भगवान शिवाचे गुण प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज : सरसंघचालक

    01-Apr-2025   
Total Views | 14

Dr.Mohanji Bhagwat Shiv Tandav Stotra Program

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Shiv Tandav Stotra Program)
"भगवान शिवाची भक्ती अत्यंत साधी आणि सरळ आहे. त्यांना फक्त प्रेम, भक्ती आणि भावनांची गरज आहे. त्यांचे स्मरण करून त्यांचे गुण आत्मसात करण्याची गरज आहे", असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी समाजाला आवाहन केले आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात शिवराज्य प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सामूहिक शिव तांडव स्तोत्र पठण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

हे वाचलंत का? : प्राचीन भारतीय परंपरा आणि ग्रंथ वर्तमानात तितकेच समर्पक

कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमंत राजे मुधोजी भोसले, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार परिणय फुके, माजी आमदार टेकचंद सावरकर उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधत सरसंघचालक पुढे म्हणाले, भगवान शिवाचा महिमा अपार आहे. ते देवांचे देव महादेव तर आहेतच. ते जितके देवांचे आहेत तितकेच ते दानवांचेही आहेत. असे हे शीवपरमेश्वर कैलास पर्वत, काशी धाम, १२ जोतीर्लिंग यांशिवाय विविध ठिकाणी त्यांचे स्थान आहे. केवळ भारतातच नाही तर, संपूर्ण विश्वात स्वयंभू शिवलींग सापडू लागली आहेत, कारण ते आदिदेव असून साऱ्या विश्वात त्यांची महिमा आहे. ते चराचरांत आहेत.

समुद्रमंथनाची गोष्ट सांगत ते म्हणाले, समुद्र मंथनातून जेव्हा अमृत बाहेर पडले तेव्हा शीव परमेश्वर पुढे झाले नाहीत, मात्र जेव्हा विष बाहेर पडले तेव्हा इतरांवर संकट येऊ नये म्हणून स्वतः ते विष प्राशन केले. म्हणजेच संकटप्रसंगी स्वतः ते पुढे उभे राहिले. आपण आपल्या जीवनात त्यांचे अनुकरण करू शकतो का? म्हणजेच अधिकाअधिक लोकसेवा करू शकतो का, याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
अग्रलेख
जरुर वाचा
महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार कसे सुरू आहे मिशन खड्डेमुक्त मुंबई?

महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार कसे सुरू आहे मिशन खड्डेमुक्त मुंबई?

बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरातील २२७ वार्डांमध्ये एकेक “ डेप्युटी अभियंता” नियोजित करून नविन उपक्रम राबविला आहे. प्रत्येक अभियंता त्याच्या वार्डात १० ते १५ किमीचा रस्ता रात्री-रोज तपासतो. दर दोन दिवसांनी दुचाकीवरून किंवा पायी जाउन रस्ता तपासला जातो. यामुळे खड्यांची वेळेवर ओळख होईल आणि त्वरित भरपाई केली जाईल . पहिली सभा महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी रोड्स आणि ट्रान्सपोर्ट विभागाशी ९ जून रोजी घेतली. यात त्यांनी निर्देश दिले खड्डे ६ ते १२ इंच रुंद असताना भरली पाहिजेत. मोठे खड्डे कामात ..

मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

“भारताचे भांडवली बाजारमुल्य सहापटींनी वाढून ११ वर्षांत ७४ लाख कोटी रुपये इतके झाले. भारतावर मोदी सरकारच्या काळात अधिक दृढ झालेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले.”, असे वक्तव्य एनएससीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टीकोनातून भांडवली बाजाराची भूमिका अधोरेखित व्हावी या उद्देशाने विकसित भारताचा मार्ग आणि भांडवली बाजाराचे योगदान या विषयावर दि. ९ जून रोजी नवी दिल्ली येथे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तेव्हा ते ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121