मुंबई : काही दिवसांपूर्वी लेखक ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीरामचंद्र आणि स्वामी समर्थांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. दरम्यान, आता भाजपचे दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी त्यांना या वक्तव्याबद्दल माफी मागायला लावली आहे.
ज्ञानेश महाराव यांनी शरद पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमात प्रभू श्रीरामचंद्र आणि स्वामी समर्थांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे हिंदू संघटनांनी त्यांच्या या विधानावर आक्षेप घेतला होता. तसेच राज्यभरातील वातावरण चांगलंच पेटल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या या वक्तव्याचा राज्यभरात निषेधही करण्यात आला होता. त्यानंतर आता राजेश शिरवडकर यांनी ज्ञानेश महाराव यांना माफी मागायला लावली आहे.