्रशासनाच्या दिशेने
विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनकाळात महत्त्वाच्या नोंदी घेण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची संसदीय कार्य विभागाने खरडपट्टी काढली आहे. अत्यंत गंभीर अथवा तातडीच्या विषयाबाबत मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची नोंद घेतली न गेल्यामुळे संबंधित विषय दीर्घकाळ प्रलंबित राहत आहेत. विधिमंडळाकडून कार्यवृत्त प्राप्त झाल्यानंतरच आश्वासनांबाबत जाग येत असल्याने या हलगर्जीपणाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत आणि जलद गतीने व्हावी, यासाठी भारतीय रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली. यामध्ये रतलाम- नागदा तिसरा व चौथा मार्ग आणि महाराष्ट्रातील वर्धा-बल्लारशाह चौथ्या मार्गिकेचाही समावेश आहे.
महाराष्ट्रातील बंदरे विभागाच्या ४२ प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मान्यता दिल्याची माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवार, दि. २९ मे रोजी दिली. नवी दिल्ली येथे पर्यावरण मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मृत्यूच्या दिवशीसुद्धा वैष्णवीला मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Vibha Guidance Hub तर्फे आयोजित VGH महा एक्झिबिशन 2025 हा बहुआयामी सामाजिक उपक्रम दिनांक 29 मे ते 1 जून 2025 दरम्यान IES अश्लेन शाळा, डी. एस. बाब्रेकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई – 400028 (कॅटरिंग कॉलेजच्या मागे, शिवाजी पार्क टेलिफोन एक्सचेंजजवळ) येथे सकाळी 11 ते सायंकाळी 8 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
वाढवण बंदर प्रकल्प, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प यांसारखे पालघर जिल्ह्याला आंतराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणार आहेत. अशा मोठ्या प्रकल्पांसोबतच पालघर जिल्हा आता चौथी मुंबई म्हणून ओळख मिळविण्यासाठी सज्ज होतो आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील तरुणांनीही आवश्यक कौशल्ये विकसित करून या विकासधारेत यावे यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय प्रयत्नशील आहे. याच मुद्यावर पालघरच्या जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्याशी दै. मुंबई तरुण भारतने साधलेला संवाद.
राज्यात वाढवण सारखा मोठा बंदर प्रकल्प तयार होत आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत. याचा सर्वात पहिला फायदा किनारपट्टीच्या जिल्ह्यांना होणार असून या ठिकाणी लागणाऱ्या कुशल कामगार वर्गासाठीचे प्रशिक्षण आतापासूनच सुरू करणे गरजेचे असून त्या दृष्टीने कौशल्य विकास प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
मत्स्यव्यवसाय विभाग आणि बंदर विभागामार्फत राज्यात अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. या प्रकल्पांना आशियाई बँकेकडून निधी उपलब्ध होण्याबाबत आज मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांनी आशियाई बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
जगामध्ये विविध खेळांच्या अनेक स्पर्धा होतात. खेळ म्हटले की संघर्ष आलाच. हा संघर्ष खेळ भावनेने होत असल्यास खेळातील मौज वाढते. खेळातील खिलाडूवृत्ती टिकावी, वृद्धिंगत व्हावी, यासाठी ‘फेअर प्ले’ दिनाची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाने केली आहे. निष्पक्ष खेळाची अनेक उदाहरणे जगात आहेत. त्याचा घेतलेला आढावा...
Reduced urban migration of industrial workers for livelihood and increased employment opportunities in rural areasसध्या ‘कोरोना’ पुन्हा काहीसे डोके वर काढत असल्यामुळे, पूर्वानुभवातून प्रशासनासह नागरिकही सतर्कता बाळगताना दिसतात. कारण, ‘कोरोना’चे केवळ मानवी आरोग्यावर नाही, तर सामाजिक, औद्योगिक आणि व्यावसायिक पातळीवरही लक्षणीय परिणाम झाले. त्यापैकी एक मोठा बदल म्हणजे, औद्योगिक कामगारांचे रोजीरोटीसाठी घटलेले शहरी स्थलांतर आणि ग्रामीण भागात वाढलेल्या रोजगाराच्या संधी. तेव्हा, या परिवर्तनाची कारणमीमांसा करणारा हा
अतिक्रमित जागांबाबत विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
विशेष प्रतिनिधी पहलगाममध्ये दहशतवाद्य़ांनी धर्म विचारून निष्पापांचे बळी घेतले. त्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानचा कणा मोडला आणि त्या चक्रव्युहात पाकला गुडघे टेकावे लागले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजस्थानमधील बिकानेर येथे केले. राजस्थानमधील बिकानेर येथे 26,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करताना ते बोलत होते.
परिवहन विभागाच्या राज्यभरात असलेल्या ४३ जागांपैकी मुंबईतील ४ मोक्याच्या जागा अनाधिकृत रित्या बळकावण्यात आलेले आहेत. तसेच, १५ ठिकाणी परिवहन कार्यालय ही भाड्याच्या जागेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भविष्यात उर्वरित जागा देखील गिळंकृत होऊ नयेत यासाठी परिवहन विभागाने या जागांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत,असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. ते परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते.
Women Participation in the Cooperative Sector and Available Opportunities आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 व आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ‘महिलांचा सहकार क्षेत्रातील सहभाग व उपलब्ध संधी’ या कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘ईशान्य मुंबई सहकार भारती’ व ‘म्हाडा कॉलनी नवरात्र उत्सव मंडळा’तर्फे दि. 17 मे रोजी मुंबईतील मुलुंंड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा सारांश या लेखात मांडला आहे.
(11 million stare at starvation in Pakistan) पाकिस्तानातील १.१ कोटी जनता तीव्र अन्नटंचाईच्या समस्येला तोंड देत आहेत, त्यापैकी अनेक जण उपासमारीच्या थेट उंबरठ्यावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (FAO) शुक्रवार, दि. १६ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘जागतिक अन्न संकट २०२५’ या अहवालातून ही धोकादायक स्थिती समोर आली आहे. या अहवालातून पाकिस्तानमध्ये विशेषतः बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा सारख्या संघर्षग्रस्त आणि उपेक्षित भागांमध्ये अन्नटंचाईची भीषण परिस्थिती ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या भारत-पाकिस्तान संघर्षामुळे क्रीडाविश्वावर विपरीत परिणाम झाला. अनेक क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या, तर काही क्रीडापटूंना काही स्पर्धांना मुकावे लागले. या तणाव आणि अशांततेमुळे क्रीडा क्षेत्रावर होणार्या परिणामांचा घेतलेला हा आढावा...
भारताची सागरी खाद्यान्नाची निर्यात यावर्षी १७.८१ टक्के इतकी वाढली असून, आता तो चौथा सर्वांत मोठा उत्पादक देश म्हणून ओळखला जात आहे. भारताची या क्षेत्रात विस्ताराची अफाट क्षमता असून, देशाला लाभलेली ७ हजार, ५०० किमीपेक्षा जास्ती लांबीचा किनारपट्टी दहा दशलक्षांहून अधिकांना रोजगाराची थेट संधी देणारी ठरत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा विकास बंदरांमुळे झाला असून जवाहरलाल नेहरू प्राधिकरण विकसित करत असलेले वाढवण बंदर भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. सुमारे 3 हजार, 600 एकर जागेत निर्माण होणारे वाढवण बंदर आंतरराष्ट्रीय स्तरावरील नव्या रोजगारांच्या संधी निर्माण करणार असल्याची माहिती मुंबईच्या ‘जवाहरलाल नेहरू पोर्ट अॅथोरिटी’चे अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी दिली. गोदा घाटावरील देव मामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर आयोजित वसंत व्याख्यानमालेचे 18 वे पुष्प गुंफताना स्व. लक्ष्मण (काक
भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दि. 5 मे रोजी पाकिस्तानच्या कराची बंदरावरून होणार्या मालवाहतुकीवर बंदी घातली. त्यानंतर कांद्याच्या निर्यातीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. मात्र, दि. 6 मे रोजीपासून मुंबईहून दुबईकडे थेट जहाजसेवा सुरू झाल्याने लासलगावसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून आखाती देशांमध्ये कांद्याची थेट निर्यात पुन्हा वेग घेत आहे. आतापर्यंत 350 कंटेनरद्वारे 90 हजार क्विंटल (30 हजार मेट्रिक टन) कांद्याची निर्यात झाली. त्यामुळे भारतीय कांदा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारात गाजू
मोटार परिवहन विभागाच्या ऑनलाईन बदल्यामुळे पारदर्शकते बरोबरच जास्तीत जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मागणी केलेला पसंतीक्रम मिळत असल्याने बहुतेक अधिकाऱ्यांचे समाधान होते. त्यामुळे भविष्यात परिवहन विभागाच्या ऑन लाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणावी, तसेच महिला अधिकारी वर्गाच्या अडचणी प्राधान्याने विचारात घ्याव्यात असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत सोमवार,दि.१९ रोजी मंत्रालयातील त्यांच्या दालनात परिवहन विभागाकडील १५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑन लाई
Indian People Solidarity with Palestine and Boycott Disinvestment movement were distributing leaflets in support of Palestine and anti-Israel in Pune दि. 8 मे रोजी ‘इंडियन पीपल इन सॉलिडेरिटी विथ पॅलेस्टाईन’ आणि ‘बीडीएस’ (बॉयकॉट, डिसइन्व्हेस्टमेंट, सँक्शन्स) चळवळीचे कार्यकर्ते पुणे, कर्वेनगर येथे पॅलेस्टाईनच्या समर्थनात आणि इस्रायलविरोधी पत्रके वाटून, इस्रायल तसेच ज्यूंच्या निषेधासाठी आवाहनही करत होते. पुणेकरांनी या लोकांना पुणेकरांचे अस्सल तर्कवादी देशनिष्ठ रंग दाखवले. देश, समाज आणि धर्मासंबंधी भारतीयांच्या
पनवेलमाजी सभागृहनेते परेश ठाकूर यांचे समाजातील प्रत्येक घटकाबरोबर चांगले नाते असून त्यांच्या पाठीशी युवा शक्ती आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी खारघर येथे केले. तसेच सामाजिक कार्यासह क्रीडा क्षेत्राची उंची वाढविण्याचेही काम त्यांनी केले असल्याचे अधोरेखित केले.
आपल्या शेजारचे राष्ट्र आपला किती द्वेष करते, हे युद्धविराम झाल्यानंतरदेखील दिसून येते. त्यामुळे येऊन-जाऊन पाकिस्तान्यांची तळी उचलणार्यांनी ‘उचलली जीभ’ असे प्रकार जे समाजमाध्यमांतून सुरू केले आहेत, त्याला जरा आवर घालावा. आपल्या शूर सैनिकांनी अतिशय अचूक मारा केला, म्हणूनच तुर्कीने पाकिस्तानला दिलेले ड्रोन नष्ट करण्यात यश आले, हे जरा ध्यानी ठेवावे. ते जर का भारतात पडले असते, तर पहलगामपेक्षा आणि काँग्रेस-डावे आणि पुरोगाम्यांच्या सरकारच्या काळात जेवढे दहशतवादी बळी गेले, त्यांपेक्षा कितीतरी बळी आपल्या देशात गेले