दहशतवाद संपवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून हिंदू एकतेचे आवाहन

    05-May-2025
Total Views |

VHP Alok Kumar on terrorism

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP Alok Kumar on terrorism) 
पाकिस्तानसह संपूर्ण देशातून दहशतवाद संपवण्यासाठी आणि त्याची रचना नष्ट करण्यासाठी हिंदू एकतेचे आवाहन विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील आलोक कुमार यांनी आंध्रप्रदेशच्या भीमावरम येथील एएसआर सांस्कृतिक केंद्र येथे पत्रकारांना संबोधित केले. विहिंप घर वापसी अभियान, मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याची चळवळ, धर्मांतर थांबवण्याची मोहीम तीव्र करेल आणि गरिबांसाठी सेवाकार्यही वेगाने वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे वाचलंत का? : मणिपूरमध्ये आयोजित संघ शिक्षा वर्गात ७१ शिक्षार्थी सहभागी

 माध्यमांना संबोधत ते म्हणाले, पहलगाम हल्ला ही एक दहशतवादी घटना आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारला आणि त्यांच्यातील फक्त हिंदूंनाच मारले. अशा घृणास्पद कृत्यांसाठी पाठिंबा, प्रशिक्षण आणि प्रेरणा पाकिस्तानमधून येते. भारत सरकारने योग्य उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे याबद्दल आम्हाला समाधान आहे. हिंदूंची हत्या करून जिहादींनी आपल्या देशाच्या सन्मानावर हल्ला केला आहे. याचा परिणाम काश्मिरी लोकांच्या अर्थव्यवस्थेवर आणि हितांवरही झाला आहे. त्यामुळे मर्यादित प्रतिसादाचा प्रश्नच उद्भवत नाही. विहिंप भारत सरकारच्या पाठीशी आहे. कोणतीही उदारता, सवलती नसाव्यात आणि पाकिस्तानला भारतात पुन्हा दहशतवादी कारवाया करण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रतिसाद पुरेसा मजबूत असला पाहिजे.

मंदिरांच्या मुक्ततेसाठी विहिंप मोहीम तीव्र करणार असल्याचे सांगत आलोक कुमार म्हणाले, सरकारने हिंदू मंदिरे हिंदू समुदायाला परत करावीत अशी मागणी करत आंध्र प्रदेशातील हिंदूंनी विजयवाडा येथे एक मोठी रॅली काढली होती. धार्मिक स्थळे चालवणे हे सरकारचे काम नाही. मंदिरे परत मिळवण्यासाठी विहिंप आंदोलन तीव्र करेल. या वर्षी मंदिरांच्या वापसीसाठी पाठिंबा आणि सहभाग मिळविण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक आणि उच्चभ्रू समाजाच्या मेळाव्या आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

घर वापसीसाठी विहिंप आंदोलन तीव्र करणार
घर वापसी आणि हिंदूंचे इतर धर्मात होणारे धर्मांतर थांबवण्यासाठी विहिंप आपली मोहीम तीव्र करेल. येत्या काळात, भीती, कपट किंवा लोभामुळे धर्मांतरित झालेले हिंदू मोठ्या संख्येने त्यांच्या मूळ धर्मात परत येऊ शकतील.