भारताची लाथ सौदीची साथ!

    30-Apr-2025
Total Views | 42
 
India
 
काश्मीरच्या पहलगाम येथे दि. 22 एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. इस्लामी दहशतवाद्यांनी 26 जणांची हत्या केली. हत्येपूर्वी त्यांनी आधी धर्म विचारला, तर अनेकांना कलमाही म्हणायला लावला. हा हल्ला पाकिस्तानातील दहशतवादी गटांशी जोडला जातो. दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनीसुद्धा एका मुलाखतीत कबूल केले की, पाकिस्तानने पाश्चात्य देश आणि अमेरिकेच्या इशार्‍यावर दहशतवाद पोसला आहे. अशा परिस्थितीत, भारत या मुद्द्यावर सर्वच व्यासपीठांवरून पाकिस्तानला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे.
 
आपण पाहिले तर, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी केली. त्यानंतर पाकिस्तानच्या मित्र राष्ट्रांनीसुद्धा हात वर केले. त्यामुळे चहूबाजूने नाकेबंदी झालेल्या पाकिस्तानची परिस्थिती, ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी झाली आहे. आता सौदी अरेबियानेही पाकिस्तानला चांगलच धडा शिकवल्याचे दिसते आहे. एकीकडे सौदी अरब सरकार हज यात्रेच्या तयारीत असताना, दुसरीकडे त्यांनी असा निर्णय घेतला की, बहुतांश पाकिस्तानी नागरिकांना हज यात्रेपासून रोखण्यात आले. तब्बल 67 हजारांहून अधिक पाकिस्तानी नागरिक, हज यात्रेसाठी सौदीला जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे खासगी यात्रेकरूंच्या पदरी, या निर्णयामुळे निराशा पडली आहे.
 
सौदी अरेबियाने यावर्षी पाकिस्तानसाठी 1 लाख, 79 हजार, 210 कोटा दिला होता. ‘प्रायव्हेट प्रोग्राम’च्या योजनेअंतर्गत, एकूण 90 हजार, 830 यात्रेकरू हज यात्रेला जाणार होते. पण, सौदी सरकारने 23 हजार, 620 यात्रेकरूंनाच हजला जाण्याची परवानगी दिली. उर्वरीत 67 हजार, 210 पाकिस्तानी नागरिकांना हज यात्रेला जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. सौदी सरकारच्या मते 2025 साली, केवळ 26 टक्के पाकिस्तानी खासगी यात्रेकरूंना हजला येण्याची संधी दिली जाणार आहे. याचा अर्थ प्रत्येक चार यात्रेकरूंपैकी, तीन पाकिस्तानी यात्रेकरू हजला जाऊ शकणार नाहीत.
 
या प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक चौकशी समिती स्थापन केली होती. पण, त्यात काहीच प्रगती झालेली दिसत नाही. हज 2025 साठीच्या यात्रेकरूंसाठी कोणतीही खास सवलत मिळालेली नाही, असे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता 67 हजार खासगी यात्रेकरूंचे काय होणार? याचे उत्तर पाकिस्तानकडेही नाही.
 
‘संयुक्त राष्ट्र योजने’तील भारताचे उपस्थायी प्रतिनिधी योजना पटेल यांनीसुद्धा, पाकिस्तानला पहलगामच्या विषयावरून जोरदार फटकारले. दहशतवादाला आश्रय देणारे आणि संपूर्ण प्रदेशाला अस्थिर करणारे ‘दुष्ट राष्ट्र’, असे त्यांनी पाकिस्तानचे वर्णन केले. 2008 सालच्या मुंबई हल्ल्यानंतर, भारतातील कोणत्याही दहशतवादी हल्ल्यातील मृत्यूची ही सर्वाधिक संख्या असल्याचे योजना पटेल यांनी सांगितले.
 
एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर दि. 22 एप्रिल रोजी दुपारी जेद्दाह येथे पोहोचले होते. संध्याकाळ होताच पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची बातमी समोर आली. सुरुवातीला हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या स्पष्ट झाली नाही. मात्र, रात्रीपर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्यादरम्यान पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून, हल्ल्याचा निषेध केला आणि हल्लेखोरांना योग्य धडा शिकवण्याचे आश्वासन दिले.
 
अशातच ते सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावर सोडून भारतात परतले. सौदी अरेबियातील भारताचे राजदूत सुहेल एजाज खान म्हणाले की, “क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आणि भारताला शक्य ती सर्व मदत करणार असल्याचेही सांगितले. सौदी अरेबियाने 67 हजार, 210 पाकिस्तानी नागरिकांची, हज यात्रेला जाण्याची परवानगी नाकारणे हा याचाच एक भाग आहे का? असा प्रश्न आता पडू लागला आहे.”
 
आज बर्‍याच स्तरावर भारताने पाकिस्तानसोबत युद्ध करून, सणसणीत उत्तर द्यावे अशी मागणी होत आहे. तर समाजमाध्यमांवरून दहशतवादाला पर्यटनाने उत्तर देण्यात, भारतीय अग्रेसर असल्याचेही पाहायला मिळते आहे. सार्‍या विश्वातील जनसमुदाय सामाजिक समरसतेच्या भावनेतून संघटित होऊन,पाकिस्तानला आणि इस्लामिक धर्मांधांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित!
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटली अहमदाबाद विमान दुर्घटना : पार्थिवावर राजकोट येथे अंत्यसंस्कार; ३२ जणांचे डीएनए जुळले

विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटली अहमदाबाद विमान दुर्घटना : पार्थिवावर राजकोट येथे अंत्यसंस्कार; ३२ जणांचे डीएनए जुळले

अहमदाबादहून लंडनला निघालेल्या विमानाचा दि. १२ जून रोजी भीषण अपघात झाला. या अपघातात २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. याच विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला होता. तीन दिवसांनंतर डीएनए चाचणीमुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. विजय रुपाणींचा डीएनए जुळला असल्याची माहिती रुग्णालयाने रविवार दि. १६ जून रोजी सकाळी ११.१० वाजता दिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबाकडे दिले. गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार विजय रुपाणी यांच्या पार्थिवावर राजकोट ..

धर्मांधांनी मंदिराबाहेर फेकले गोमांसाचे तुकडे; मुख्यमंत्र्यांनी दिले

धर्मांधांनी मंदिराबाहेर फेकले गोमांसाचे तुकडे; मुख्यमंत्र्यांनी दिले 'Shoot at Sight'चे आदेश

आसाममध्ये गेल्या अनेक दिवसांपासून इस्लामिक कट्टरपंथी हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. मंदिर परिसरात वारंवार गोमांस फेकून हिंदूंच्या श्रद्धेची खेळण्याचा प्रयत्न होतो आहे. आसामच्या लखीपूर येथील काली मंदिराजवळ गोमांस फेकण्याची घटना घडल्याने परिसरात जातीय तणाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी आसाममधील धुबरीमध्येही असाच काहीसा प्रकार घडला होता. त्यामुळे स्थानिक हिंदूंमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी सुद्धा आरोपींना थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिलेत...

अमेरिकेवर हल्ला केल्यास वाईट परिणाम होतील डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; इस्रायलकडून तीव्र प्रत्युत्तर

अमेरिकेवर हल्ला केल्यास वाईट परिणाम होतील डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; इस्रायलकडून तीव्र प्रत्युत्तर

इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. इस्रायलने केवळ इराणच्या अणू ठिकाणांवर हल्ले केले नाहीत, तर नऊ शास्त्रज्ञांनाही ठार केले आहे, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, "इराणवर झालेल्या ताज्या इस्रायली हल्ल्यांमध्ये अमेरिकेची काहीही भूमिका नव्हती. पण, इराणने अमेरिकेवर हल्ला केला, तर आमचे लष्कर संपूर्ण ताकदीने त्याच्यावर तुटून पडेल. ही कारवाई अशी असेल, जिचा विचार इराणने कधीच केला नसेल.” अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही पोस्ट शेअर केली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121