इस्लामाबाद : भारताने पाकिस्तानातील दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम येथील हत्याकांडाविरोधात जोरदार प्रत्युत्तर दिलेय. त्यामुळे दोन्ही राष्ट्रांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे देखील घाबरल्याचे पाहायला मिलतेय. त्यांनी आपल्या भावाला, म्हणजेच सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भारतासोबत चर्चा करून मतभेद मिटविण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे.
माजी पंतप्रधान नवाज शरीफ सध्या लंडनमध्ये राहात असून ते आधीपासूनच भारताविरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या विरोधात आहेत. भारतासारख्या प्रगत देशाशी युदध करायला पाकिस्तान तयार नाही, हे मत त्यांचे आजही कायम आहे. त्यामुळे त्यांनी शहबाज यांना युद्धाऐवजी चर्चा करुन तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे. नवाज शरीफ यांच्या या विधानावरून असेच दिसते की, त्यांना एक गोष्ट ठाऊक आहे ती म्हणजे भारताशी संघर्ष म्हणजे स्वतःच्या देशाला संकटात टाकणे. भारताची लष्करी ताकद, आर्थिक स्थैर्य आणि आंतरराष्ट्रीय संबध लक्षात घेता, पाकिस्तानने भारताला आवाहन देणे धोक्याचे ठरु शकते.