श्री परशुराम भवनाचा उपयोग सर्वांना होईल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

    02-Jun-2025
Total Views | 7
Inauguration of Parshuram Bhavan

नाशिक :  “अतिशय सुंदर वास्तू परशुराम भवनच्या रूपात उभी राहिली आहे. गरजू विद्यार्थ्यांची येथे निवासाची व्यवस्था होईल. सर्वांना वास्तूचा उपयोग होईल. चित्पावन ब्राह्मण समाज सर्व क्षेत्रात अग्रणी आहे. अतिशय बुद्धिमान, मेहनती असल्याने विषम परिस्थितीतून सामान्य, मध्यमवर्गीय पण स्वकर्तृत्वावर पुढे आला आहे. जात कधीच जात नाही म्हणून जातीय विषमता नष्ट करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. ब्राह्मण व्यक्ती समाजात साखरेसारखा गोडवा निर्माण करतात. सनातन हिंदू धर्म काळानुसार बदल करतो. पण, मूळ विचार बदलत नाही. आपण एक आहोत ही भावना महत्त्वाची,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

‘चित्पावन ब्राह्मण संघा’ची परशुराम भवन ही भव्य वास्तू जुन्या सीबीएसजवळ दिमाखात उभी राहिली आहे. या वास्तूचे लोकार्पण कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात झालेल्या सोहळ्यात रविवार, दि. 1 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच, संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे, कार्यवाह नितीन सहस्त्रबुद्धे, कोषाध्यक्ष हेरंब घारपुरे तसेच ‘परशुराम आर्थिक विकास महामंडळा’चे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, आ. सीमा हिरे, आ. डॉ. राहुल आहेर, आ. राहुल ढिकले, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, स्नेहा दातार उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष विजय साने यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. संस्थेची 92 वर्षांची उज्ज्वल वाटचाल सुरू असल्याचे सांगत विविध समाजोपयोगी उपक्रम व कार्यक्रमांचा उल्लेख करून कार्याचा आढावा त्यांनी घेतला. देणगीदारांविषयी कृतज्ञता व्यक्त करून आगामी प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली. देणगीदारांचे सत्कारही करण्यात आले.
या कार्यक्रमाला ब्राह्मण ज्ञातीतील अनेक समाजबांधव उपस्थित होते. यावेळी परशुराम भवन प्रकल्प चित्रफीत दाखविण्यात आली, तर कोनशिलेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मैथिली गोखले यांनी सूत्रसंचालन, नितीन सहस्रबुद्धे यांनी आभार मानले. ‘चित्पावन ब्राह्मण संघा’चे विश्वस्त मंडळाचे प्रा. दिलीप फडके, प्रा. प्रभाकर केळकर, देवेंद्र बापट, विवेक गोगटे, डॉ. विजय काकतकर, अनिरुद्ध अभ्यंकर, अभय खरे, मंगला जोगळेकर, श्रीरंग वैशंपायन, सुधीर दामले, सुवर्णा सहस्रबुद्धे, सुशील सहस्रबुद्धे, डॉ. अजित कुमठेकर, हेमंत वाड, विद्यासागर जोशी या कार्यकारिणी सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

...असे आहे परशुराम भवन


जुन्या सीबीएसजवळ र. के. पटवर्धन परशुराम भवन ही भव्य वास्तू दिमाखात उभी राहिली आहे. अडीच हजार चौरस फुटांच्या परशुराम भवनसाठी पाच कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. ‘चित्पावन संस्थे’च्या देणगी फंडातून ही रक्कम उभी करण्यात आली आहे. पुण्यात असलेल्या परशुराम भवनपेक्षा नाशिकमधील वास्तू अधिक भव्य असून राज्यातील ही पहिलीच दिमाखदार वास्तू ठरेल. या इमारतीत व्यावसायिक वापरासाठी जागा असून तळघरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र दालन उपलब्ध असेल. समारंभांकरिता बँक्वेट हॉल, वसतिगृहासाठी दहा खोल्या असून जवळपास 35 विद्यार्थ्यांची तेथे राहण्याची व्यवस्था होईल.

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!; भारताचे पाकवर टीकास्त्र

"ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!"; भारताचे पाकवर टीकास्त्र

(India on Trump-Munir meet) पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांची ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांऐवजी लष्करप्रमुख ट्रम्प यांना भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवर आता भारताने प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे...

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121