तुकाराम बीजेला देहूत थरथरतं झाड; भाविकांची झाड पाहायला गर्दी

    09-Mar-2023
Total Views | 268

tukabij 
 
मुंबई : संत तुकारामांनी १६५० साली फाल्गुन कृष्ण पक्षाच्या दुस-या दिवशी मध्यानीला आपला देह सोडला असं सांगितलं जातं. यावर्षी हा दिवस ९ मार्च रोजी आला आहे. या दिवसाचे औचित्य साधून अनेक भाविक देहूची वारी आजच्या दिवशी करतात. मंदिराच्या परिसरात आजच्या दिवशी एक ठराविक झाड थरथरतं अशी भाविकांची श्रद्धा आहे.
 
तुकाराम बीजेचा सोहळा याचि डोळा पाहायला लाखो भाविक देहूतल्या विठ्ठल मंदिरात गर्दी करतात. तुकोबारायांच्या नामाच्या जयघोषात आसमंत भरून निघतो आणि त्या दिवशी देवळाच्या आवारातलं एक झाड थरारतं असं सांगितलं जातं.
 
विठोबाचे परम भक्त असलेल्या तुकोबांनी अंधश्रद्धा आणि समाजातील अनिष्ट रुढींवर भाष्य केले. समाजप्रबोधनाचे मोठे कार्य त्यांनी आपल्या हयातीत केले तसेच आपल्या अभंगातून प्रबोधन ते आजतागायत करत आहेत. शिवाजी महाराजही त्यांना आदर्श मनात अशा संत तुकोबाराय यांचे फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. “आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा रामराम घ्यावा, अमुचा रामराम घ्यावा” असे म्हणत तुकोबा विठ्ठलवारीला निघाले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

'फंडींगशिवाय असा हल्ला...'; ५५ दिवस मौन बाळगल्यानंतर पहलगाम हल्ल्यावर 'एफएटीएफ'चे मोठे विधान!

काश्मीरच्या पहलगाम येथे दि. २२ एप्रिल रोजी इस्लामिक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. जगातील बहुतेक राष्ट्र आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था भारताच्या बाजूने दहशतवादाविरोझात उभ्या आहेत. यातच आता फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ने देखील हल्ल्याचा निषेध केलाय. पहलगामसारखा हल्ला कोणत्याही फंडींगशिवाय (निधीशिवाय) होऊ शकत नाही, असे एफएटीएफने म्हटले आहे. या सदर्भातील निवेदन एफएटीएफने नुकतेच जारी केले आहे...

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

“शिशु मंदिर हे ओडिशाच्या शिक्षण विभागातील नाडीसारखे आहे. ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारे चालवले जाणारे सरस्वती शिशु विद्या मंदिर, भारतीय पद्धती आणि मूल्यांवर आधारित सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण देण्यात अतुलनीय भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सरस्वती विद्या मंदिरात ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारा आयोजित प्रदेशिका प्राचार्य परिषदेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121